ETV Bharat / state

धारावीनंतर आता वीज निर्मिती प्रकल्पातही अदानी? राज्यात अदानींना विरोध वाढतोय

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 7:13 PM IST

Adani Group Project : धारावीनंतर आता कोल्हापुरातील वीजनिर्मिती प्रकल्पाला देखील विरोध होत आहे. हा विरोध प्रकल्पाला नसून, केवळ हा प्रकल्प अदानींना देण्यात येणार आहे म्हणून होत आहे, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर केंद्र सरकार हे गरिबांचे नसून, धनदांडग्यांचं आणि श्रीमतांचं आहे, अशी टीका विरोधक करत आहेत. अदानींना आता कोल्हापुरातील वीजनिर्मिती प्रकल्पाला देखील विरोध होत असल्यामुळं, अदानींबाबत राज्यात रोष वाढतोय का? किंवा राज्यात अदानींना विरोध वाढतोय, असं चित्र दिसत आहे.

Adani Group
वीजनिर्मिती प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्याच्या हालचाली
प्रतिक्रिया देताना अरुण सावंत आणि अजित चव्हाण

मुंबई Adani Group Project : मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू आहेत. या वीजनिर्मिती प्रकल्पामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं हा वीजनिर्मिती प्रकल्प रद्द व्हावा, तसंच आमच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली, असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. आता राज्यात धारावीनंतर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निमित्तानंही अदानींना विरोध होत आहे. यामुळं राज्यात अदानींना विरोध वाढतोय अशी चर्चा सुरू आहे.



अदानींवर लोकांचा विश्वास नाही : धारावीनंतर आता कोल्हापुरातील वीजनिर्मिती प्रकल्पाला देखील विरोध होत आहे. केंद्र सरकार खासकरुन भाजपा हे उद्योगपतींचे हित डोळ्यांसमोर ठेवून प्रकल्प राबवत आहे. मोदी-शाह यांचे अदानींशी चांगले संबंध आहेत. म्हणून राज्यासह देशातील अनेक मोठमोठे प्रकल्प अदानींना मिळत आहेत. परंतु यात केंद्र सरकार गरिबांचा विचार करत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रावर केली. कोल्हापुरातील पाटगाव धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील, सीमाभागातील तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांना अदानींबाबत अत्यंत वाईट अनुभव आला आहे. अदानींनी व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळं लोकांचा अदानींवर विश्वास नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच हा वीज निर्मिती प्रकल्प रद्द व्हावा, या राजू शेट्टींच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं देखील खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय.



विरोधकांना अदानींची अ‍ॅलर्जी : मागील दीड वर्षामध्ये महायुती सरकारने या राज्यामध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट मार्गी लावले आहेत. नवीन प्रोजेक्ट हाती घेतले. त्यामुळंच राज्यातील जनतेच्या मनामध्ये या सरकारबद्दल आपुलकीचा भाव निर्माण झाला. जनतेला सरकारची कामं आवडू लागली आहेत. यामुळंच विरोधकांची पोटदुखी सुरू झाली, असं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलंय. धारावीच्या विकासासाठी मात्र या विरोधकांनी कधीच प्रयत्न केले नव्हते. अदानींना हा प्रोजेक्ट मिळाला या नावाखाली धारावीतील जनतेला चांगली घरे मिळण्याच्या मार्गात विरोधकांनी अडथळे निर्माण केलेत. आता ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापुरातील पाटगाव धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पाला सुद्धा विरोधकांनी आपल्याच कार्यकर्त्यांमार्फत विरोध करायला सुरुवात केली. प्रत्येक नवीन प्रोजेक्टला विरोध करणे हाच यांचा धंदा आहे. जर अदानींच्या मार्फत शेतकऱ्यांना वीज मिळणार असेल, आणि त्यांचं भलं होणार असेल तर त्यात गैर काय? पण विरोधक फक्त विरोधाला विरोध म्हणून नवीन प्रकल्पांना विरोध करत आहेत. विरोधकांना अदानींची अ‍ॅलर्जी आहे, अशी टीकाही शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सांवत यांनी विरोधकांवर केलीय.


निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोध : पाटगाव धरणातून होणाऱ्या वीजनिर्मितीला विरोध हा राजू शेट्टी यांचा केवळ राजकीय आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला विरोध आहे. राजू शेट्टींनी विकासकामे, विधायक कामे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कामे करावी, जर या वीजनिर्मितीतून वीज मिळणार असेल तर त्यात वाईट काहीच नाही. पण हा विरोध केवळ राजकीय हेतून होत आहे, अशी टीका भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी राजू शेट्टींवर केली आहे.



पाटगाव वीजनिर्मिती प्रकल्पाला विरोध का होतोय?
- कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग समुद्राकडे वळवले जाणार
- भुदरगड, कागल, शिरोळसह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा भासणार
- परिणामी कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी आणि चांदोली धरणातून अधिकचे पाणी द्यावे लागणार
- वीज निर्मितीचा फटका म्हैशाळ योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसणार
- केंद्र सरकारच्या वीजनिर्मिती निर्णयामुळं सांगली, कोल्हापूर तसंच सीमाभागातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. तसंच पिकांसाठी पाण्याची कमतरता जाणवणार
- वीज निर्मितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाणी वापरले जाणार आणि वीज निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जाणार

हेही वाचा -

  1. अदानींवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 5 मुद्यांद्वारे समजून घ्या
  2. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी ग्रुपला मोठा दिलासा, 'हा' दिला निर्णय
  3. उद्योगपती अदानींनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओकवर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेत?

