ETV Bharat / state

ठाकरे सरकारचे खातेवाटप लवकरच.. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरूच

author img

By

Published : Jan 1, 2020, 5:40 PM IST

Updated : Jan 1, 2020, 6:57 PM IST

काँग्रेसला दोन महत्वाची खाती हवी आहेत, असे बोलले जात आहे. त्यावर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, थोड्या फार अडचणी आहेत. त्यावर आज आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, लवकरच चर्चेअंती खाते वाटप जाहीर करण्यात येईल असेही चव्हाण म्हणाले.

खाते वाटप लवकरच.. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरूच
खाते वाटप लवकरच.. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरूच

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन २ दिवस झाले. मात्र, अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही. खाते वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना या तिन्ही पक्षामध्ये काही खात्यावरून मतभेद असल्याचे कारण समोर येत आहे. मात्र, लवकरच खातेवाटपावर चर्चा करून मंत्र्यांना खाते वाटप करण्यात येईल. शक्यतो आजच खाते वाटपासंदर्भात चर्चा करून ते जाहीर करण्यात येईल,असे मत महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे सरकारचे खातेवाटप लवकरच..

खाते वाटपापर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, लवकरच खाते वाटप करण्यात येईल, आधी मंत्रिमंडळ विस्तार होतो. त्यानंतर खाते वाटप होत असते. खाते वाटपाची प्रक्रियाही अशा प्रकारे २ दिवस चालतच असते. तसेच तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे एकत्र बसून चर्चा करावी लागते. काँग्रेसमुळे खातेवाटपाला उशीर झाला नाही.


मंत्रिमंडळात जागा कमी आणि आमदार जास्त आहेत. त्यामुळे सगळ्यांना मंत्रीपद मिळणे अशक्य आहे. प्रणिती शिंदे , संग्राम थोपटे यांच्यासाऱख्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

काँग्रेसला दोन महत्वाची खाती हवी आहेत, असे बोलले जात आहे. त्यावर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, थोड्या फार अडचणी आहेत. त्यावर आज आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, लवकरच चर्चेअंती खातेवाटप जाहीर करण्यात येईल, असेही चव्हाण म्हणाले.

खातेवाटपाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खाते वाटपाचे काम लवकरच पूर्ण होईल. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि ते लवकरच जाहीर करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन २ दिवस झाले. मात्र, अद्याप खाते वाटप करण्यात आले नाही. खाते वाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना या तिन्ही पक्षामध्ये काही खात्यावरून मतभेद असल्याचे कारण समोर येत आहे. मात्र, लवकरच खातेवाटपावर चर्चा करून मंत्र्यांना खाते वाटप करण्यात येईल. शक्यतो आजच खाते वाटपासंदर्भात चर्चा करून ते जाहीर करण्यात येईल,असे मत महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

ठाकरे सरकारचे खातेवाटप लवकरच..

खाते वाटपापर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, लवकरच खाते वाटप करण्यात येईल, आधी मंत्रिमंडळ विस्तार होतो. त्यानंतर खाते वाटप होत असते. खाते वाटपाची प्रक्रियाही अशा प्रकारे २ दिवस चालतच असते. तसेच तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे एकत्र बसून चर्चा करावी लागते. काँग्रेसमुळे खातेवाटपाला उशीर झाला नाही.


मंत्रिमंडळात जागा कमी आणि आमदार जास्त आहेत. त्यामुळे सगळ्यांना मंत्रीपद मिळणे अशक्य आहे. प्रणिती शिंदे , संग्राम थोपटे यांच्यासाऱख्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

काँग्रेसला दोन महत्वाची खाती हवी आहेत, असे बोलले जात आहे. त्यावर मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, थोड्या फार अडचणी आहेत. त्यावर आज आम्ही चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, लवकरच चर्चेअंती खातेवाटप जाहीर करण्यात येईल, असेही चव्हाण म्हणाले.

खातेवाटपाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, खाते वाटपाचे काम लवकरच पूर्ण होईल. त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि ते लवकरच जाहीर करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Last Updated : Jan 1, 2020, 6:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.