ETV Bharat / state

बाजार समित्या बंद केल्याने शेतकऱ्यांसह शहरी लोकांचे होईल नुकसान, नवले यांनी व्यक्त केली भीती

author img

By

Published : Apr 10, 2020, 7:14 PM IST

सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी. शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा व शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

kisan morcha ajit navale on farmers fruit vegetable
बाजार समित्या बंद केल्याने शेतकऱ्यांसह शहरी लोकांचे होईल नुकसान, नवले यांनी व्यक्त केली भीती; सुचवला उपाय

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावर मार्ग सूचवला आहे.

डॉ. अजित नवले म्हणाले की, 'साथीच्या काळात लोकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने ताजी फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकार बाजार समित्या बंद करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान तर होणारच आहे. यासोबत शहरी लोकांना ताजी फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या खाण्यास मिळणार नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर होईल.'

डॉ. अजित नवले शेतीमालासंदर्भात माहिती देताना...

सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी. शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा व शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन : मुंबईत संचारबंदी मोडणाऱ्या 4,138 आरोपींवर गुन्हे दाखल

हेही वाचा - धारावी कोरोनाचे हॉटस्पॉट; लॉकडाऊन असेपर्यंत धारावीत फळे भाज्यांच्या विक्रीला बंदी

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल आणि शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, अशी भीती अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी यावर मार्ग सूचवला आहे.

डॉ. अजित नवले म्हणाले की, 'साथीच्या काळात लोकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने ताजी फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकार बाजार समित्या बंद करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान तर होणारच आहे. यासोबत शहरी लोकांना ताजी फळे, फळभाज्या आणि पालेभाज्या खाण्यास मिळणार नाहीत. याचा थेट परिणाम त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर होईल.'

डॉ. अजित नवले शेतीमालासंदर्भात माहिती देताना...

सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी. शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा व शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी नवले यांनी केली आहे.

हेही वाचा - लॉकडाऊन : मुंबईत संचारबंदी मोडणाऱ्या 4,138 आरोपींवर गुन्हे दाखल

हेही वाचा - धारावी कोरोनाचे हॉटस्पॉट; लॉकडाऊन असेपर्यंत धारावीत फळे भाज्यांच्या विक्रीला बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.