ETV Bharat / state

लातुरात शेतीला आग, फळपिकांसह शेतीमालाचे मोठे नुकसान - रोकडा सावरगाव

रोकडा सावरगाव येथील उमाकांत संतराम बेल्लाळे यांच्या शेतात अचानक आग लागली होती. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

लातुरातील रोकडा सावरगाव येथील शेतात लागलेली आग
author img

By

Published : Mar 29, 2019, 3:07 PM IST

लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रोकडा सावरगावात शेतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये फळपिकांसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

रोकडा सावरगाव येथील उमाकांत संतराम बेल्लाळे यांच्या शेतात अचानक आग लागली होती. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बेल्लाळे यांच्या शेतीमधील ऊस, हळद, आंबा आदी फळझाडे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच ठिबक साहित्य व स्प्रिंकलर साहित्य जळून राख झाले आहे.

भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. आता उभी पिके डोळ्यासमोर जळून भस्मसात झाली. यावेळी शेतकऱ्यांची लहान मुले देखील मिळेल तिथून पाणी आणत पिके वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या २ दिवसापासून जिल्ह्यात आगीच्या घटना घडत आहे. बुधवारीही औसा तालुक्यात आगीमुळे पशुधन जखमी झाले होते.

लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील रोकडा सावरगावात शेतीला अचानक आग लागल्याची घटना घडली. यामध्ये फळपिकांसह शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

रोकडा सावरगाव येथील उमाकांत संतराम बेल्लाळे यांच्या शेतात अचानक आग लागली होती. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बेल्लाळे यांच्या शेतीमधील ऊस, हळद, आंबा आदी फळझाडे तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच ठिबक साहित्य व स्प्रिंकलर साहित्य जळून राख झाले आहे.

भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झाला आहे. आता उभी पिके डोळ्यासमोर जळून भस्मसात झाली. यावेळी शेतकऱ्यांची लहान मुले देखील मिळेल तिथून पाणी आणत पिके वाचवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या २ दिवसापासून जिल्ह्यात आगीच्या घटना घडत आहे. बुधवारीही औसा तालुक्यात आगीमुळे पशुधन जखमी झाले होते.

Intro:आगीचे सत्र सुरूच : रोकडा सावरगावात आगीने जळाली फळझाडे
लातुर : सलग दोन दिवस जिल्ह्यात आगीच्या घटना घडल्या असून यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. बुधवारी औसा तालुक्यात आगीमुळे पशुधन जखमी झाले होते तर गुरुवारी तालुक्यातील रोकडा सावरगावात अचानक लागलेल्या आगीने फळपिकांसह शेतीमालाचे नुकसान झाले आहे. Body:येथील उमाकांत संतराम बेल्लाळे यांच्या शेतात अचानक आग लागली होती. नेमकी आग कशाने लागली याचे आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बेल्लाळे यांच्या शेतीमधील ऊस, हळद, आंबा आदी फळझाडे व पिकांचे नुकसान मोठे झाले आहे. या सोबतच ठिबक साहित्य व स्प्रिंकलर साहित्य जळून राख झाले आहे. यामुळे दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकरी अगोदरच आसमानी व सुलतानी संकटात असताना त्यात या एका आपत्तीत भरच पडली आहे. अशा भीषण दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल असून जिथे पिण्यासाठी पाणी नाही त्या ठिकाणी पोटच्या पोरा गत स्वतःचे पिके जपत असताना उभी पिके डोळ्यासमोर जळून भस्मसात झाली. यावेळी शेतकऱ्यांची लहान मुले देखील मिळेल तिथून पाणी आणुन पिके वाचवण्याचा प्रयत्न करत होती. Conclusion:नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.