ETV Bharat / state

शंकरराव चव्हाण यांनी दाखविलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार - मुख्यमंत्री ठाकरे

author img

By

Published : Jul 14, 2020, 6:01 PM IST

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 वा जयंती सोहळा सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता.

cm news
cm news

मुंबई - जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या‍ विचारांना घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 14 जुलै) केले.

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशाचे माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा “आधुनिक भगीरथ” हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. तो वाचला गेला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. आज प्रकाशित झालेल्या ‘लोकराज्य’च्या दिवंगत शंकरराव चव्हाण विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते.
स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रुपांतर करतांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार काढले.

सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. माजी मुख्यमंत्री दिवंगत चव्हाण कडक शिस्तीचे होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तर म्हटले जाई. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरु करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजच्या युगात असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगात आई-वडिलांसारखा गुरु नाही. त्यांच्या कडक शिस्तीत घडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मंत्रिमंडळात माझे सहकारी म्हणून काम करतात याचा आनंद आहे. दिवंगत चव्हाण यांना घरातही शिस्त लागायची, दंगा आवडायचा नाही, असे हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होते. मी शाळेत असतांना शंकररावांना पाहिले होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्या.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य निर्मितीनंतर विविध योजना आणून राज्याचा विकास करण्याचे मोठे कार्य माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी केले. दिवंगत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला व्हावे यासाठी ‘आधुनिक भगीरथ’ हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यंदा राज्याचा हिरक महोत्सव आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण होणे ही आजची गरज आहे. चव्हाण यांच्यावरील गौरव ग्रंथ व लोकराज्यच्या विशेषांकातील मान्यवरांचे विचार आणि दिवंगत चव्हाण यांच्याबद्दलची माहिती ही केवळ त्यांची वैयक्तिक माहिती नसून राज्याच्या सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीचे चित्र आहे. वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टितूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात मोलाचा सल्ला देण्याचे काम त्यांनी केले. दिवंगत चव्हाण यांचे विचार, दूरदृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोचणे आवश्यक असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.

मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, माजी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. माजी मुख्यमंत्री दिवंगत चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्य शासनाने अनेक विकास कामे सुरू केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत. ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ आणि लोकराज्यचा विशेषांक हे वाचनीय व संग्राह्य झाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. कठोर प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला, तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील. चव्हाण साहेबांचे जल नियोजनातील काम हे अतुलनीय आहे. जायकवाडी, उजनी सारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे आहेत. जल नियोजनातून पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे त्यांच्या गौरव ग्रंथाला दिलेले ‘आधुनिक भगीरथ’ हे नाव सार्थ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई - जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी गृहमंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या‍ विचारांना घेऊन, त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. 14 जुलै) केले.

माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 100 व्या जयंती दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळाने निर्मिती केलेल्या ‘आधुनिक भगीरथ’ या गौरवग्रंथाचे तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाच्या विशेषांकाचे आणि दै. सत्यप्रभाच्या विशेषकांचे प्रकाशन मुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, देशाचे माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे वर्णन एका वाक्यात करणे शक्य नाही. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारा “आधुनिक भगीरथ” हा गौरवग्रंथ प्रकाशित करण्याची संधी मला मिळाली, त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. हा ग्रंथ तळागाळात गेला पाहिजे. तो वाचला गेला पाहिजे. ग्रंथातील विचारांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दिसत असतो. आज प्रकाशित झालेल्या ‘लोकराज्य’च्या दिवंगत शंकरराव चव्हाण विशेषांकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाकली, तरी त्यांचे सर्वस्पर्शी नेतृत्व दिसून येते.
स्वातंत्र्याची जपणूक करताना आणि त्याचे स्वराज्यात रुपांतर करतांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणारे शंकरराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व होते, असे गौरवोद्गार काढले.

सुजलाम सुफलाम राज्य निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले. माजी मुख्यमंत्री दिवंगत चव्हाण कडक शिस्तीचे होते, त्यामुळे त्यांना हेडमास्तर म्हटले जाई. त्यांनी सचिवालयाचे मंत्रालय असे नामकरण करणे असो किंवा भोंगा वाजवून वेळेत काम सुरु करण्याची कल्पना असो, त्यांचे कार्य आणि विचार नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजच्या युगात असे व्यक्तिमत्त्व सापडणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले.

जगात आई-वडिलांसारखा गुरु नाही. त्यांच्या कडक शिस्तीत घडलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे आज मंत्रिमंडळात माझे सहकारी म्हणून काम करतात याचा आनंद आहे. दिवंगत चव्हाण यांना घरातही शिस्त लागायची, दंगा आवडायचा नाही, असे हे शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व होते. मी शाळेत असतांना शंकररावांना पाहिले होते. त्यांच्या बातम्यांमधूनही त्यांची शिस्त डोकावायची, माणूस कडक वाटायचा अशा आठवणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितल्या.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्य निर्मितीनंतर विविध योजना आणून राज्याचा विकास करण्याचे मोठे कार्य माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी केले. दिवंगत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाचा लाभ नवीन पिढीला व्हावे यासाठी ‘आधुनिक भगीरथ’ हा ग्रंथ उपयुक्त ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, यंदा राज्याचा हिरक महोत्सव आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण होणे ही आजची गरज आहे. चव्हाण यांच्यावरील गौरव ग्रंथ व लोकराज्यच्या विशेषांकातील मान्यवरांचे विचार आणि दिवंगत चव्हाण यांच्याबद्दलची माहिती ही केवळ त्यांची वैयक्तिक माहिती नसून राज्याच्या सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीचे चित्र आहे. वीज, शेती, पाटबंधारे आदी क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या दूरदृष्टितूनच राज्यात विद्युत प्रकल्प व धरणांची निर्मिती झाली. देशाच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयात मोलाचा सल्ला देण्याचे काम त्यांनी केले. दिवंगत चव्हाण यांचे विचार, दूरदृष्टिकोन नवीन पिढीपर्यंत पोचणे आवश्यक असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.

मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, माजी गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. माजी मुख्यमंत्री दिवंगत चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज्य शासनाने अनेक विकास कामे सुरू केली आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणे, भोकर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणे, जल संवर्धनात काम करणाऱ्यांसाठी जलपुरस्कार देणे आदी उपक्रम राबविले आहेत. ‘आधुनिक भगीरथ’ गौरव ग्रंथ आणि लोकराज्यचा विशेषांक हे वाचनीय व संग्राह्य झाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी राज्याच्या प्रशासनाला वेगळी दिशा दिली. कठोर प्रशासक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला, तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगता येतील. चव्हाण साहेबांचे जल नियोजनातील काम हे अतुलनीय आहे. जायकवाडी, उजनी सारखी धरणे ही त्यांच्या उत्तम जलनियोजनाची उदाहरणे आहेत. जल नियोजनातून पाण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे त्यांच्या गौरव ग्रंथाला दिलेले ‘आधुनिक भगीरथ’ हे नाव सार्थ असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.