ETV Bharat / state

Shelar criticized Aditya Thackeray : मोदी सरकार मुंबईला आयआयएमचे गिफ्ट देणार, कावीळ झालेल्यांना ते दिसेल का - आशिष शेलार

author img

By

Published : Jul 15, 2023, 7:33 PM IST

मोदी सरकार मुंबईला आयआयएमचे गिफ्ट देणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मुंबईतील पवई येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला आयआयएमची मान्यता मिळणार असल्याची माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. ही माहिती देत असताना आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी नेहमी विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

आशिष शेलार
आशिष शेलार

भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार

मुंबई : मोदी सरकारने मुंबईला अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले आयआयएम भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय झाला असून लवकरच हे विधेयक सभागृहात चर्चेला येणार असल्याची माहिती भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग आयआयएमची मान्यता मिळणार आहे. याचे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे, यावरुन बोलताना आशिष शेलार यांनी उबाठा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी नेहमी महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली, असल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.



आयआयएमची मान्यता : मुंबईकरांना लवकरच नवीन आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. याबाबत बोलताना भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, मुंबई भारतीय जनता पक्ष आणि मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. कारण 65 वर्ष काँग्रेसचे राज्य असताना मुंबईकरांना जे भेटले नाही, असे नवीन आयआयएम मुंबईला भेटणार आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई( नीटी)ला आयआयएमची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच मुंबईत 350 जागा एमबीएच्या घेवून हे आयआयएम सुरू होणार आहे. इतकी मोठी भेट केंद्राकडून मुंबईला भेटत असताना कुठल्याही एकाही विरोधी पक्षाने त्याची प्रशंसा व त्याला दाद दिली नाही.

महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका: दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात नेहमी विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली असल्याचे सांगत त्याचे दाखले शेलार यांनी दिले. शेलार म्हणाले की, ज्यांना कावीळ झाली आहे, त्यांना सर्व पिवळे दिसते. आदित्य ठाकरे यांना ती होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आजकाल पावसानंतरचे आजार पसरत आहेत. तसेच त्यांना राजकीय कावीळ झाली आहे का? हा प्रश्न मी त्यांना नक्की विचारेन, असा टोला शेलार यांनी यावेळी लगावला. आदित्य ठाकरे यांनी नेहमीच महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांचे सरकार असताना राज्यात विद्यापीठांच्या विरोधातले निर्णय घेतले गेले. हे निर्णयसुद्धा कुलगुरूंच्या, कुलपतींच्या दालनात न घेता आदित्य ठाकरे यांच्या दालनात घेतले गेल्याची टीका शेलार यांनी केली.

विद्यापीठाच्या स्वायत्ततेला बट्टा लावण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊ नये असा तुघलकी निर्णयसुद्धा आदित्य ठाकरे यांनी घेतला होता. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या माथी करोना पदवीधर असा शिक्का लावून त्यांना भेटणाऱ्या संधीपासून परावृत्त करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचा आरोपही शेलार यांनी केला. त्याचबरोबर विद्यापीठात थेट राजकीय नेमणुका करण्याचा कायद्यातील बदल हा आदित्य ठाकरे यांचाच होता. - आशिष शेलार

निदान सभागृहात पाठिंबा द्या : आदित्य ठाकरे इज इक्वल टू विद्यार्थ्यांचा विकासाचा विरोध असेच म्हणावे लागेल. मोदी सरकार मुंबईला आयआयएम भेट देत आहे. निदान त्यांनी याबाबत ट्विट करावे किंवा प्रतिक्रिया द्यावी, अशी आमची इच्छा नाही. परंतु सभागृहात त्यांचे जे काही थोडेफार खासदार उरले आहेत. या खासदरांनी जेव्हा हे विधेयक चर्चेला येईल, तेव्हा या विधेयकाच्या बाजूने बोलावे. एवढे केले तरी खूप होईल, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Ashish Shelar on Vajramuth Sabha: वज्रमूठ सभेसाठी सर्वात छोटे मैदान; भविष्यात नरे पार्कातच सभा- आशिष शेलार यांची टीका
  2. Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना हिंदूंबाबत इतकी चीड का? आशिष शेलारांचा घणाघात
  3. Ashish Shelar News: शिवसेना चिन्हाच्या वादात आशिष शेलारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर म्हणाले...मर्यादेत राहा

भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार

मुंबई : मोदी सरकारने मुंबईला अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले आयआयएम भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय झाला असून लवकरच हे विधेयक सभागृहात चर्चेला येणार असल्याची माहिती भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत याविषयीची माहिती दिली. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग आयआयएमची मान्यता मिळणार आहे. याचे विधेयक लवकरच संसदेत मांडले जाणार आहे, यावरुन बोलताना आशिष शेलार यांनी उबाठा नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरे यांनी नेहमी महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली, असल्याचा आरोपही शेलार यांनी यावेळी केला.



