ETV Bharat / state

Thackeray Group On Heatstroke : उष्माघात मृत्यू प्रकरणी राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; ठाकरे गटाची राज्यपालांकडे मागणी

मुंबईतील खारघर येथील 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यात चेंगराचेंगरी आणि उष्माघाताने झालेल्या श्री साधकांच्या मृत्यूप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, अशी मागणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज (सोमवारी) राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली.

author img

By

Published : Apr 24, 2023, 7:27 PM IST

Thackeray Group On Shree Sadhak Death
निवेदन
श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे

मुंबई: खारघर येथील घटना ही मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य शासन सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी या प्रकरणाची आपण उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याचे निर्देश शासनास द्यावेत, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले.


काय होते शिष्टमंळाचे म्हणणे? खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 एप्रिल, 2023 रोजी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे १४ श्रीसेवकांचा नाहक जीव गेला; मात्र शासनाने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शासनाने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. आश्चर्य म्हणजे एक आठवड्यानंतरही स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झालेली नाही. 'महाराष्ट्र भूषण' कार्यक्रमाला १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलिसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राज्यपालांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली. याबाबत राज्य शासनासोबत बोलून आजच पावले उचलण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.


या आमदारांनी दर्शविली उपस्थिती: शिष्टमंडळामध्ये खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आ. सचिन अहिर, आ. सुनील प्रभू, आ. रवींद्र वायकर, आ. मनीषा कायंदे, आ. रमेश कोरगावकर, आ. विलास पोतनिस, आ. ऋतुजा लटके, आ. सुनील शिंदे, आ. प्रकाश फातर्पेकर, आ. आमश्या पाडवी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, संपर्क प्रमुख संजय कदम आदींचा समावेश होता.

रखरखत्या उन्हात कार्यक्रम: खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला हा पुरस्कार धर्माधिकारी यांना प्रदान केला. सकाळी 11.30 च्या सुमारास सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. त्यापैकी अनेकांनी शनिवारीच कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा: Sharad Pawar on Election : जागावाटपाबद्दलच्या 'त्या' विधानाचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांचा दावा

श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे

मुंबई: खारघर येथील घटना ही मानवनिर्मित आपत्ती असल्याने राज्य शासन सत्य परिस्थिती दडविण्याचा प्रयत्न करीत आहे. ही घटना महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारी आहे. त्यामुळे या घटनेची सत्य परिस्थिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी या प्रकरणाची आपण उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्याचे निर्देश शासनास द्यावेत, अशा मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने राज्यपालांना दिले.


काय होते शिष्टमंळाचे म्हणणे? खारघर येथे ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 16 एप्रिल, 2023 रोजी 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे १४ श्रीसेवकांचा नाहक जीव गेला; मात्र शासनाने या दुर्दैवी घटनेनंतर कोणतीही भूमिका अथवा प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शासनाने जारी केलेल्या आकड्यांबाबत आजही संभ्रम कायम आहे. आश्चर्य म्हणजे एक आठवड्यानंतरही स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अपमृत्यूची नोंद झालेली नाही. 'महाराष्ट्र भूषण' कार्यक्रमाला १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले; परंतु कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. घटनेला जबाबदार ठरलेल्या व नियोजनात निष्काळजीपणा करणाऱ्या स्थानिक वरिष्ठ पोलिसांवरही किमान कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देखील राज्यपालांकडे केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी दिली. याबाबत राज्य शासनासोबत बोलून आजच पावले उचलण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.


या आमदारांनी दर्शविली उपस्थिती: शिष्टमंडळामध्ये खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आ. सचिन अहिर, आ. सुनील प्रभू, आ. रवींद्र वायकर, आ. मनीषा कायंदे, आ. रमेश कोरगावकर, आ. विलास पोतनिस, आ. ऋतुजा लटके, आ. सुनील शिंदे, आ. प्रकाश फातर्पेकर, आ. आमश्या पाडवी, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, जिल्हाप्रमुख बबन पाटील, संपर्क प्रमुख संजय कदम आदींचा समावेश होता.

रखरखत्या उन्हात कार्यक्रम: खारघर येथील 306 एकर जागेवर झालेल्या भव्य कार्यक्रमाला धर्माधिकारींचे लाखो अनुयायी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेला हा पुरस्कार धर्माधिकारी यांना प्रदान केला. सकाळी 11.30 च्या सुमारास सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू होता. त्यापैकी अनेकांनी शनिवारीच कार्यक्रमस्थळी उपस्थिती लावली होती.

हेही वाचा: Sharad Pawar on Election : जागावाटपाबद्दलच्या 'त्या' विधानाचा चुकीचा अर्थ काढला; शरद पवारांचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.