ETV Bharat / state

झालं गेलं गंगेला मिळालं, आता नवी सुरुवात - अजित पवार - झालं गेलं गंगेला मिळालं, आता नवी सुरुवात

रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या ३७ दिवसात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. झालं गेलं गंगेला मिळाले. आता नवी सुरुवात, नवी पहाट अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

ajit pawar comment on cabinet expand in mumbai
अजित पवार
author img

By

Published : Dec 30, 2019, 7:02 PM IST

मुंबई - रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या ३७ दिवसात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नवी सुरुवात, नवी पहाट अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

झालं गेलं गंगेला मिळालं, आता नवी सुरुवात - अजित पवार


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. अवघ्या 80 तासात आवश्यक संख्याबळ नसल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आजही राज्यपाल कोश्यारी यांनी पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. त्यांनी सांगितले, की आता जाऊ द्या सगळं, झालं गेलं विसरून जायचं, नवी सुरुवात आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे आता कसलाही विचार न करता जनतेसाठी काम करायचे असे अजित पवार म्हणाले.

मुंबई - रखडलेला ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गेल्या ३७ दिवसात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. झालं गेलं गंगेला मिळालं. आता नवी सुरुवात, नवी पहाट अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

झालं गेलं गंगेला मिळालं, आता नवी सुरुवात - अजित पवार


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 23 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. अवघ्या 80 तासात आवश्यक संख्याबळ नसल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आजही राज्यपाल कोश्यारी यांनी पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. त्यांनी सांगितले, की आता जाऊ द्या सगळं, झालं गेलं विसरून जायचं, नवी सुरुवात आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे, बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे आता कसलाही विचार न करता जनतेसाठी काम करायचे असे अजित पवार म्हणाले.

Intro:झाले गेले गंगेला मिळाले, आता नवी सुरुवात नवी पहाट- अजित पवार

मुंबई 30

गेल्या अवघ्या 37 दिवसात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आता, झालं गेली गंगेला मिळाले. आता नवी सुरुवात नवी पाहट असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी 23 नोव्हेम्बर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती. अवघ्या 80 तासात आवश्यक संख्याबळ नसल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आजही राज्यपाल कोशयारी यांनी पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथ घेतल्या नंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रशांत पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देताना सांगितले की, आता जाऊ द्या सगळं, झालं गेलं विसरून जायचं , नवी सुरुवात आहे . राज्यात अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे , बेरोजगारांची प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे आता कसलाही विचार न करता जनतेसाठी काम करायचे आहे. Body:.....Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.