आयआयएमची मान्यता : मुंबईकरांना लवकरच नवीन आयआयएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच त्याला मान्यता दिली आहे. याबाबत बोलताना भाजप नेते, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, मुंबई भारतीय जनता पक्ष आणि मुंबईकरांच्या वतीने मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. कारण 65 वर्ष काँग्रेसचे राज्य असताना मुंबईकरांना जे भेटले नाही, असे नवीन आयआयएम मुंबईला भेटणार आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाने त्याला मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजीनियरिंग, पवई( नीटी)ला आयआयएमची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता तरुणांना अन्य राज्यात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच मुंबईत 350 जागा एमबीएच्या घेवून हे आयआयएम सुरू होणार आहे. इतकी मोठी भेट केंद्राकडून मुंबईला भेटत असताना कुठल्याही एकाही विरोधी पक्षाने त्याची प्रशंसा व त्याला दाद दिली नाही.

महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका: दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात नेहमी विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली असल्याचे सांगत त्याचे दाखले शेलार यांनी दिले. शेलार म्हणाले की, ज्यांना कावीळ झाली आहे, त्यांना सर्व पिवळे दिसते. आदित्य ठाकरे यांना ती होऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आजकाल पावसानंतरचे आजार पसरत आहेत. तसेच त्यांना राजकीय कावीळ झाली आहे का? हा प्रश्न मी त्यांना नक्की विचारेन, असा टोला शेलार यांनी यावेळी लगावला. आदित्य ठाकरे यांनी नेहमीच महाराष्ट्रात विद्यार्थी विरोधी भूमिका घेतली आहे. त्यांचे सरकार असताना राज्यात विद्यापीठांच्या विरोधातले निर्णय घेतले गेले. हे निर्णयसुद्धा कुलगुरूंच्या, कुलपतींच्या दालनात न घेता आदित्य ठाकरे यांच्या दालनात घेतले गेल्याची टीका शेलार यांनी केली.

विद्यापीठाच्या स्वायत्ततेला बट्टा लावण्याचे काम आदित्य ठाकरे यांनी केले. पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊ नये असा तुघलकी निर्णयसुद्धा आदित्य ठाकरे यांनी घेतला होता. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या माथी करोना पदवीधर असा शिक्का लावून त्यांना भेटणाऱ्या संधीपासून परावृत्त करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतल्याचा आरोपही शेलार यांनी केला. त्याचबरोबर विद्यापीठात थेट राजकीय नेमणुका करण्याचा कायद्यातील बदल हा आदित्य ठाकरे यांचाच होता. - आशिष शेलार

निदान सभागृहात पाठिंबा द्या : आदित्य ठाकरे इज इक्वल टू विद्यार्थ्यांचा विकासाचा विरोध असेच म्हणावे लागेल. मोदी सरकार मुंबईला आयआयएम भेट देत आहे. निदान त्यांनी याबाबत ट्विट करावे किंवा प्रतिक्रिया द्यावी, अशी आमची इच्छा नाही. परंतु सभागृहात त्यांचे जे काही थोडेफार खासदार उरले आहेत. या खासदरांनी जेव्हा हे विधेयक चर्चेला येईल, तेव्हा या विधेयकाच्या बाजूने बोलावे. एवढे केले तरी खूप होईल, असा खोचक टोलाही शेलार यांनी लगावला आहे.

हेही वाचा -

  1. Ashish Shelar on Vajramuth Sabha: वज्रमूठ सभेसाठी सर्वात छोटे मैदान; भविष्यात नरे पार्कातच सभा- आशिष शेलार यांची टीका
  2. Ashish Shelar on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना हिंदूंबाबत इतकी चीड का? आशिष शेलारांचा घणाघात
  3. Ashish Shelar News: शिवसेना चिन्हाच्या वादात आशिष शेलारांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर म्हणाले...मर्यादेत राहा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.