ETV Bharat / state

'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन शेतमजूर असून, लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार गेला आहे. १७ ते १८ रुपये इतक्या कमी दराने व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्याला दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.

author img

By

Published : Aug 19, 2020, 11:47 AM IST

Updated : Aug 19, 2020, 12:03 PM IST

राजू शेट्टी
राजू शेट्टी

कोल्हापूर - दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून स्टेट बँक चौकातून मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'
'दुधाला अनुदान मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे, आरपारची लढाई सुरू ठेवून शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना न्याय मिळविण्यासाठी तयार राहा,' असे आवाहनही शेट्टी यांनी केले. या मोर्चात जिल्हाभरातून हजारो शेतकरी सहभागी होणार असून लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून हे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन शेतमजूर असून, लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार गेला आहे. १७ ते १८ रुपये इतक्या कमी दराने व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्याला दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान प्रतिकिलो ३० रुपये दिले जावे, दूध पावडर-तूप-बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावे व शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदान जमा करावे, अशा मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. २१ जुलैला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूर दरवाढीसाठी लाक्षणिक उपोषण केले होते.

कोल्हापूर - दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून स्टेट बँक चौकातून मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'
'दुधाला अनुदान मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे, आरपारची लढाई सुरू ठेवून शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना न्याय मिळविण्यासाठी तयार राहा,' असे आवाहनही शेट्टी यांनी केले. या मोर्चात जिल्हाभरातून हजारो शेतकरी सहभागी होणार असून लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून हे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन शेतमजूर असून, लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार गेला आहे. १७ ते १८ रुपये इतक्या कमी दराने व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्याला दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने घेतलेला १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान प्रतिकिलो ३० रुपये दिले जावे, दूध पावडर-तूप-बटर व अन्य दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करावे व शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये अनुदान जमा करावे, अशा मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. २१ जुलैला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूर दरवाढीसाठी लाक्षणिक उपोषण केले होते.
Last Updated : Aug 19, 2020, 12:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.