ETV Bharat / state

घातवार...मुंबई बनली 'तुंबई'; पावसामुळे एका दिवसात २६ जणांचा मृत्यू

author img

By

Published : Jul 2, 2019, 10:00 PM IST

Updated : Jul 2, 2019, 10:23 PM IST

मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून २२ जणांचा बळी गेला. मुलुंड येथे सुरक्षा भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. विलेपार्ले येथे शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर मालाड सब वे येथे पाणी साचल्याने स्कॉर्पियो गाडीमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला.

मुंबई तुंबई

मुंबई - गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्र रूप धारण केले. रात्री ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल झाले. घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढावी लागली. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत विविध घटनांमध्ये तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घातवार...मुंबई बनली 'तुंबई'; पावसामुळे एका दिवसात २६ जणांचा मृत्यू

कधी संततधार, तर कधी मुसळधार बरसत गेले चार दिवस ठाण मांडून बसलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्ररूप धारण करत मुंबईकरांची दैना उडवून दिली. जवळपास ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस पडल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी तब्बल ३०० पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी मध्यरात्री १ ते ३ या दोन तासाच्या कालावधीत २५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. रोद्ररुप धारण केलेल्या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप येऊन रस्ते वाहतूक कोलमडली होती. ठप्प झालेली मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल १४ तासांनी सुरू झाली.

मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून २२ जणांचा बळी गेला. मुलुंड येथे सुरक्षा भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. विलेपार्ले येथे शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर मालाड सब वे येथे पाणी साचल्याने स्कॉर्पियो गाडीमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात घडलेल्या या विविध घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चांदिवलीत जमीन खचल्याने तेथील इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या मातोश्री परिसरातही गुडघाभर पाणी साचले होते. मिठी नदीचे पाणी साचल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरुप आले होते. परिसरातील १६०० कुटुंबीयांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

घाटकोपर पूर्वेला पंतनगर व जवळच असलेल्या खाडीपर्यंत सर्वत्र गुडघाभर पाणी साचले होते. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर क्र.१ मधील म्हाडाच्या बैठ्या चाळीत घराघरात पाणी शिरले. कुर्ल्यात राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले. २४ तासात कुलाबा येथे ५७१.५ मिमी व सांताक्रुझ येथे ९८२.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धावणारी मुंबई कोलमडून पडली. रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याने तिन्ही रेल्वे मार्ग ठप्प झाले होते. हार्बर व मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी १४ तासानंतर सुरू झाली.

७७ बसचे मार्ग बदलले --

जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या बसेसना मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे ७७ बसेसचे मार्ग बदलण्यात आले होते. ५८ बसेस पाण्यात अडकल्या होत्या, तर १५२ बसेस नादुरुस्त झाल्या. त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

५३ ठिकाणी पाणी साचले --

वांद्रे पूर्व, कलानगर, माहीम, हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड, मानखुर्द, गोवंडी, चुनाभट्टी, या सखल भागात पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात खार लिंक रोड, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी सबवे, जोगेश्वरी स्थानक आणि हायवेनजीक, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

चांदिवलीत जमीन खचली --

चांदिवलीच्या संघर्षनगर आणि क्रांतीनगर परिसरात पावसाचे पाणी भरल्याने हाहाकार उडाला. येथे तलावाचे स्वरुप आले. संघर्षनगरात जमीन खचल्याने दोन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. येथे या दोन इमारतीच्या बाजूला एका बिल्डरचे बांधकाम सुरू होते. बांधकाम करताना या दोन इमारतीच्या मधोमध संरक्षक भिंत बांधणे आवश्यक होते. मात्र, ती बांधलेली नसल्याने या इमारतीच्या बाजूच्या आतील भाग खोल होत जाऊन येथील जमीन खचल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. येथील असलेल्या सर्व इमारती एसआरएच्या आहेत. दरम्य़ान, या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

कुर्ल्यातील रस्ते पाण्याखाली -

कुर्ल्यात रस्ते पाण्याखाली गेलेच आहेत, पण दुकाने आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी भरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. घरे आणि दुकानात शिरलेलं पाणी ओसरण्याऐवजी वाढतच चालल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पालिकेने नौदलाच्या आयएनएस तानाजी आणि एनडीएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण केल्याने या दोन्ही पथकानं लाइफ जॅकेट आणि बोटीच्या साहय्याने १६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्यात वृद्ध आणि लहानग्यांचा समावेश आहे. या दोन्ही पथकांनी रहिवाश्यांप्रमाणेच त्यांच्या मोटरसायकल, घरातील महत्त्वाच्या वस्तूही सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत.

