ETV Bharat / state

मुंबईत दीड लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई, ९ कोटी ५० लाखांचा दंड वसूल

author img

By

Published : Jun 4, 2021, 4:09 PM IST

मुंबईत रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली जात आहे. 20 एप्रिल 2021 ते मे 2021 या काळात 1 लाख 50 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. यातून मध्य रेल्वेने 9 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

mumbai
मुंबई

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. 20 एप्रिल 2021 ते मे 2021 या काळात 1 लाख 50 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. यातून मध्य रेल्वेने 9 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अशी केली कारवाई

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 20 एप्रिल 2021 ते मे 2021पर्यंत उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीची मोहिम राबवली. मे महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवाशांची 54 हजार प्रकरणे आढळून आली. त्यातून 3 कोटी 33 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये उपनगरीय भागातील 32 हजार प्रकरणांचा समावेश आहे. त्यात 1 कोटी 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय गैर-उपनगरीय विभागात 22 हजार प्रकरणांचा समावेश आहे. त्यातून 1 कोटी 68 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन

उपनगरीय आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग करणे, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे मिळालेल्या तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करणे, अशी प्रकरणे प्रामुख्याने समोर आली. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

हेही वाचा - यंदा आषाढी वारी झालीच पाहिजे; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून विनातिकीट आणि अनियमित तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तिकीट तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. 20 एप्रिल 2021 ते मे 2021 या काळात 1 लाख 50 हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले. यातून मध्य रेल्वेने 9 कोटी 5 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अशी केली कारवाई

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने 20 एप्रिल 2021 ते मे 2021पर्यंत उपनगरीय लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणीची मोहिम राबवली. मे महिन्यात विनातिकीट/अनियमित प्रवाशांची 54 हजार प्रकरणे आढळून आली. त्यातून 3 कोटी 33 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये उपनगरीय भागातील 32 हजार प्रकरणांचा समावेश आहे. त्यात 1 कोटी 65 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय गैर-उपनगरीय विभागात 22 हजार प्रकरणांचा समावेश आहे. त्यातून 1 कोटी 68 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन

उपनगरीय आणि बाहेरगावच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोहिमेदरम्यान ज्येष्ठ नागरिक कोट्याचा दुरुपयोग करणे, बदललेल्या तिकिटावर प्रवास करणे, सिस्टमद्वारे मिळालेल्या तिकिटांचे ई-तिकिटांमध्ये रूपांतर करणे, तिकिटांच्या रंगीत झेरॉक्सने प्रवास करणे, बनावट ओळखपत्रांसह प्रवास करणे, तिकिटांचे हस्तांतरण करणे, अशी प्रकरणे प्रामुख्याने समोर आली. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

हेही वाचा - यंदा आषाढी वारी झालीच पाहिजे; भाजपा अध्यात्मिक आघाडीची मागणी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.