प्रतिक्रिया देताना अरुण सावंत आणि अजित चव्हाण

मुंबई Adani Group Project : मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू आहेत. या वीजनिर्मिती प्रकल्पामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं हा वीजनिर्मिती प्रकल्प रद्द व्हावा, तसंच आमच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा द्यावा यासाठी उद्धव ठाकरेंची ( Uddhav Thackeray) भेट घेतली, असं राजू शेट्टी यांनी सांगितलंय. आता राज्यात धारावीनंतर वीजनिर्मिती प्रकल्पाच्या निमित्तानंही अदानींना विरोध होत आहे. यामुळं राज्यात अदानींना विरोध वाढतोय अशी चर्चा सुरू आहे.



अदानींवर लोकांचा विश्वास नाही : धारावीनंतर आता कोल्हापुरातील वीजनिर्मिती प्रकल्पाला देखील विरोध होत आहे. केंद्र सरकार खासकरुन भाजपा हे उद्योगपतींचे हित डोळ्यांसमोर ठेवून प्रकल्प राबवत आहे. मोदी-शाह यांचे अदानींशी चांगले संबंध आहेत. म्हणून राज्यासह देशातील अनेक मोठमोठे प्रकल्प अदानींना मिळत आहेत. परंतु यात केंद्र सरकार गरिबांचा विचार करत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रावर केली. कोल्हापुरातील पाटगाव धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील, सीमाभागातील तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांना अदानींबाबत अत्यंत वाईट अनुभव आला आहे. अदानींनी व्यवहारामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळं लोकांचा अदानींवर विश्वास नाही, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच हा वीज निर्मिती प्रकल्प रद्द व्हावा, या राजू शेट्टींच्या मागणीला आमचा पाठिंबा असल्याचं देखील खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय.



विरोधकांना अदानींची अ‍ॅलर्जी : मागील दीड वर्षामध्ये महायुती सरकारने या राज्यामध्ये अनेक मोठमोठे प्रोजेक्ट मार्गी लावले आहेत. नवीन प्रोजेक्ट हाती घेतले. त्यामुळंच राज्यातील जनतेच्या मनामध्ये या सरकारबद्दल आपुलकीचा भाव निर्माण झाला. जनतेला सरकारची कामं आवडू लागली आहेत. यामुळंच विरोधकांची पोटदुखी सुरू झाली, असं शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी म्हटलंय. धारावीच्या विकासासाठी मात्र या विरोधकांनी कधीच प्रयत्न केले नव्हते. अदानींना हा प्रोजेक्ट मिळाला या नावाखाली धारावीतील जनतेला चांगली घरे मिळण्याच्या मार्गात विरोधकांनी अडथळे निर्माण केलेत. आता ताजं उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापुरातील पाटगाव धरणातील वीजनिर्मिती प्रकल्पाला सुद्धा विरोधकांनी आपल्याच कार्यकर्त्यांमार्फत विरोध करायला सुरुवात केली. प्रत्येक नवीन प्रोजेक्टला विरोध करणे हाच यांचा धंदा आहे. जर अदानींच्या मार्फत शेतकऱ्यांना वीज मिळणार असेल, आणि त्यांचं भलं होणार असेल तर त्यात गैर काय? पण विरोधक फक्त विरोधाला विरोध म्हणून नवीन प्रकल्पांना विरोध करत आहेत. विरोधकांना अदानींची अ‍ॅलर्जी आहे, अशी टीकाही शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते अरुण सांवत यांनी विरोधकांवर केलीय.


निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोध : पाटगाव धरणातून होणाऱ्या वीजनिर्मितीला विरोध हा राजू शेट्टी यांचा केवळ राजकीय आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला विरोध आहे. राजू शेट्टींनी विकासकामे, विधायक कामे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कामे करावी, जर या वीजनिर्मितीतून वीज मिळणार असेल तर त्यात वाईट काहीच नाही. पण हा विरोध केवळ राजकीय हेतून होत आहे, अशी टीका भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी राजू शेट्टींवर केली आहे.



पाटगाव वीजनिर्मिती प्रकल्पाला विरोध का होतोय?
- कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग समुद्राकडे वळवले जाणार
- भुदरगड, कागल, शिरोळसह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याचा तुटवडा भासणार
- परिणामी कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी आणि चांदोली धरणातून अधिकचे पाणी द्यावे लागणार
- वीज निर्मितीचा फटका म्हैशाळ योजनेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाही बसणार
- केंद्र सरकारच्या वीजनिर्मिती निर्णयामुळं सांगली, कोल्हापूर तसंच सीमाभागातील शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. तसंच पिकांसाठी पाण्याची कमतरता जाणवणार
- वीज निर्मितीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून पाणी वापरले जाणार आणि वीज निर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जाणार

हेही वाचा -

  1. अदानींवरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 5 मुद्यांद्वारे समजून घ्या
  2. अदानी हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी ग्रुपला मोठा दिलासा, 'हा' दिला निर्णय
  3. उद्योगपती अदानींनी पुन्हा घेतली शरद पवारांची भेट, सिल्वर ओकवर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा चर्चेत?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.