मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याबाबत सध्या कोणतीही चर्चा नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. मनसेने जर आपली कार्यपद्धती, विचार बदलले तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो, असेही फडणवीस म्हणाले. आज भाजपची मुंबईमध्ये बैठक पार पडली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
-
भाजपा आणि मनसे यांचा आज तरी एकत्र येण्याचा विचार नाही ! pic.twitter.com/wMAWfpL5hR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">भाजपा आणि मनसे यांचा आज तरी एकत्र येण्याचा विचार नाही ! pic.twitter.com/wMAWfpL5hR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2020भाजपा आणि मनसे यांचा आज तरी एकत्र येण्याचा विचार नाही ! pic.twitter.com/wMAWfpL5hR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2020
भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मनसेची आजची स्थिती एवढी व्यापक नाही. आमचा पक्ष सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा असल्याचे फडणवीस म्हणाले. मनसेने त्यांची कार्यपद्धती बदलल्यास भविष्यात युतीबाबत चर्चा होऊ शकतो असे फडणवीस म्हणाले. आमची आणि मनसेची विचारसरणी आज तरी वेगळी आहे. मात्र, भविष्यात त्यात बदल झाल्यास चर्चा होऊ शकते असेही फडणवीस म्हणाले.