ETV Bharat / state

दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप, सायंकाळी ६ पर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन - day and a half Ganaraya farewell

मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक टाळा आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळी १२ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

day and a half Ganaraya farewell in mumbai
दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
author img

By

Published : Sep 11, 2021, 9:02 PM IST

मुंबई - कोरोनाच्या संकटातही मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे आज (शनिवार) मोठ्या भक्तिभावाने विधिवत विसर्जन झाले. नैसर्गिक व कृत्रिम ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर, आणि कोरोनाचे संकट दूर करा, या अशी आर्त साद घालत भावपूर्ण निरोप दिला.

दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन -

मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक टाळा आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळी १२ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये १५ सार्वजनिक, ६०४७ घरगुती तर १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ६११६ मूर्तींपैकी कृत्रिम तलावात ३६०० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात ४१ सार्वजनिक, ३५४८ घरगुती तर ११ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.

कोरोना नियमांचे पालन करा -

काल शुक्रवारी घरोघरी गणपती मंगलमूर्ती विराजमान झाल्या होत्या. मुंबईत सुमारे दोन लाख घरगुती मूर्तींची तर १० हजाराहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. दिवसभर गणरायाची भक्ती भावाने पूजा, आरती करीत लहान थोरांनी आपल्या आरोग्यासाठी बापाकडे प्रार्थना केली. मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याकरता पालिकेने तयारी केलीच आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे करोनाचे सावट असल्याने भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप ध्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

विसर्जनासाठी पालिकेची तयारी -

मुंबई महानगरपालिकेने ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि १७३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. विसर्जन शांततेत सुरू आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई महानगरपालिका, बेस्ट, विविध गणेशोत्सव मंडळे, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अधानी एनर्जी, एमएमआरडीए आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, होमगार्ड यांना तैनात केले आहे.मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची या उत्सवावर नजर आहे.

नियम धाब्यावर -

मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनीच मूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जन स्थळी जावे असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हर्षद काळे यांनी केले आहे. हा नियम उत्सव काळासाठी बंधनकारक असेल. मात्र आजच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन करताना विसर्जन स्थळांच्या ठिकाणी याचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा - ठाण्यातील गणेशभक्ताने साकारला नीरज चोप्राचा रूपातील बाप्पा

मुंबई - कोरोनाच्या संकटातही मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे आज (शनिवार) मोठ्या भक्तिभावाने विधिवत विसर्जन झाले. नैसर्गिक व कृत्रिम ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर, आणि कोरोनाचे संकट दूर करा, या अशी आर्त साद घालत भावपूर्ण निरोप दिला.

दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप

६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन -

मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक टाळा आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळी १२ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये १५ सार्वजनिक, ६०४७ घरगुती तर १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ६११६ मूर्तींपैकी कृत्रिम तलावात ३६०० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात ४१ सार्वजनिक, ३५४८ घरगुती तर ११ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.

कोरोना नियमांचे पालन करा -

काल शुक्रवारी घरोघरी गणपती मंगलमूर्ती विराजमान झाल्या होत्या. मुंबईत सुमारे दोन लाख घरगुती मूर्तींची तर १० हजाराहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. दिवसभर गणरायाची भक्ती भावाने पूजा, आरती करीत लहान थोरांनी आपल्या आरोग्यासाठी बापाकडे प्रार्थना केली. मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याकरता पालिकेने तयारी केलीच आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे करोनाचे सावट असल्याने भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप ध्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.

विसर्जनासाठी पालिकेची तयारी -

मुंबई महानगरपालिकेने ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि १७३ कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे. विसर्जन शांततेत सुरू आहे. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई महानगरपालिका, बेस्ट, विविध गणेशोत्सव मंडळे, मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, अधानी एनर्जी, एमएमआरडीए आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध विभाग यांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. सुमारे ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे. सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रक पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, होमगार्ड यांना तैनात केले आहे.मुंबईतील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांची या उत्सवावर नजर आहे.

नियम धाब्यावर -

मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या भाविकांनीच मूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जन स्थळी जावे असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त हर्षद काळे यांनी केले आहे. हा नियम उत्सव काळासाठी बंधनकारक असेल. मात्र आजच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे विसर्जन करताना विसर्जन स्थळांच्या ठिकाणी याचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

हेही वाचा - ठाण्यातील गणेशभक्ताने साकारला नीरज चोप्राचा रूपातील बाप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.