मुंबई - गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्र रूप धारण केले. रात्री ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल झाले. घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढावी लागली. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत विविध घटनांमध्ये तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

घातवार...मुंबई बनली 'तुंबई'; पावसामुळे एका दिवसात २६ जणांचा मृत्यू

कधी संततधार, तर कधी मुसळधार बरसत गेले चार दिवस ठाण मांडून बसलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्ररूप धारण करत मुंबईकरांची दैना उडवून दिली. जवळपास ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी पाऊस पडल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी तब्बल ३०० पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी मध्यरात्री १ ते ३ या दोन तासाच्या कालावधीत २५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. रोद्ररुप धारण केलेल्या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप येऊन रस्ते वाहतूक कोलमडली होती. ठप्प झालेली मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल १४ तासांनी सुरू झाली.

मालाडमध्ये मध्यरात्री भिंत कोसळून २२ जणांचा बळी गेला. मुलुंड येथे सुरक्षा भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. विलेपार्ले येथे शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला, तर मालाड सब वे येथे पाणी साचल्याने स्कॉर्पियो गाडीमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दिवसभरात घडलेल्या या विविध घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चांदिवलीत जमीन खचल्याने तेथील इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शिवसेना पक्षप्रमुख राहत असलेल्या मातोश्री परिसरातही गुडघाभर पाणी साचले होते. मिठी नदीचे पाणी साचल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरुप आले होते. परिसरातील १६०० कुटुंबीयांना इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

घाटकोपर पूर्वेला पंतनगर व जवळच असलेल्या खाडीपर्यंत सर्वत्र गुडघाभर पाणी साचले होते. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलालनगर क्र.१ मधील म्हाडाच्या बैठ्या चाळीत घराघरात पाणी शिरले. कुर्ल्यात राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले. २४ तासात कुलाबा येथे ५७१.५ मिमी व सांताक्रुझ येथे ९८२.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धावणारी मुंबई कोलमडून पडली. रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याने तिन्ही रेल्वे मार्ग ठप्प झाले होते. हार्बर व मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी १४ तासानंतर सुरू झाली.

७७ बसचे मार्ग बदलले --

जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या बसेसना मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे ७७ बसेसचे मार्ग बदलण्यात आले होते. ५८ बसेस पाण्यात अडकल्या होत्या, तर १५२ बसेस नादुरुस्त झाल्या. त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

५३ ठिकाणी पाणी साचले --

वांद्रे पूर्व, कलानगर, माहीम, हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड, मानखुर्द, गोवंडी, चुनाभट्टी, या सखल भागात पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात खार लिंक रोड, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी सबवे, जोगेश्वरी स्थानक आणि हायवेनजीक, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

चांदिवलीत जमीन खचली --

चांदिवलीच्या संघर्षनगर आणि क्रांतीनगर परिसरात पावसाचे पाणी भरल्याने हाहाकार उडाला. येथे तलावाचे स्वरुप आले. संघर्षनगरात जमीन खचल्याने दोन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. येथे या दोन इमारतीच्या बाजूला एका बिल्डरचे बांधकाम सुरू होते. बांधकाम करताना या दोन इमारतीच्या मधोमध संरक्षक भिंत बांधणे आवश्यक होते. मात्र, ती बांधलेली नसल्याने या इमारतीच्या बाजूच्या आतील भाग खोल होत जाऊन येथील जमीन खचल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. येथील असलेल्या सर्व इमारती एसआरएच्या आहेत. दरम्य़ान, या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

कुर्ल्यातील रस्ते पाण्याखाली -

कुर्ल्यात रस्ते पाण्याखाली गेलेच आहेत, पण दुकाने आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी भरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. घरे आणि दुकानात शिरलेलं पाणी ओसरण्याऐवजी वाढतच चालल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पालिकेने नौदलाच्या आयएनएस तानाजी आणि एनडीएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण केल्याने या दोन्ही पथकानं लाइफ जॅकेट आणि बोटीच्या साहय्याने १६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्यात वृद्ध आणि लहानग्यांचा समावेश आहे. या दोन्ही पथकांनी रहिवाश्यांप्रमाणेच त्यांच्या मोटरसायकल, घरातील महत्त्वाच्या वस्तूही सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत.

