मुंबई : राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला गेला. त्या पुरस्काराच्या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार याशिवाय अनेक व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कोणतेही नियोजन नसल्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: या घटनेला महाराष्ट्र शासनाचे महायोगी उपमुख्यमंत्री आणि आप्पा धर्माधिकारी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांनी दाखल करून घेतली आहे. याचिका कर्त्याच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी ही बाब किती गंभीर आहे, हे न्यायालयाच्या द्विख खंडपीठांसमोर मांडले आहे. संबंधित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संदर्भात आम्ही जी चौकशी मागणी केलेली आहे, त्याचा न्यायालयाने विचार करावा ही बाजू त्यांनी मांडली आहे.
काय आहे प्रकरण: मागच्या 15 दिवसांपूर्वीच नवी मुंबई खारघर या ठिकाणी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा शासनाने आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्याचे पुरस्कार मूर्ती होते अप्पासाहेब धर्माधिकारी होते. या पुरस्काराच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री यांनी वीस लाख लोक येतील अशी घोषणा कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी केली होती. कार्यक्रमाच्या दिवशी लाखो लोक खारघर येथील या पुरस्काराच्या निमित्ताने जमले आणि गर्दी, चेंगराचेंगरी व उष्माघात होऊन लोक मृत पावले, अशी भूमिका याचिकेत मांडली आहे.