ETV Bharat / state

गोसीखुर्द तसेच कोकणातील प्रकल्पांना प्राधान्याने पुर्ण करा - मुख्यमंत्री

author img

By

Published : Jan 13, 2021, 6:39 AM IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प संदर्भात पुर्ण करण्यासाठी अडीअडणी येत आहेत. त्यामुळे निधी आणि पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे प्रश्न मार्गी लावतानाच प्रकल्प पुर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

प्रकल्पांना प्राधान्याने पुर्ण करा - मुख्यमंत्री
प्रकल्पांना प्राधान्याने पुर्ण करा - मुख्यमंत्री

मुंबई – राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यामुळे स‍िंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती अडीअडचणी व प्रकल्प पुर्ण करण्यासाठी असलेल्या उपाय यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.

प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी पाऊले उचला
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प संदर्भात पुर्ण करण्यासाठी अडीअडणी येत आहेत. त्यामुळे निधी आणि पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे प्रश्न मार्गी लावतानाच प्रकल्प पुर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्या प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत, असेही ठाकरे म्हणाले.

जलसंपदा मंत्री – जयंत पाटील
जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घ्यावा. त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पुर्ण होऊन राज्यातील ओलीत क्षेत्र वाढेल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पुर्ण करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
यावेळी गोसीखुर्द राष्टीय प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माटे यांनी संगणकीय सादरीकरण करुन येथील प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते.

मुंबई – राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही तातडीने करावी. ज्यामुळे स‍िंचनाचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ तसेच कोकण पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती अडीअडचणी व प्रकल्प पुर्ण करण्यासाठी असलेल्या उपाय यासंदर्भातील बैठकीचे आयोजन वर्षा निवासस्थानी करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले.

प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी पाऊले उचला
गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प संदर्भात पुर्ण करण्यासाठी अडीअडणी येत आहेत. त्यामुळे निधी आणि पुनर्वसन संदर्भातील प्रश्नांची या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे प्रश्न मार्गी लावतानाच प्रकल्प पुर्तीसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन संदर्भातील काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी जलसंपदा अपर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांसोबत एकत्रित बैठक घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे कोकणात सुरु असलेले प्रकल्प, मागील काळात त्यामध्ये आलेले अडथळे याबाबतही सविस्तर चर्चा झाली. त्या प्रकल्पांना पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत, असेही ठाकरे म्हणाले.

जलसंपदा मंत्री – जयंत पाटील
जलसंपदा विभागाअंतर्गत सुरु असलेल्या राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घ्यावा. त्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून ते पुर्ण करण्यासाठी अधिकचा निधी कसा मिळेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत. ज्यामुळे येत्या तीन-चार वर्षात हे प्रकल्प पुर्ण होऊन राज्यातील ओलीत क्षेत्र वाढेल, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मानवतेच्या दृष्टीकोनातून प्राधान्याने पुर्ण करावा, अशी सूचना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
यावेळी गोसीखुर्द राष्टीय प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अंकुर देसाई व कोंकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माटे यांनी संगणकीय सादरीकरण करुन येथील प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार सुनिल तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव (जलसंपदा), विजयकुमार गौतम, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे व इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थ‍ित होते.

हेही वाचा - 'मुख्यमंत्र्यांवर बंगले, तर त्यांच्या मंत्र्यांवर बायको लपवण्याचा आरोप'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.