ETV Bharat / state

मी संजय निरुपम यांना समजवण्याचा प्रयत्न करेन - एकनाथ गायकवाड

संजय निरुपम यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील होण्यासाठी आपण स्वतः भेटून विनंती करणार असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली तक्रार करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा अशी सुचनाही गायकवाड यांनी केली आहे.

author img

By

Published : Oct 5, 2019, 7:45 PM IST

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड

मुंबई - काँग्रेसमध्ये कोणतीही प्रकारची गटबाजी नाही. मात्र, काही गैरसमज आहेत. त्यातूनच संजय निरुपम यांनी काही आरोप केले आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील होण्यासाठी आपण स्वतः भेटून विनंती करणार असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड

निरुपम यांनी पक्षावर केलेल्या आरोपांबद्दल गायकवाड यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. शिवाय, निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली तक्रार करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा अशी सुचनाही गायकवाड यांनी केली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी मिळून काम करणार आहेत. तसेच, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. "मातोंडकर यांना मी समजावले असून त्या लवकरच प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. दोन दिवसात त्या आपला निर्णय सांगतील" असे गायकवाड म्हणाले.

हेही वाचा - प्रदेश युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

आरेतील वृक्षतोडीविषयी बोलताना ते म्हणाले, मुंबईची साफ सफाई केली जात नाही, पण एका रात्रीत चारशे झाडे कापली जातात. लोक सरकारवर खूप नाराज आहेत. ती नाराजी मतदानातून लोक दाखवतील, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.

मुंबई - काँग्रेसमध्ये कोणतीही प्रकारची गटबाजी नाही. मात्र, काही गैरसमज आहेत. त्यातूनच संजय निरुपम यांनी काही आरोप केले आहेत. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील होण्यासाठी आपण स्वतः भेटून विनंती करणार असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड

निरुपम यांनी पक्षावर केलेल्या आरोपांबद्दल गायकवाड यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. शिवाय, निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपली तक्रार करावी आणि नंतरच निर्णय घ्यावा अशी सुचनाही गायकवाड यांनी केली आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी मिळून काम करणार आहेत. तसेच, अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. "मातोंडकर यांना मी समजावले असून त्या लवकरच प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. दोन दिवसात त्या आपला निर्णय सांगतील" असे गायकवाड म्हणाले.

हेही वाचा - प्रदेश युवक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस

आरेतील वृक्षतोडीविषयी बोलताना ते म्हणाले, मुंबईची साफ सफाई केली जात नाही, पण एका रात्रीत चारशे झाडे कापली जातात. लोक सरकारवर खूप नाराज आहेत. ती नाराजी मतदानातून लोक दाखवतील, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला.



संजय निरुपम यांना विनंती करून मी समजावण्याचा प्रयत्न करेन - एकनाथ गायकवाड

mh-mum-01-cong-eknath-gai-byte-7201153

(मोजो वर फीड पाठवले आहे)


मुंबई, ता. ५. : मुंबई काँग्रेस मध्ये कोणत्या प्रकारची गटबाजी नाही मात्र काही गैरसमज आहेत त्यातूनच संजय निरुपम यांनी काही आरोप केले आहेत मात्र मी त्यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सामील होण्यासाठी स्वतः भेटून त्यांना विनंती करणार असल्याची माहिती आज मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. निरुपम यांनी पक्षावर केलेल्या आरोपाबद्दल गायकवाड यांनी कोणताही प्रतिवाद न करता निरुपम यांनी आपला काही विषय असला तर त्यांनी पक्षश्रेष्ठी कडे जाऊन आपली तक्रार करावी आणि  त्यातून आपला निर्णय घ्यावा अशी गायकवाड यांनी सूचना केली.
मुंबई माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी हे सर्व मिळून काम करणार असून  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर प्रचारात उतरणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.मातोंडकर यांना मी समजावले असून त्या लवकरच प्रचाराच्यात मैदानात उरणार आहेत. दोन दिवसात त्या आपला निर्णय सांगतील. मी दोन दिवसांपूर्वी मी मातोंडकर यांना फोन केला होता, त्या मला वेळ देणारं आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


काँग्रेसमध्ये कोणतीही गटबाजी नाही, 
आम्ही सगळे मिळून काम करू, मी ४० वर्षा पासून राजकारणात आहे, काँग्रेस आणि त्यांची परंपरा मला माहित आहे.. जे मुंबईत माजी अध्यक्ष झाले त्यांनी आता मला साथ द्यावी, मी त्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील  आणि मुंबईतील लोक महागाईने त्रस्त झाले आहेत, बँका बंद केल्या जात आहेत, मुंबई बेहाल झाली आहे
मुंबईची साफ सफाई केली जात नाही, परंतु एका रात्रीत चारशे झाडे कापली जातात, एकही एस आर आर ए चे प्रकल्प पूर्ण होऊ शकले नाहीत, यामुळे लोक सरकारवर खूप नाराज आहेत, आणि ती नाराजी मतदानातून लोक दाखवतील असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.
भाजप कडून या निवडणुकीत धर्माचा मुद्दा पुन्हा आणला जात आहे, यावर काय सांगाल असे विचारले असता गायकवाड म्हणाले की,
धर्म ही बाब वेगळी आहे, ती राजकारणात आणू नये, माणसात भेद करू नये...आम्हाला भारतीय राज्य घटनेवर विश्वास आहे, यामुळे आम्ही ही निवडणूक विकासाच्या प्रश्नावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.