ETV Bharat / state

लातूरमधील २१ गावांचा मतदानावर बहिष्कार, पीकविमा न मिळाल्याची तक्रार

मागील काही वर्षापासून पाऊस कमी झाल्याने रब्बीची पीके धोक्यात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांचा वीमा बँकेत भरला. पण, लातूर जिल्ह्यातील २१ गावांच्या शेतकऱ्यांना ही रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे हे शेतकरी पीकांना तर मुकलेच, शिवाय त्याची नुकसान भरपाईसुद्धा त्यांना मिळाली नाही.

author img

By

Published : Mar 31, 2019, 11:16 AM IST

लातूर जिल्ह्यातील २१ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे

लातूर - शेतकऱ्यांना २०१७ ते १८ च्या रब्बी पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, शिरुर अनंतपाळ आणि चाकूर या तालुक्यातील २१ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा आंदोलने करुनही मोबदला मिळाला नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आहे.

पिकविम्याची रक्कम भरुनही आम्हाला मोबदला मिळाला नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे

मागील काही वर्षापासून पाऊस कमी झाल्याने रब्बीची पिके धोक्यात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांचा वीमा बँकेत भरला. पण, लातूर जिल्ह्यातील २१ गावांच्या शेतकऱ्यांना ही रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे हे शेतकरी पीकांना तर मुकलेच, शिवाय त्याची नुकसान भरपाईसुद्धा त्यांना मिळाली नाही. यात शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव, वांजरखेडा, सावरगाव, सुमठाणा आणि डिघोळ तर चाकूर तालुक्यातील १६ गावचे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत.

पीकविमा कंपनीचे कर्मचारी तुमचा समावेश पुढील टप्प्यात होईल, असे सांगतात. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. विम्याची रक्कम तर दूर, पण अदा केलेली रक्कमही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे बहिष्काराचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. निदान मतांसाठी का होईना, प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

लातूर - शेतकऱ्यांना २०१७ ते १८ च्या रब्बी पीकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, शिरुर अनंतपाळ आणि चाकूर या तालुक्यातील २१ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा आंदोलने करुनही मोबदला मिळाला नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आहे.

पिकविम्याची रक्कम भरुनही आम्हाला मोबदला मिळाला नाही अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे

मागील काही वर्षापासून पाऊस कमी झाल्याने रब्बीची पिके धोक्यात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांचा वीमा बँकेत भरला. पण, लातूर जिल्ह्यातील २१ गावांच्या शेतकऱ्यांना ही रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे हे शेतकरी पीकांना तर मुकलेच, शिवाय त्याची नुकसान भरपाईसुद्धा त्यांना मिळाली नाही. यात शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव, वांजरखेडा, सावरगाव, सुमठाणा आणि डिघोळ तर चाकूर तालुक्यातील १६ गावचे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत.

पीकविमा कंपनीचे कर्मचारी तुमचा समावेश पुढील टप्प्यात होईल, असे सांगतात. प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. विम्याची रक्कम तर दूर, पण अदा केलेली रक्कमही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे बहिष्काराचे हत्यार शेतकऱ्यांनी उपसले आहे. निदान मतांसाठी का होईना, प्रशासन आपल्या मागण्यांकडे लक्ष देईल अशी त्यांना अपेक्षा आहे.

Intro:पिकविम्यापासून वंचित गावांचा मतदानावर बहिष्कार...!
लातूर - गेल्या वर्षभरापासून अहमदपूर, शिरुरअनंतपाळ व चाकूर तालुक्यातील काही गावे २०१७ - १८ च्या रब्बी पिक विम्यापासून वंचित आहेत. पिकविमा पदरी पडला नसल्याने या गावातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा लातूर येथील विमा कंपनीच्या कार्यालयात आंदोलने केली आहेत. मात्र, आश्वासनापलिकडे काहीच मिळाले नसल्याने आता या २१ गावातील ग्रामस्थांनी चक्क लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे ठरिवले आहे. या संदर्भात गावातच बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
Body:सन २०१७ - १८ मध्ये निसर्गाच्या लहरीपाणमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात होती. पिकविम्याच्या माध्यमातून रक्कम पदरी पडेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी विमा रक्कम संबंधित बँकामध्ये भरला होता. तीन महिन्यापुर्वीच अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, शिरुरअनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव, वांजरखेडा, सावरगाव, सुमठाणा आणि डिघोळ तर चाकूर तालुकक्यातील १६ या गावचे शेतकरी वंचितच राहिली आहेत. केवळ पुढील टप्प्यात आपल्या गावचा समावेश असल्याचे पिकविमा कंपनीकडून सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात कोणतिही कारवाई न झाल्याने आज दुष्काळाच्या भयावह स्थितीमध्ये शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. विमा रक्कम तर दूरच परंतू अदा केलेली रक्कमही शेतकºयांना न मिळाल्याने संपात व्यक्त होत आहे. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव शनिवारी गावस्तरावर घेतला आहे. दुसरीकडे मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन कार्यरत असतानाच तब्बल १६ गावच्या ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयावर कसा तोडगा काढला जाणार याकडे लक्ष राहणार आहे. Conclusion:शिवाय अशा तक्रारी दाखल झाल्यास अधिकाऱ्यांना मध्यस्ती करून तोडगा काढला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.