ETV Bharat / state

लातूर लोकसभा मतदारसंघः काँग्रेस की भाजप? मतदारांची उत्सुकता शिगेला तर उमेदवारांमध्ये धाकधूक

author img

By

Published : May 20, 2019, 7:34 PM IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकर आणि एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लातूर मतदारसंघात भाजप वर्चस्व कायम ठेवणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट  पोलने वर्तवला असताना सर्वसामान्य नागरिक मात्र, परिवर्तन अटळ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

लातूर लोकसभा निवडणूकीचा निकाल विषयावर नागरिकांशी बातचित करताना आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे....

लातूर - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकर आणि एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लातूर मतदारसंघात भाजप वर्चस्व कायम ठेवणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला असताना सर्वसामान्य नागरिक मात्र, परिवर्तन अटळ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

लातूर लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नागरिकांशी बातचित करताना आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे....


लातूर मतदारसंघ 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन आणि मोदी लाट यामुळे स्थानिक संस्थांपासून ते लोकसभा पर्यंतच्या जागेवर परिवर्तन झाले. लातुरात काँग्रेसला गतवैभव मिळविण्याच्या दृष्टीने आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घालत मोदी सरकार कसे अपयशी ठरले हे पटवून दिले. तर 5 वर्षातील विकासकामे आणि राष्ट्रहित या मुद्यांवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लक्ष केंद्रित केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेल्या प्रचार सभा यावरून भाजप आपले वर्चस्व कायम ठेवण्यात सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चित्र मतदान प्रक्रियेदरम्यान होते. राष्ट्रहिताचा मुद्दा आणि केंद्रात मोदी सरकारच यावरून एक्झिट पोलचे अंदाजही भाजपच्या बाजूने आहेत. मात्र, असे असतानाही सर्वसामान्य मतदारांना यंदा परिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वास आहे. 5 वर्षातील सरकारची धोरणे आणि प्रत्यक्ष जनतेला झालेला लाभ यातून प्रचंड नाराजी आहे. आणि हीच बाब 23 मे रोजी निकालातून स्पष्ट होणार असल्याचा विश्वास सर्वसामान्यांना आहे.


तर दुसरीकडे आजही मोदी लाट कायम असून विकासकामांचा गती देण्यासाठी मोदी सरकारच सर्वसामान्यांच्या फायद्याचे राहणार असल्याचा सूर उमटत आहे. शिवाय एकही एक्झिट पोलने भाजपबाबत दुमत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे एक्झिट पोल आणि सर्वसामान्य नागरिक यांची मते यामुळे मात्र उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शिवाय लातूर मतदार संघातील चित्र निकालाशिवाय स्पष्टच होणार नसल्याने, नागरिकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे.


आपणच जिंकणार भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे -
सर्वच एक्झिट पोल भाजपच्या बाजूने आहेत. लातुरात भाजपचे वर्चस्व कायम राहणार असून गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य यंदा असेल. 5 वर्षातील विकासकामे आणि मोदी प्रती असलेला विश्वास या दोन गोष्टी विजयासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. मोदी सरकार स्थापनेत लातूरच्या जागेचाही समावेश असेल हे नक्की असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला.


निकालाची वाट पाहा काँग्रेसचे उमेदवार मंच्छिद्र कामंत -
लोकसभेची निवडणूक ही जनतेनेच हाती घेतली होती. त्यामुळे गेल्या 5 वर्षात विकास कामे काय झाली याची जाण जनतेला आहे. शिवाय एक्झिट पोल तंतोतंत खरेच ठरलीत असे नाही. त्याहीपेक्षा येथील जनतेला काय अपेक्षित आहे हे महत्वाचे आहे. त्यामुळे 23 मेची वाट पाहणे आवश्यक असल्याचेही काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांनी स्पष्ट केले.

लातूर - लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. तसेच सर्वसामान्य लातूरकर आणि एक्झिट पोलने वर्तवलेले अंदाज यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लातूर मतदारसंघात भाजप वर्चस्व कायम ठेवणार असल्याचा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला असताना सर्वसामान्य नागरिक मात्र, परिवर्तन अटळ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

लातूर लोकसभा निवडणूकीच्या निकालावर नागरिकांशी बातचित करताना आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र खराडे....


लातूर मतदारसंघ 2014 पर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन आणि मोदी लाट यामुळे स्थानिक संस्थांपासून ते लोकसभा पर्यंतच्या जागेवर परिवर्तन झाले. लातुरात काँग्रेसला गतवैभव मिळविण्याच्या दृष्टीने आमदार अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. त्यांनी स्थानिक मुद्द्यांना हात घालत मोदी सरकार कसे अपयशी ठरले हे पटवून दिले. तर 5 वर्षातील विकासकामे आणि राष्ट्रहित या मुद्यांवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लक्ष केंद्रित केले होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेल्या प्रचार सभा यावरून भाजप आपले वर्चस्व कायम ठेवण्यात सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चित्र मतदान प्रक्रियेदरम्यान होते. राष्ट्रहिताचा मुद्दा आणि केंद्रात मोदी सरकारच यावरून एक्झिट पोलचे अंदाजही भाजपच्या बाजूने आहेत. मात्र, असे असतानाही सर्वसामान्य मतदारांना यंदा परिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वास आहे. 5 वर्षातील सरकारची धोरणे आणि प्रत्यक्ष जनतेला झालेला लाभ यातून प्रचंड नाराजी आहे. आणि हीच बाब 23 मे रोजी निकालातून स्पष्ट होणार असल्याचा विश्वास सर्वसामान्यांना आहे.