Intro:मुंबई -
मुंबईत गेले चार दिवस सुरु असलेल्या पावसाने काळ रात्री रौद्र रूप धारण केले. रात्री ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी. पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढावी लागली. काल रात्री पासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत विविध घटनांमध्ये तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला आहे. Body:कधी संततधार, तर कधी मुसळधार बरसत गेले चार दिवस ठाण मांडून बसलेल्या पावसाने सोमवारी रात्री रौद्ररूप धारण करीत मुंबईकरांची दैना उडवून दिली. जवळपास ४ ते ५ तासात सुमारे ४०० मिमी. पाऊस कोसळल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी तब्बल ३०० पेक्षा अधिक मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी मध्यरात्री १ ते ३ या दोन तासाच्या कालावधीत २५० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. घराघरात पाणी घुसले, घाबरून लोकांनी रात्र जागून काढली. पावसाने रोद्ररुप धारण केलेल्या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरूप येऊन रस्ते वाहतूक कोलमडली. ठप्प झालेली मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक तब्बल १४ तासांनी सुरु झाली.

मालाडमध्ये मध्यरात्री भींत कोसळून २२ जणांचा बळी गेला. मुलुंड येथे सुरक्षा भिंत कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. विलेपार्ले येथे शॉक लागून दोन जणांचा मृत्यू झाला. तर मालाड सब वे येथे पाणी साचल्याने स्कॉर्पियो गाडीमध्ये गुदमरून दोन जणांचा मृत्यू झाला. आज दिवस भरात घडलेल्या या विविध घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चांदिवलीत जमीन खचल्याने तेथील इमारती रिकाम्या करण्यात आल्या. शिवसेना पक्ष प्रमुख राहत असलेल्या मातोश्री परिसरातही गुघडाभर पाणी साचले होते. मिठी नदीचे पाणी साचल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरुप आले होते. परिसरातील १६०० कुटुंबीयांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले.

घाटकोपर पूर्वेला पंतनगर व जवळच असलेल्या खाडीपर्यंत सर्वत्र गुडघाभर पाणी साचले. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर क्र.१ मधील म्हाडाच्या बैठ्या चाळीत घराघरात पाणी शिरले. कुर्ल्यात राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांच्या घरातही गुडघाभर पाणी शिरले. २४ तासांत कुलाबा येथे ५७१.५ मिमी व सांताक्रुझ येथे ९८२.२ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धावणारी मुंबई कोलमडून पडली. रेल्वे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी आल्याने तीन्ही रेल्वे मार्ग ठप्प झाले होते. हार्बर व मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी १४ तासानंतर सुरु झाली.

७७ बसचे मार्ग बदलले --
जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे बेस्टच्या बसेसना मार्ग काढणे कठीण झाले होते. त्यामुळे ७७ बसेसचे मार्ग बदलण्यात आले होते. ५८ बसेस पाण्यात अडकल्या होत्या. तर १५२ बसेस नादुरुस्त झाल्या. त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

५३ ठिकाणी पाणी साचले --
वांद्रे पूर्व, कलानगर, माहीम, हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, भांडूप, मुलुंड, मानखुर्द, गोवंडी, चुनाभट्टी, या सखल भागात पाणी साचले होते. पश्चिम उपनगरात खार लिंक रोड, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी सबवे, जोगेश्वरी स्थानक आणि हायवेनजीक, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

चांदिवलीत जमीन खचली --
चांदीवलीच्या संघर्ष नगर आणि क्रांतीनगर परिसरात पावसाचे पाणी भरल्याने हाहाकार उडाला. येथे तलावाचे स्वरुप आले. संघर्ष नगरात जमीन खचल्याने दोन इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. येथे या दोन इमारतीच्या बाजूला एका बिल्डरचे बांधकाम सुरु होते. बांधकाम करताना या दोन इमारतीच्या मधोमध संरक्षक भिंत बांधणे आवश्यक होते. मात्र ती बांधलेली नसल्याने या इमारतीच्या बाजूच्या आतील भाग खोल होत जाऊन येथील जमीन खचल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. येथील असलेल्या सर्व इमारती एसआरएच्या आहेत. दरम्य़ान, या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

कुर्ल्यातील रस्ते पाण्याखाली --
कुर्ल्यात रस्ते पाण्याखाली गेलेच आहेत. पण दुकाने आणि घरांमध्ये कमरेपर्यंत पाणी भरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली आहे. घरे आणि दुकानात शिरलेलं पाणी ओसरण्याऐवजी वाढतच चालल्याने येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पालिकेने नौदलाच्या आयएनएस तानाजी आणि एनडीएफच्या टीमला घटनास्थळी पाचारण केल्याने या दोन्ही पथकानं लाइफ जॅकेट आणि बोटीच्या साहय्याने १६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. त्यात वृद्ध आणि लहानग्यांचा समावेश आहे. या दोन्ही पथकांनी रहिवाश्यांप्रमाणेच त्यांच्या मोटरसायकल, घरातील महत्त्वाच्या वस्तूही सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत.

बातमीसाठी काल रात्रीपासूनच्या दुर्घटनांचे vis वापरावेत Conclusion:
Last Updated : Jul 2, 2019, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.