मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत संभाजीनगर येथे विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमादरम्यान केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध (After Governors statement about Shivaji Maharaj) महाराष्ट्र तसेच देशाच्या प्रत्यक स्तरातून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भवनची सुरक्षा वाढविण्यात येत आहे.
राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातील मराठा संघटना (Maratha organization aggressive) आणि राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राजभावनाबाहेरील आज सुरक्षा व्यवस्था पोलिसांकडून वाढवण्यात (Raj Bhavans security increased) आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य सहन केलं जाणार नाही, असा इशारा काही मराठा संघटना कडून देण्यात आलेला आहे. आणि या विरोधात राजभवनावर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. तसेच आज मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन केली जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजभवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
संभाजीनगर येथे झालेल्या विद्यापीठाच्या दीक्षांत कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या युगाचे आदर्श आहेत, असं वक्तव्य छत्रपती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं आणि याचाच निषेध कालपासून सर्व स्तरातून नोंदवला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत सातत्याने राज्यपाल अक्षयपार्य वक्तव्य करत आहेत. त्यामुळे राज्यपाल पदाची गरीमा ठेवत राज्यपालांनी वक्तव्य करावेत, असे इशारे राज्यपालांना राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे येथे बोलतांना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीची अर्थ लावला जात असल्याचे म्हणटले. यावरुन भाजप तर्फे कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावर पांघरुन घालण्याचे कार्य केले जात असल्याचे सांगितले आहे.