ETV Bharat / state

"ठाकरे सरकारला राज्याचं आर्थिक गणित जमत नाही"

author img

By

Published : Apr 2, 2021, 4:11 PM IST

'ठाकरे सरकारला आर्थिक गणित काहीच समजत नाही. अर्थव्यवस्थेला चालना देण्याासाठी राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असे म्हणत भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

BJP
भाजप

मुंबई : भारतात कोरोनाचा सर्वात जास्त कहर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. यावरून भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'ठाकरे सरकारला आर्थिक गणित काहीच समजत नाही', अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीडीपी खालावला

'मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राचा जीडीपी काही प्रमाणात वाढला असता; पण आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा जीडीपी खाली गेला आहे. हे जनतेच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. त्यातच आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यासाठी ठाकरे सरकारकडे कोणत्याच धोरणात्मक उपाययोजना नाहीत', अशी टीका विश्वास पाठक यांनी केली.

अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सरकार सपशेल फेल

या आघाडी सरकारकडे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कोणतेही धोरणात्मक उपाय नाहीत. तसेच, या सरकारला अर्थ गणित सुद्धा कळत नाही. दिवसेंदिवस ह्या सरकारमधील अंतर्गत कलह बाहेर येत आहेत. त्यामुळे हे सरकार टिकवण्यासाठी या सरकारमधले नेते प्रयत्न करत आहेत. हेच आता राज्यातील जनतेला दिसून येत आहे. हे सरकार कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेले आहे, असेही विश्वास पाठक यांनी म्हटले.

हेही वाचा - नाशिकमध्ये बेडविना रुग्णाचा मृत्यू होतो; सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : एनआयएने छापा टाकत एका महिलेला घेतलं ताब्यात

मुंबई : भारतात कोरोनाचा सर्वात जास्त कहर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. यावरून भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'ठाकरे सरकारला आर्थिक गणित काहीच समजत नाही', अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीडीपी खालावला

'मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत. कोरोनाच्या काळातही महाराष्ट्राचा जीडीपी काही प्रमाणात वाढला असता; पण आघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे हा जीडीपी खाली गेला आहे. हे जनतेच्या लक्षात येणं खूप गरजेचं आहे. त्यातच आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यासाठी ठाकरे सरकारकडे कोणत्याच धोरणात्मक उपाययोजना नाहीत', अशी टीका विश्वास पाठक यांनी केली.

अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी सरकार सपशेल फेल

या आघाडी सरकारकडे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कोणतेही धोरणात्मक उपाय नाहीत. तसेच, या सरकारला अर्थ गणित सुद्धा कळत नाही. दिवसेंदिवस ह्या सरकारमधील अंतर्गत कलह बाहेर येत आहेत. त्यामुळे हे सरकार टिकवण्यासाठी या सरकारमधले नेते प्रयत्न करत आहेत. हेच आता राज्यातील जनतेला दिसून येत आहे. हे सरकार कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेले आहे, असेही विश्वास पाठक यांनी म्हटले.

हेही वाचा - नाशिकमध्ये बेडविना रुग्णाचा मृत्यू होतो; सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?

हेही वाचा - सचिन वाझे प्रकरण : एनआयएने छापा टाकत एका महिलेला घेतलं ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.