मुंबई : अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. आज अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. अजिप पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे ४० आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे केवळ आमदारच नाही तर 2 खासदारही अजित पवारांसोबत गेले आहेत. सध्या खासदार सुनील तटकरे आणि अमोल कोल्हे हे दोघेही राजभवनात आहेत. त्यामुळे शरद पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
'या' आमदारांनी घेतली शपत : अजित पवारांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप निर्माण केला आहे. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे जवळपास 40 आमदार फोडून राष्ट्रवादीत उभी फूट पाडली आहे. अजित पवार आता महाराष्ट्र राज्याचे नवे उपमुख्यमंत्री असून त्यांच्यासोबत 9 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यात अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीम, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्राम, अनिल भाईदास पाटील आदीनी आता प्रर्यंत शपत घेतली आहे.
9 आमदार सरकारमध्ये सामील : अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्याने अजित पवार नाराज झाले होते. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याकडे 40 आमदारांची पाठिंब्याची पत्रे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे दोन खासदारही अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत, त्यांचीही केंद्रात जबाबदारी आहे का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.