मुंबई - अयोध्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. विवादीत जमीन ही रामजन्मभूमी असल्याचा न्यायालयाने निर्वाळा दिला आहे. या निकालाची बऱ्याच दिवसापासून वाट पाहिली जात होती. निकालानंतर देशातील बड्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. अयोध्येत आधी बुद्धविहार होते, असे त्यांनी सांगितले आहे.
पहिले अयोध्येत बुद्धविहार होते. त्या ठिकाणी आपन उत्खनन केल्यास आपल्याला तिथे बुद्धाचे अवशेष मिळेल. पण आम्हाला त्या वादात पडायचे नाही. आम्हाला जर बुद्ध मंदिर बांधायचे असेल तर ते आम्ही अयोध्येत कोठेही बांधू शकतो. दरम्यान, आज आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा हिंदू-मुस्लिमांना न्याय देणारा निकाल आहे. या निकालाचे मी स्वागत करतो. देशामध्ये पूर्णत: शातता नांदावी. बऱ्याच वर्षांपासून बाबरी मस्जिद- राम जन्मभूमी हा प्रश्न सुटल्यामुळे लोकांना आता विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वेळ मिळणार आहे. निकाल अंत्यंत चांगला आहे. त्यामुळे मी या निकालाचे स्वागत करतो, असे कंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
हेही वाचा- पहेले मंदिर फिर सरकार; उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील - खासदार राहुल शेवाळे