ETV Bharat / state

Gower: राज्यात गोवरचे थैमान! राज्यात ११,३९० संशयित रुग्ण

author img

By

Published : Nov 29, 2022, 8:46 PM IST

राज्यात गेल्या ३ वर्षापेक्षा यंदा गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत ११ हजार ३९० गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ७१७ रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे. तर १४ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी ठाणे हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

राज्यात गोवरचे थैमान! राज्यात ११,३९० संशयित रुग्ण
राज्यात गोवरचे थैमान! राज्यात ११,३९० संशयित रुग्ण

मुंबई - राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत ११ हजार ३९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ७१७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १४ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १०, भिवंडीत ३ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १४ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्याच्या ४, १२ ते २४ महिन्याच्या ८ तर २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षाच्या २ बालकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६ मुलींचा तर ८ मुलांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हानिहाय गोवरचा प्रसार - मुंबईत ४०६२ संशयित रुग्ण असून ३०३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ७८१ संशयित रुग्ण असून ७० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ७९३ संशयित रुग्ण असून ४८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ४८९ संशयित रुग्ण असून ४४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. ठाणे जिल्हा येथे १३० संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई - विरार मनपा येथे १७६ संशयित रुग्ण असून ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १४६ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २३० संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. औरंगाबाद येथे ९६ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे २५६ संशयित रुग्ण असून ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

केंद्र सरकार सूचना - देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत.

संशयित रुग्ण -
२०१९ - १,३३७
२०२० - २,१५०
२०२१ - ३,६६८
२८ नोव्हेंबर २०२२ - ११,३९०

मुंबई - राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी २८ नोव्हेंबरपर्यंत ११ हजार ३९० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ७१७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १४ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत १०, भिवंडीत ३ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १४ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्याच्या ४, १२ ते २४ महिन्याच्या ८ तर २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षाच्या २ बालकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६ मुलींचा तर ८ मुलांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हानिहाय गोवरचा प्रसार - मुंबईत ४०६२ संशयित रुग्ण असून ३०३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ७८१ संशयित रुग्ण असून ७० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ७९३ संशयित रुग्ण असून ४८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ४८९ संशयित रुग्ण असून ४४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. ठाणे जिल्हा येथे १३० संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई - विरार मनपा येथे १७६ संशयित रुग्ण असून ११ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १४६ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २३० संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. औरंगाबाद येथे ९६ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे २५६ संशयित रुग्ण असून ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

केंद्र सरकार सूचना - देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत.

संशयित रुग्ण -
२०१९ - १,३३७
२०२० - २,१५०
२०२१ - ३,६६८
२८ नोव्हेंबर २०२२ - ११,३९०

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.