ETV Bharat / state

एनसीबी, कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार? - सचिन सावंत

author img

By

Published : Dec 30, 2020, 2:39 PM IST

'निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे. त्या वेळी, फडणवीस सरकार होते, तेव्हा चौकशी केली नाही. काहींच्या घरी औषधे सापडली त्यांचीही चौकशी केली. बॉलिवूडला जाणीवपूर्वक दहशतीखाली ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे,' असा आरोप सावंत यांनी केला आहे. एनसीबीने कंगनाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत न्यूज
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत न्यूज

मुंबई - 'बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. स्वतः ड्रगचे सेवन करणाऱ्या व दुसऱ्यांना जबरदस्तीने ड्रग घेण्यास भाग पाडणाऱ्या कंगना रणौतला मात्र आजपर्यंत एनसीबीने चौकशीला बोलावले नाही. आता ती पुन्हा मुंबईत आलेली आहे. त्यामुळे कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार, हे एनसीबीने सांगावे,' अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

एनसीबी, कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार?

'निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे. त्या वेळी, फडणवीस सरकार होते, तेव्हा चौकशी केली नाही. काहींच्या घरी औषधे सापडली त्यांचीही चौकशी केली. बॉलिवूडला जाणीवपूर्वक दहशतीखाली ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे,' असा आरोपही सावंत यांनी केला आहे. एनसीबीने कंगनाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे.

हेही वाचा - भाजपचे सुडाचे राजकारण -गृहमंत्री देशमुखांचा निशाणा

यासंदर्भात बोलताना सांवत म्हणाले की, 'कंगनाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देत असलेला एक व्हीडिओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झालेला आहे. तिचा एक मित्र अद्ययन सुमन यांनाही कंगना ड्रग्ज घेण्यास भाग पाडत होती. तोही व्हिडिओ जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील ड्रग्जसंदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ, असेही कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. असे असताना एनसीबी त्याकडे गांभीर्याने का पहात नाही आणि तिला चौकशीसाठी का बोलावत नाही. कंगनाला मोदी सरकारने पुरवलेली वाय दर्जाची सुरक्षा आजही तिला आहे. या सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होतो, तो वाया जात आहे.'

'कंगनाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकही या विषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. ड्रग्जसंदर्भात कंगनाकडील माहिती बाहेर आल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल, म्हणून महाविकास आघाडी सरकार ती माहिती उघड होऊ देत नाही, असा आरोपही राम कदम यांनी केला होता. एवढी महत्त्वाची माहिती दडवणे हाही गुन्हाच आहे. त्यामुळे राम कदम यांनी कंगनाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावे. या संपूर्ण प्रकरणात भाजपाने कंगनाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. कंगनाचा बोलवता धनी भाजप आहे हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजपण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे,' असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा - नाकापार्डी ग्रामपंचायत: नऊ सुशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई - 'बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन प्रकरणी एनसीबीने मागील तीन चार महिन्यात कलाकार व त्यांच्या संबंधित अनेकांची चौकशी केली. स्वतः ड्रगचे सेवन करणाऱ्या व दुसऱ्यांना जबरदस्तीने ड्रग घेण्यास भाग पाडणाऱ्या कंगना रणौतला मात्र आजपर्यंत एनसीबीने चौकशीला बोलावले नाही. आता ती पुन्हा मुंबईत आलेली आहे. त्यामुळे कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार, हे एनसीबीने सांगावे,' अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

एनसीबी, कंगनाला चौकशीसाठी कधी बोलावणार?

'निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीच्या व्हिडिओवरून एनसीबी चौकशी करत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे. त्या वेळी, फडणवीस सरकार होते, तेव्हा चौकशी केली नाही. काहींच्या घरी औषधे सापडली त्यांचीही चौकशी केली. बॉलिवूडला जाणीवपूर्वक दहशतीखाली ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे,' असा आरोपही सावंत यांनी केला आहे. एनसीबीने कंगनाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी यापूर्वीही अनेकदा केलेली आहे.

हेही वाचा - भाजपचे सुडाचे राजकारण -गृहमंत्री देशमुखांचा निशाणा

यासंदर्भात बोलताना सांवत म्हणाले की, 'कंगनाने स्वतः ड्रग्ज घेत असल्याची कबुली देत असलेला एक व्हीडिओ अनेक महिन्यांपासून व्हायरल झालेला आहे. तिचा एक मित्र अद्ययन सुमन यांनाही कंगना ड्रग्ज घेण्यास भाग पाडत होती. तोही व्हिडिओ जगजाहीर आहे. बॉलिवूडमधील ड्रग्जसंदर्भात आपल्याकडे माहिती असून ती आपण देऊ, असेही कंगनाने जाहीरपणे सांगितले होते. असे असताना एनसीबी त्याकडे गांभीर्याने का पहात नाही आणि तिला चौकशीसाठी का बोलावत नाही. कंगनाला मोदी सरकारने पुरवलेली वाय दर्जाची सुरक्षा आजही तिला आहे. या सुरक्षेचा खर्च जनतेच्या पैशातून होतो, तो वाया जात आहे.'

'कंगनाची पाठराखण करणारे भारतीय जनता पक्षाचे लोकही या विषयावर आता गप्प आहेत. राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीशी केली होती. ड्रग्जसंदर्भात कंगनाकडील माहिती बाहेर आल्यास अनेकांचे पितळ उघडे पडेल, म्हणून महाविकास आघाडी सरकार ती माहिती उघड होऊ देत नाही, असा आरोपही राम कदम यांनी केला होता. एवढी महत्त्वाची माहिती दडवणे हाही गुन्हाच आहे. त्यामुळे राम कदम यांनी कंगनाला तिच्याकडे असलेली माहिती एनसीबीला देण्यास सांगावे. या संपूर्ण प्रकरणात भाजपाने कंगनाला साथ देत महाराष्ट्राची बदनामी केली. कंगनाचा बोलवता धनी भाजप आहे हेही स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे स्वतःची राजकीय पोळी भाजपण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे,' असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा - नाकापार्डी ग्रामपंचायत: नऊ सुशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.