ETV Bharat / state

केंद्र सरकारने 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी दिले - राजेंद्र शिंगणे

author img

By

Published : Apr 30, 2021, 6:52 PM IST

महाराष्ट्राचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. केंद्र सरकारला 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 53 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागितले. पण, केवळ 3 लाख 12 हजार इंजेक्शन दिले, असे शिंगणे यांनी म्हटले आहे.

shingne
शिंगणे

मुंबई - केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 53 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन येणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 3 लाख 12 हजार रेमडेसिवीर मिळाले. आणखी 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर केंद्राकडून येणे बाकी आहे, असे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी दिले- राजेंद्र शिंगणे
'राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी पाहता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे रेमडेसिवीरची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आधी 2 लाख 68 हजार रेमडेसिवीर देण्यात येतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र हे इंजेक्शन कमी असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आणि अधिक रेमडेसिविर इंजेक्शन मिळावी अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर केंद्राकडून 4 लाख 53 हजार रेमडेसिवीर देण्यात येतील, अशी कबुली देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत राज्याला केवळ 3 लाख 12 हजार रेमडेसिवीर मिळाले आहे.

आणखी 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे. केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल दरम्यान 4 लाख 53 हजार इंजेक्शन येणे अपेक्षित होते. मात्र, 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी आले आहेत', अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने मायलन, सिप्ला, झायडस कॅडीला, डॉ. रेड्डी आणि सनफार्मा या कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवण्याची जबाबदारी दिली होती. अद्याप त्या कंपन्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचंही शिंगणे यांनी सांगितले.

रोज 65 ते 70 हजार रेमडेसिवीरची गरज

महाराष्ट्रात सध्या 6 लाख 70 हजार कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करावा. 1 लाख 70 हजार इंजेक्शन अजून केंद्र सरकारकडून आलेले नाहीत. ते त्वरित राज्य सरकारला देण्यात यावेत. राज्यात रोज 65 ते 70 हजार रेमडेसिवीर लागत असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

हेही वाचा - ठाण्याच्या १०२ वर्षांच्या आज्जीची कोरोनावर मात, तरुणांना दिला 'हा' कानमंत्र

हेही वाचा - 'केंद्राकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी'

मुंबई - केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिलपर्यंत 4 लाख 53 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन येणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 3 लाख 12 हजार रेमडेसिवीर मिळाले. आणखी 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर केंद्राकडून येणे बाकी आहे, असे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी दिले- राजेंद्र शिंगणे
'राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची वाढती मागणी पाहता राज्य सरकारने केंद्र सरकारकडे रेमडेसिवीरची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून राज्य सरकारला आधी 2 लाख 68 हजार रेमडेसिवीर देण्यात येतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र हे इंजेक्शन कमी असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आणि अधिक रेमडेसिविर इंजेक्शन मिळावी अशी विनंती करण्यात आली. त्यानंतर केंद्राकडून 4 लाख 53 हजार रेमडेसिवीर देण्यात येतील, अशी कबुली देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत राज्याला केवळ 3 लाख 12 हजार रेमडेसिवीर मिळाले आहे.

आणखी 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे. केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल दरम्यान 4 लाख 53 हजार इंजेक्शन येणे अपेक्षित होते. मात्र, 1 लाख 70 हजार रेमडेसिवीर कमी आले आहेत', अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली. तसेच केंद्र सरकारने मायलन, सिप्ला, झायडस कॅडीला, डॉ. रेड्डी आणि सनफार्मा या कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला पुरवण्याची जबाबदारी दिली होती. अद्याप त्या कंपन्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचंही शिंगणे यांनी सांगितले.

रोज 65 ते 70 हजार रेमडेसिवीरची गरज

महाराष्ट्रात सध्या 6 लाख 70 हजार कोरोनाचे सक्रीय रूग्ण आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करावा. 1 लाख 70 हजार इंजेक्शन अजून केंद्र सरकारकडून आलेले नाहीत. ते त्वरित राज्य सरकारला देण्यात यावेत. राज्यात रोज 65 ते 70 हजार रेमडेसिवीर लागत असल्याची माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

हेही वाचा - ठाण्याच्या १०२ वर्षांच्या आज्जीची कोरोनावर मात, तरुणांना दिला 'हा' कानमंत्र

हेही वाचा - 'केंद्राकडून कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये लपवाछपवी'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.