ETV Bharat / state

तिरंगा वाचवणाऱ्या 'त्या' बहाद्दराचा राज्य शासनाकडून गौरव

author img

By

Published : Feb 19, 2020, 9:15 PM IST

माझगाव येथील जीएसटी भवनाला लागलेल्या आगीतून ९ मजल्यावरील तिरंगा जीवाची पर्वा न करता सुखरुप खाली आणणाऱ्या कुलाण जाधव यांचा शासनाकडून सत्कार करण्यात आला.

कुणाल जाधव यांचा गौरव करताना मंत्री
कुणाल जाधव यांचा गौरव करताना मंत्री

मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. त्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप उतरवून खाली आणण्याचे काम येथील शिपाई कुणाल जाधव यांनी केले होते. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सह्यादी अतिथीगृहात छोटेखानी सत्कार केला.

कुणाल जाधव यांचा गौरव करताना मंत्री

कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 18 फेब्रुवारी) ट्वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत केले. या प्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, क्रीडामंत्री सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.

कुणाल जाधव हे जीएसटी भवनला शिपाई म्हणून कार्यरत असून, आग लागली तेव्हा ते तळमजल्यावर होते. बचावकार्य सुरू असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे 9 मजले पळत जाऊन तिरंगा सुखरूप खाली आणला. त्यांच्या शौर्याचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे.

हेही वाचा - ..तर ठाकरे सरकारने खुलासा करावा, आरे बचावच्या कार्यकर्त्यांची मागणी

मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनला दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. त्या आगीत जीवाची पर्वा न करता इमारतीवरील राष्ट्रध्वज सुखरूप उतरवून खाली आणण्याचे काम येथील शिपाई कुणाल जाधव यांनी केले होते. त्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज सह्यादी अतिथीगृहात छोटेखानी सत्कार केला.

कुणाल जाधव यांचा गौरव करताना मंत्री

कुणाल जाधव यांच्या शौर्याची बातमी वाचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 18 फेब्रुवारी) ट्वीटरवरून त्यांच्या कर्तव्य भावनेची प्रशंसा केली होती. आज मुंबईत आल्यानंतर त्यांनी जाधव यांना ‘सह्याद्री’वर बोलावून घेतले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांना सन्मानीत केले. या प्रसंगी जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, क्रीडामंत्री सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.

कुणाल जाधव हे जीएसटी भवनला शिपाई म्हणून कार्यरत असून, आग लागली तेव्हा ते तळमजल्यावर होते. बचावकार्य सुरू असताना इमारतीवरील तिरंगा तसाच असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावून पेटत्या इमारतीचे 9 मजले पळत जाऊन तिरंगा सुखरूप खाली आणला. त्यांच्या शौर्याचे सर्वत्र मोठे कौतूक होत आहे.

हेही वाचा - ..तर ठाकरे सरकारने खुलासा करावा, आरे बचावच्या कार्यकर्त्यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.