तर दुसरीकडे आजही मोदी लाट कायम असून विकासकामांचा गती देण्यासाठी मोदी सरकारच सर्वसामान्यांच्या फायद्याचे राहणार असल्याचा सूर उमटत आहे. शिवाय एकही एक्झिट पोलने भाजपबाबत दुमत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे एक्झिट पोल आणि सर्वसामान्य नागरिक यांची मते यामुळे मात्र उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शिवाय लातूर मतदार संघातील चित्र निकालाशिवाय स्पष्टच होणार नसल्याने, नागरिकांची उत्सुकता शिंगेला पोहचली आहे.


आपणच जिंकणार भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे -
सर्वच एक्झिट पोल भाजपच्या बाजूने आहेत. लातुरात भाजपचे वर्चस्व कायम राहणार असून गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य यंदा असेल. 5 वर्षातील विकासकामे आणि मोदी प्रती असलेला विश्वास या दोन गोष्टी विजयासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. मोदी सरकार स्थापनेत लातूरच्या जागेचाही समावेश असेल हे नक्की असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला.


निकालाची वाट पाहा काँग्रेसचे उमेदवार मंच्छिद्र कामंत -
लोकसभेची निवडणूक ही जनतेनेच हाती घेतली होती. त्यामुळे गेल्या 5 वर्षात विकास कामे काय झाली याची जाण जनतेला आहे. शिवाय एक्झिट पोल तंतोतंत खरेच ठरलीत असे नाही. त्याहीपेक्षा येथील जनतेला काय अपेक्षित आहे हे महत्वाचे आहे. त्यामुळे 23 मेची वाट पाहणे आवश्यक असल्याचेही काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांनी स्पष्ट केले.

Intro:बाईट : 1) प्रेरणा होनराव, भाजपा प्रवक्त्या
2) व्यंकटेश पुरी, काँग्रेस प्रवक्ता
काँग्रेस की भाजप? मतदारांची उत्सुकता शिघेला तर उमेदवारांमध्ये धाकधूक
लातूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसावर येऊन ठेपला असता सर्वसामान्य लातूरकर आणि एक्सिट पोल वर्तीवलेले अंदाज यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लातूर मतदारसंघात भाजपा वर्चस्व कायम ठेवणार असल्याचा अंदाज एक्सिट पोलने वर्तीवला असताना सर्वसामान्य नागरिक मात्र, परिवर्तन अटळ असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे नागिरीकांची उत्सुकता शिघेला पोहचली आहे तर उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.



Body:2014 पर्यंत लातूर मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन आणि मोदी लाट यामुळे स्थानिक संस्थांपासून ते लोकसभा पर्यंतच्या जागेवर परिवर्तन झाले होते. लातुरात काँग्रेसला गतवैभव मिळविण्याच्या दृष्टीने आ. अमित देशमुख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. स्थानिक मुद्द्यांना हात घालत मोदी सरकार कसे अपयशी ठरले हे पटवून दिले जात होते तर 5 वर्षातील विकासकामे आणि राष्ट्रहित या मुद्यांवर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लक्ष केंद्रित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेल्या प्रचार सभा यावरून भाजपा आपले वर्चस्व कायम ठेवण्यात सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे चित्र मतदान प्रक्रियेदरम्यान होते. राष्ट्रहिताचा मुद्दा आणि केंद्रात मोदी सरकारच यावरून एक्सिट पोलचे अंदाजही भाजपच्या बाजूने आहेत. मात्र, असे असतानाही सर्वसामान्य मतदारांना यंदा परिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वास आहे. 5 वर्षातील सरकारची धोरणे आणि प्रत्यक्ष जनतेला झालेला लाभ यातून प्रचंड नाराजी आहे. आणि हीच बाब 23 मे च्या निकालातून स्पष्ट होणार असल्याचा विश्वास सर्वसामान्यांना आहे. तर दुसरीकडे आजही मोदी लाट कायम असून विकासकामांचा गती देण्यासाठी मोदी सरकारच सर्वसामान्यांच्या फायद्याचे राहणार असल्याचा सूर उमटत आहे. शिवाय एकही एक्सिट पोलने भाजपबाबत दुमत व्यक्त केलेले नाही. त्यामुळे एक्सिट पोल आणि सर्वसामान्य नागरिक यांची मते यामुळे मात्र उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शिवाय लातूर मतदार संघातील चित्र निकलाशिवाय स्पष्टच होणार नसल्याचे मत व्यक्त होत असल्याने नागिरीकांची उत्सुकता शिघेला पोहचली आहे.


Conclusion:सुधाकर शृंगारे--- सर्वच एक्सिट पोल भाजपच्या बाजूने आहेत. लातुरात भाजपचे वर्चस्व कायम राहणार असून गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य असेल. 5 वर्षातील विकासकामे आणि मोदीप्रति असलेला विश्वास या दोन गोष्टी विजयासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. मोदी सरकार स्थापनेत लातूरच्या जागेचाही समावेश असेल हे नक्की असल्याचा विश्वास भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला.

मॅचिंद्र कामंत---- लोकसभेची निवडणूक ही जनतेनेच हाती घेतली होती. त्यामुळे गेल्या 5 वर्षात विकास कामे काय झाली याची जाण जनतेला आहे. शिवाय एक्सिट पोल तंतोतंत खरेच ठरलीत असे नाही. त्याहीपेक्षा येथील जनतेला काय अपेक्षित आहे हे महत्वाचे. त्यामुळे 23 मे ची वाट पाहणे आवश्यक असल्याचेही काँग्रेसचे उमेदवार मॅचिंद्र कामंत यांनी स्पष्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.