ETV Bharat / state

मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर; ६ वर्षात दरोड्याच्या गुन्ह्यात ५० टक्क्यांनी वाढ

देशात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जाते. मात्र, याच मुंबईत मागील काही वर्षांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार दरोड्याचा प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

author img

By

Published : Apr 15, 2019, 5:02 PM IST

मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर; ६ वर्षात दरोड्याच्या गुन्ह्यात ५० टक्क्यांनी वाढ

मुंबई - देशात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जाते. मात्र, याच मुंबईत मागील काही वर्षांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार दरोड्याचा प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने तब्बल ९४९ कोटी रुपये खर्च करून ६ हजार कॅमरे लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण कमी झालेली नाही.

मुंबईमध्ये ६ वर्षात दरोड्याच्या गुन्ह्यात ५० टक्क्यांनी वाढ
मुंबईमध्ये ६ वर्षात दरोड्याच्या गुन्ह्यात ५० टक्क्यांनी वाढ

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळालेल्या आरटीआयच्या माहितीनुसार मुंबईत जानेवरी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ४ हजार ६७४ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एकूण ४५ कोटी ६९ लाख ५० हजार ५८२ रुपये इतकी किंमतीची मालमत्ता जबरी चोरी झाली आहे. यामध्ये पोलिसांनी फक्त १६ कोटी ७५ लाख ४६ हजार २९५ रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत केल्याने आतापर्यंत केवळ ३७ टक्के मालमत्ता किंवा रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

मुंबई - देशात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जाते. मात्र, याच मुंबईत मागील काही वर्षांच्या उपलब्ध आकडेवारीनुसार दरोड्याचा प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने तब्बल ९४९ कोटी रुपये खर्च करून ६ हजार कॅमरे लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा घडणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण कमी झालेली नाही.

मुंबईमध्ये ६ वर्षात दरोड्याच्या गुन्ह्यात ५० टक्क्यांनी वाढ
मुंबईमध्ये ६ वर्षात दरोड्याच्या गुन्ह्यात ५० टक्क्यांनी वाढ

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळालेल्या आरटीआयच्या माहितीनुसार मुंबईत जानेवरी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण ४ हजार ६७४ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एकूण ४५ कोटी ६९ लाख ५० हजार ५८२ रुपये इतकी किंमतीची मालमत्ता जबरी चोरी झाली आहे. यामध्ये पोलिसांनी फक्त १६ कोटी ७५ लाख ४६ हजार २९५ रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत केल्याने आतापर्यंत केवळ ३७ टक्के मालमत्ता किंवा रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

Intro:
देशात सर्वात सुरक्षित शहर म्हणून मुंबई शहराकडे पाहिले जाते मात्र याच मुंबईत गेल्या काही वर्षांच्या उपलब्ध आकडे वारीनुसार दरोड्याचा प्रमाणात 50 टक्के वाढ झाली आहे. मुंबईत सुरक्षिततेच्या दृष्टीने तब्बल 949 कोटी रुपये खर्च करुन सहा हजार कॅमरे 2016 मध्ये लावण्यात आले आहेत. तरीसुद्धा मुंबई घडणाऱ्या गुन्हयात कोणत्याही प्रकारची विशेष कमी आली नाही हे विशेष.Body:आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळालेल्या आरटीआय च्या माहितीनुसार मुंबईत जानेवरी 2013 पासून डिसेंबर 2018 पर्यंत एकूण 4674 जबरीचोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून एकूण 45 कोटी 69 लाख 50 हजार 582 रुपये इतकी किंमतीची मालमत्ता जबरीचोरी झाली आहे. पोलिसांनी फक्त 16 कोटी 75 लाख 46 हजार 295 रुपये किंमतीच्या मालमत्ता हस्तगत केल्याने आतापर्यंत केवळ 37 टक्के मालमत्ता किंवा रोख हस्तगत करण्यात आली आहे.Conclusion:2013 मध्ये एकूण 2925 घरफोडीच्या गुन्ह्यात 555304754/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 82979967/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच

2014 मध्ये एकूण 3055 घरफोडीच्या गुन्ह्यात 600157791 रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 90855413/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच


2015 मध्ये एकूण 3010 घरफोडीच्या गुन्ह्यात 661103303/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 138490424/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत. तसेच

2016 मध्ये एकूण 2552 घरफोडीच्या गुन्ह्यात 432848922/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख घरफोडीत चोरी झाले असून फक्त 69039772/- रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख हस्तगत झाले आहेत.

वर्षाप्रमाणे मुबईत गुन्ह्यांची नोंद

2013 मध्ये एकूण 679 जबरीचोरीच्या घटनेत 94414474 रुपये किंमतीची मालमत्ता चोरी झाले असून फक्त 506 गुन्हे उघड झाले आहे तर 19043859 इतक्या किंमतीची मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.

2014 मध्ये एकूण 697 जबरीचोरीच्या घटनेत 91586774 रुपये किंमतीची मालमत्ता चोरी झाली असून फक्त 511 गुन्हे उघड झाले आहे तर 25961107 इतक्या किंमतीची मालमत्ता किंवा रोख मिळाली आहेत.

2015 मध्ये एकूण 794 जबरीचोरीच्या घटनेत 106320593 रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 570 गुन्हे उघड झाले आहे तर 3799894 इतक्या किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाली आहे.

2016 मध्ये एकूण 723 जबरीचोरीच्या घटनेत 48395458 रुपये किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख चोरी झाले असून फक्त 536 गुन्हे उघड झाले आहे तर 15475245 इतकी किंमतीच्या मालमत्ता किंवा रोख मिळाले आहेत.

2017 मध्ये एकूण 850 जबरीचोरीच्या घटनेत 45788983 रुपये किंमतीच्या मालमत्ता चोरी झाली असून फक्त 671 गुन्हे उघड झाले आहेत तर 23566736 इतकी किंमतीची मालमत्ता किंवा रोख मिळाले आहेत.

2018 मध्ये एकूण 931 जबरीचोरीच्या घटनेत 70444300 रुपये किंमतीची मालमत्ता किंवा रोख चोरी झाली असून फक्त 828 गुन्हे उघड झाले आहेत या पोलीस तापासत 45500401 इतक्या किंमतीची मालमत्ता परत मिळविण्यात आली आहे.



ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.