ETV Bharat / state

Case of Kharghar: खारघर प्रकरणी महाराष्ट्र शासनावर गुन्हा नोंदवावा, पनवेल न्यायालयात सुनावणी तहकूब, पुढील सुनावणी 15 जूनला

author img

By

Published : May 26, 2023, 5:10 PM IST

महाराष्ट्र भूषण पुरस्कार या सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली आणि 14 लोकांचा मृत्यू झाला. यात मृतांचा आकडा लपवला जात असल्याचाही आरोप होत आहे. याप्रकरणी धनंजय शिंदे यांनी पनवेल न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. आज ही याचिका सुनावणीसाठी पनवेल न्यायालयामध्ये आली असता न्यायाधीशांनी सुनावणी तहकूब केली. पुढील तारीख 15 जून निश्चित करण्यात आली आहे.

Panvel court
पनवेल न्यायालयात सुनावणी तहकूब

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात लाखो लोक खारघर येथे जमले होते. परंतु शासनाने कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. म्हणूनच श्री सदस्यांचा चेंगराचेंगरी मुळे झालेला आहे. शासनाच्या कोणत्याही सोयी किंवा त्याबाबतची पूर्व नियोजन या दिवशी नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण सांगत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी पनवेल न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली. आज ही याचिका सुनावणीसाठी पनवेल न्यायालयामध्ये आली असता न्यायाधीशांनी सुनावणी तहकूब केली. पुढील तारीख 15 जून निश्चित करण्यात आली आहे. त्यादिवशी कागदपत्रांसह दोन्ही पक्षकारांनी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.



कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती: दीड महिन्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. खारघर उपनगरात महाराष्ट्र शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित होते. याशिवाय अनेक मंत्री आणि इतर आमदार मान्यवर मंडळी उपस्थित होते.



पनवेल न्यायालयामध्ये याचिका दाखल: याचिकेमध्ये फौजदारी तक्रार दाखल करण्यासंदर्भात नमूद केलेले आहे की, एवढा मोठ्या लाखो लोकांचा जमाव जमणार आहे. त्याचे नियोजन व्यवस्थापन लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था आणि जर चेंगराचींगरी झाली तर, त्या अनुषंगाने खास म्हणून विशेष व्यवस्था याचे कोणतेही नियोजन शासनाने केले नाही. त्यामुळेच 14 श्री सदस्यांचा म्हणजे नागरिकांचा मृत्यू ओढावला, याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर त्वरित कारवाई देखील केली पाहिजे. अशा प्रकारची याचिका पनवेल न्यायालयामध्ये वकील असीम सरोदे यांच्यामार्फत धनंजय शिंदे यांनी दाखल केली आहे.




गुन्हे दाखल करण्याची मागणी: या संदर्भात याचिककर्ता धनंजय शिंदे म्हणतात की, शासनाने नियोजन केले नाही म्हणून ही दुर्घटना झाली. याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी. शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित असताना देखील कोणतेही पूर्वनियोजन या गर्दीचे केलेले नसल्यामुळे हा प्रसंग घडला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर भारतीय दंड विधान कलम अंतर्गत गुन्हे नोंदवावे. अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Heatstroke Death Case खारघर दुर्घटनेत 14 लोकांचा मृत्यू प्रकरणी पनवेल न्यायालयात याचिका दाखल
  2. Heatstroke Death Case उष्माघात मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र शासनावर गुन्हा नोंदवावा दुसरी याचिका पनवेल न्यायालयात दाखल
  3. Heatsroke Death Case खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने करुन घेतली दाखल 8 जूनला पुढील सुनावणी

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात लाखो लोक खारघर येथे जमले होते. परंतु शासनाने कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. म्हणूनच श्री सदस्यांचा चेंगराचेंगरी मुळे झालेला आहे. शासनाच्या कोणत्याही सोयी किंवा त्याबाबतची पूर्व नियोजन या दिवशी नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण सांगत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी पनवेल न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली. आज ही याचिका सुनावणीसाठी पनवेल न्यायालयामध्ये आली असता न्यायाधीशांनी सुनावणी तहकूब केली. पुढील तारीख 15 जून निश्चित करण्यात आली आहे. त्यादिवशी कागदपत्रांसह दोन्ही पक्षकारांनी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे.



कार्यक्रमाला यांची होती उपस्थिती: दीड महिन्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. खारघर उपनगरात महाराष्ट्र शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात उपस्थित होते. याशिवाय अनेक मंत्री आणि इतर आमदार मान्यवर मंडळी उपस्थित होते.



पनवेल न्यायालयामध्ये याचिका दाखल: याचिकेमध्ये फौजदारी तक्रार दाखल करण्यासंदर्भात नमूद केलेले आहे की, एवढा मोठ्या लाखो लोकांचा जमाव जमणार आहे. त्याचे नियोजन व्यवस्थापन लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वैद्यकीय व्यवस्था आणि जर चेंगराचींगरी झाली तर, त्या अनुषंगाने खास म्हणून विशेष व्यवस्था याचे कोणतेही नियोजन शासनाने केले नाही. त्यामुळेच 14 श्री सदस्यांचा म्हणजे नागरिकांचा मृत्यू ओढावला, याला जबाबदार महाराष्ट्र शासन आहे. याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर त्वरित कारवाई देखील केली पाहिजे. अशा प्रकारची याचिका पनवेल न्यायालयामध्ये वकील असीम सरोदे यांच्यामार्फत धनंजय शिंदे यांनी दाखल केली आहे.




गुन्हे दाखल करण्याची मागणी: या संदर्भात याचिककर्ता धनंजय शिंदे म्हणतात की, शासनाने नियोजन केले नाही म्हणून ही दुर्घटना झाली. याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करावी. शासनाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थित असताना देखील कोणतेही पूर्वनियोजन या गर्दीचे केलेले नसल्यामुळे हा प्रसंग घडला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यावर भारतीय दंड विधान कलम अंतर्गत गुन्हे नोंदवावे. अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Heatstroke Death Case खारघर दुर्घटनेत 14 लोकांचा मृत्यू प्रकरणी पनवेल न्यायालयात याचिका दाखल
  2. Heatstroke Death Case उष्माघात मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र शासनावर गुन्हा नोंदवावा दुसरी याचिका पनवेल न्यायालयात दाखल
  3. Heatsroke Death Case खारघर उष्माघात मृत्यू प्रकरणाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने करुन घेतली दाखल 8 जूनला पुढील सुनावणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.