ETV Bharat / state

धोकादायक इमारतीबाबत न्यायालयाचे आदेश पाळावेत - महापौर

author img

By

Published : Aug 2, 2019, 2:43 AM IST

डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने मुंबईमधील अतिधोकादायक असलेल्या 23 इमारती त्वरित तोडाव्यात, असे आदेश पालिकेला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशांचे पालन पालिका प्रशासनाने करावे, अशा सुचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिल्या आहेत.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर

मुंबई - डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने मुंबईमधील अतिधोकादायक असलेल्या 23 इमारती त्वरित तोडाव्यात, असे आदेश पालिकेला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशांचे पालन पालिका प्रशासनाने करावे, अशा सुचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिल्या आहेत.


मुंबईत 30 वर्षांहून जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या इमारती धोकादायक, अतिधोकादायक, दुरुस्त करता येऊ शकतात, असे वर्गीकरण केले जाते. मुंबईत अतिधोकादायक अशा 499 इमारती आहेत. त्यामधील 23 इमारतीमधील रहिवाशांनी न्यायालयात जाऊन पालिकेच्या तोडक कारवाईविरोधात स्थगिती मिळवली होती. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेमुळे अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरण प्रलंबित असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे समोर आले आहे.


धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने अशा इमारतींवर पालिकेला कारवाई करता येत नव्हती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने अतिधोकादायक इमारतींपैकी 23 इमारतींची याचिका निकाली काढत, इमारत रिकाम्या करून तोडक कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही पालिकेला दिले आहेत. यामुळे अतिधोकादायक इमारतींवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विभागातील इमारतींवर कारवाई
पालिकेच्या डी-विभाग, बी-विभाग, एच - पश्चिम, एच - पूर्व, पी - नॉर्थ, के - पश्चिम, टी - वॉर्ड, के - पूर्व, आर - नॉर्थ, पी - नॉर्थ या विभागातील 23 इमारती रिकाम्या करत जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

धोकादायक इमारतींची आकडेवारी
पालिका - 75
सरकारी - 8
खासगी - 416
एकूण - 499

मुंबई - डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने मुंबईमधील अतिधोकादायक असलेल्या 23 इमारती त्वरित तोडाव्यात, असे आदेश पालिकेला दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशांचे पालन पालिका प्रशासनाने करावे, अशा सुचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिल्या आहेत.


मुंबईत 30 वर्षांहून जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या इमारती धोकादायक, अतिधोकादायक, दुरुस्त करता येऊ शकतात, असे वर्गीकरण केले जाते. मुंबईत अतिधोकादायक अशा 499 इमारती आहेत. त्यामधील 23 इमारतीमधील रहिवाशांनी न्यायालयात जाऊन पालिकेच्या तोडक कारवाईविरोधात स्थगिती मिळवली होती. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेमुळे अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रकरण प्रलंबित असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे समोर आले आहे.


धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतल्याने अशा इमारतींवर पालिकेला कारवाई करता येत नव्हती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने अतिधोकादायक इमारतींपैकी 23 इमारतींची याचिका निकाली काढत, इमारत रिकाम्या करून तोडक कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देशही पालिकेला दिले आहेत. यामुळे अतिधोकादायक इमारतींवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विभागातील इमारतींवर कारवाई
पालिकेच्या डी-विभाग, बी-विभाग, एच - पश्चिम, एच - पूर्व, पी - नॉर्थ, के - पश्चिम, टी - वॉर्ड, के - पूर्व, आर - नॉर्थ, पी - नॉर्थ या विभागातील 23 इमारती रिकाम्या करत जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.

धोकादायक इमारतींची आकडेवारी
पालिका - 75
सरकारी - 8
खासगी - 416
एकूण - 499

Intro:मुंबई - डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने मुंबईमधील अतिधोकादायक असलेल्या २३ इमारती त्वरित तोडाव्यात असे आदेश पालिकेला दिले आहेत. कोर्टाच्या या आदेशांचे पालन पालिका प्रशासनाने करBody:मुंबईत ३० वर्षाहून जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या इमारती धोकादायक, अतिधोकादायक, दुरुस्त करता येऊ शकतात असे वर्गीकरण केले जाते. मुंबईत अतिधोकादायक अशा ४९९ इमारती आहेत. त्यामधील २३ इमारतीमधील रहिवाशांनी न्यायालयात जाऊन पालिकेच्या तोडक कारवाईविरोधात स्थगिती मिळवली होती. डोंगरी येथील केसरबाई इमारत दुर्घटनेमुळे अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. कोर्टामध्ये वर्षानुवर्षे प्रकरण प्रलंबित असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात असल्याचे समोर आले आहे.

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी कोर्टात धाव घेतल्याने अशा इमारतींवर पालिकेला कारवाई करता येत नव्हती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाने अतिधोकादाय इमारतींपैकी २३ इमारतींची याचिका निकाली काढत, इमारत रिकाम्या करून तोडक कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. तसेच केलेल्या कारवाईचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निदेॅशही पालिकेला दिले आहेत. यामुळे अतिधोकादायक इमारतींवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

या विभागातील इमारतींवर कारवाई -
पालिकेच्या डी-विभाग, बी-विभाग, एच - पश्चिम, एच - पूर्व, पी - नॉर्थ, के - पश्चिम, टी - वॉर्ड, के - पूर्व, आर - नॉर्थ, पी - नॉर्थ या विभागातील २३ इमारती रिकाम्या करत जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. 

धोकादायक इमारतींची आकडेवारी
पालिका   -  ७५       
सरकारी   -  ८
खासगी    - ४१६
एकूण    -  ४९९ Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.