ETV Bharat / state

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांनी केले रास्ता रोको

बोरावटी येथील नम्रताचा सहा महिन्यांपूर्वी लातुरातील मनोज घोरपडे यांच्याशी विवाह झाला होता. मनोज हा एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी नम्रता रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

author img

By

Published : Jan 7, 2020, 8:24 AM IST

suspected-death-of-a-women-protest-in-latur
suspected-death-of-a-women-protest-in-latur

लातूर - येथील लातूर-अंबाजोगाई महामार्गावर बोटरवटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. सासरच्या मंडळीने छळ करून मुलीची हत्या केल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी हे आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने बोरवटीच्या संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला.

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

हेही वाचा- अनुराग कश्यपने बदलला ट्विटर प्रोफाईल फोटो, अनुभव सिन्हाने डागले टीकास्त्र

बोरावटी येथील नम्रताचा सहा महिन्यांपूर्वी लातुरातील मनोज घोरपडे यांच्याशी विवाह झाला होता. मनोज हा एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी नम्रता रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला उपचारासाठी लातुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळीने शारीरिक, मानसिक त्रास देऊन तिला मारहाण करून, रेल्वे रुळावर टाकल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. असे असूनही सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नसल्याने बोरावटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको केला. यात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दुतर्फा वाहनकोंडी झाली होती. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लातूर - येथील लातूर-अंबाजोगाई महामार्गावर बोटरवटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. सासरच्या मंडळीने छळ करून मुलीची हत्या केल्याचा आरोप करत मुलीच्या नातेवाईकांनी हे आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने बोरवटीच्या संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला.

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

हेही वाचा- अनुराग कश्यपने बदलला ट्विटर प्रोफाईल फोटो, अनुभव सिन्हाने डागले टीकास्त्र

बोरावटी येथील नम्रताचा सहा महिन्यांपूर्वी लातुरातील मनोज घोरपडे यांच्याशी विवाह झाला होता. मनोज हा एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी नम्रता रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तिला उपचारासाठी लातुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सासरच्या मंडळीने शारीरिक, मानसिक त्रास देऊन तिला मारहाण करून, रेल्वे रुळावर टाकल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. असे असूनही सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नसल्याने बोरावटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको केला. यात ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दुतर्फा वाहनकोंडी झाली होती. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Intro:बाईट : मयत मुलीचे वडील

विवाहितेचा संशयास्पद मृत्यू ; सासरच्या मंडळीला अटकेसाठी रास्ता रोको
लातूर : सासरच्या मंडळीने अमानुष छळ करून मुलीला रेल्वे रुळावर टाकले आणि यामध्येच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला. सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी वेळकाढूपणा केल्याने बोरवटीच्या संतप्त ग्रामस्थांनी अंबाजोगाई- लातूर महामार्गावर रास्तारोको केला. ग्रामस्थाच्या आक्रमक पवित्र्यानंतर गुन्हा नोंद करण्याची सुरू आहे.
Body:बोरावटी येथील नम्रता हिचा सहा महिन्यांपूर्वी लातूरतील मनोज घोरपडे यांच्याशी विवाह झाला होता. मनोज हा एका फायनान्स कंपनीत काम करीत होता. दोन दिवसांपूर्वी नम्रता ही रेल्वे रुळावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. त्यानंतर उपचारासाठी लातूरतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून आता सासरच्या मंडळीने शारीरिक त्रास देऊन तिला मारहाण करून रेल्वे रुळावर टाकल्याचा आरोप केला आहे. असे असूनही सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल होत नसल्याने बोरावटीच्या ग्रामस्थांनी रास्तारोको केला होता. गावच्या मुलीचा अशाप्रकारे खून केल्याचा आरोप करीत सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे दुतर्फा वाहनकोंडी झाली होती. Conclusion:ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून सध्या गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.