ETV Bharat / state

कंगनाच्या आडून भाजपचे कुटिल कारस्थान उघड - सचिन सावंत

author img

By

Published : Jan 4, 2021, 4:58 PM IST

Updated : Jan 4, 2021, 5:14 PM IST

कंगणा रनौत ज्याप्रकारे मुंबई पोलीस व महाराष्ट्राची बदनामी केली त्यामागे भाजपचे नेते होते, असा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत
सचिन सावंत

मुंबई - कंगना राणौतने ज्याप्रकारे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी केली त्यामागे तिचे शब्द आणि एकूणच त्यासाठीचे कारस्थान हे भाजपचे नेते करत होते, ते आता उघड पडले असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी कंगना राणौत यांच्या ट्वीटचा आधार घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

बोलताना सचिन सावंत

भाजपने तिला बोलण्यासाठी पाठवले होते

सचिन सावंत म्हणाले, कंगनाने काल (रविवार) ज्याप्रमाणे ट्विट केले आणि त्यातून तिने आपला कबूलनामाच दिला आहे. मागील काळात तिने महाराष्ट्राची बदनामी केली. तसेच मुंबई पोलिसांचा माफिया म्हणून उल्लेख केला तसेच मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख हा तिच्याकडून सतत केला जात होता. त्यामागे भाजपने कारस्थान रचले होते, ते कंगनाच्या माध्यमातून केले जात होते हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे तिला भाजपने तिला यावर बोलण्यासाठी पाठवले होते हेही यातून दिसून येते, असा दावाही सावंत यांनी केला.

...तर जनता भाजपला माफ करणार नाही

कंगना राणौत ज्या भाषेत बोलत होती, त्या भाषेचे सर्व स्क्रिप्ट हे भाजपकडून तयार करून देण्यात आले होते, हे सुद्धा आता स्पष्ट झालेले आहे. याच दरम्यान तिला केंद्राकडून ज्याप्रकारे 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली हे सर्वकाही भाजपने ठरवून केले होते. कंगना ज्यावेळी महाराष्ट्राची बदनामी करत होती त्यावेळी भाजप नेते मात्र खुश होते. त्यामुळे भाजपच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो अशाप्रकारे भाजपचे नेते कुटिल कारस्थान करत असतील तर राज्यातील जनता भाजपला माफ करणार नाही, असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा - कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्यांची यादी एनसीबीला द्यावी - उर्मिला मातोंडकर

हेही वाचा - पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान - अनिल देशमुख

मुंबई - कंगना राणौतने ज्याप्रकारे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी केली त्यामागे तिचे शब्द आणि एकूणच त्यासाठीचे कारस्थान हे भाजपचे नेते करत होते, ते आता उघड पडले असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी कंगना राणौत यांच्या ट्वीटचा आधार घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

बोलताना सचिन सावंत

भाजपने तिला बोलण्यासाठी पाठवले होते

सचिन सावंत म्हणाले, कंगनाने काल (रविवार) ज्याप्रमाणे ट्विट केले आणि त्यातून तिने आपला कबूलनामाच दिला आहे. मागील काळात तिने महाराष्ट्राची बदनामी केली. तसेच मुंबई पोलिसांचा माफिया म्हणून उल्लेख केला तसेच मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख हा तिच्याकडून सतत केला जात होता. त्यामागे भाजपने कारस्थान रचले होते, ते कंगनाच्या माध्यमातून केले जात होते हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे तिला भाजपने तिला यावर बोलण्यासाठी पाठवले होते हेही यातून दिसून येते, असा दावाही सावंत यांनी केला.

...तर जनता भाजपला माफ करणार नाही

कंगना राणौत ज्या भाषेत बोलत होती, त्या भाषेचे सर्व स्क्रिप्ट हे भाजपकडून तयार करून देण्यात आले होते, हे सुद्धा आता स्पष्ट झालेले आहे. याच दरम्यान तिला केंद्राकडून ज्याप्रकारे 'वाय' दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली हे सर्वकाही भाजपने ठरवून केले होते. कंगना ज्यावेळी महाराष्ट्राची बदनामी करत होती त्यावेळी भाजप नेते मात्र खुश होते. त्यामुळे भाजपच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो अशाप्रकारे भाजपचे नेते कुटिल कारस्थान करत असतील तर राज्यातील जनता भाजपला माफ करणार नाही, असेही सावंत म्हणाले.

हेही वाचा - कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्यांची यादी एनसीबीला द्यावी - उर्मिला मातोंडकर

हेही वाचा - पोलीस बांधवांच्या मानवतावादी कामगिरीचा सदैव अभिमान - अनिल देशमुख

Last Updated : Jan 4, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.