ETV Bharat / state

आमचा 'इतक्या' मताधिक्याने विजय होणार - हसन मुश्रीफ

author img

By

Published : Apr 29, 2021, 3:36 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेट्टी यांच्या बाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचे म्हटले.

पप वेळचे छायाचित्र
पप वेळचे छायाचित्र

कोल्हापूर - दूध उत्पादक आम्हालाच निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही दूध उत्पादकांना 85 ते 90 टक्के परतावा कसा देता येईल याबाबत प्रयत्न करू आणि तोच विश्वास गेल्या काही दिवसांपासून आम्ही दूध उत्पादकांना देत आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले. केवळ औपचारिकता बाकी असून विजय आमचाच असल्याचा विश्वास यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राजू शेट्टी यांची भूमिका अनाकलनीय

काल (दि. 28 एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेट्टी यांच्या बाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचे म्हटले. शिवाय अशोक चराटी यांनीही काल (बुधवार) सत्ताधारी गटासोबत असल्याचे जाहीर केले. याबाबत विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, चराटी यांच्यावर काही स्थानिक राजकारणामुळे दबाव टाकला असावा. शिवाय त्यांनी सुरुवातीला जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहतील, अशी खात्री असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले.

धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारण नाही

धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारनात शोधूनही सापडणार नाही, असेही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका भाषणात आमचा एकही टँकर नाही, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पुराव्यासह त्यांना दाखवून दिले आहे. यामुळे त्यांचा हा खोटा चेहरा जनतेसमोर आला असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले. शिवाय आमची अभद्र युती म्हणत आहात मात्र, आम्ही दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र आलो आहे. टँकर वाचवायला आम्ही एकत्र आलो नाही तर तुम्हीच तुमचे टँकर वाचवायला तिथे बसला आहात, असे प्रत्युत्तर यावेळी सतेज पाटील यांनी दिले.

1 हजार मते घेऊन आम्ही विरोधात आलोय, त्यामुळे...

काल सत्ताधारी आघाडीच्या पत्रकार परिषदेत वाढवलेल्या सभासदांमुळे आमचा 400 मतांनी विजय होईल, असे म्हटले होते. याबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, वाढीव सभासदांचे विश्लेषण अगदी साधे आहे. त्यांचे 4 संचालक आमच्याकडे आले, शिवाय आम्ही राष्ट्रवादीचे 500 ते 600 मते अशी जवळपास 1 हजार मते घेऊन आम्ही विरोधात आलो आहे. आमचाच 1 हजार मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला.

हेही वाचा - ठरलं..! राजू शेट्टींचा महाडिक गटाला पाठिंबा; गोकुळ 'मल्टिस्टेट' होणार नसल्याचे आश्वासन

कोल्हापूर - दूध उत्पादक आम्हालाच निवडून देतील याची आम्हाला खात्री आहे. आम्ही दूध उत्पादकांना 85 ते 90 टक्के परतावा कसा देता येईल याबाबत प्रयत्न करू आणि तोच विश्वास गेल्या काही दिवसांपासून आम्ही दूध उत्पादकांना देत आहे. त्यामुळे आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटले. केवळ औपचारिकता बाकी असून विजय आमचाच असल्याचा विश्वास यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

राजू शेट्टी यांची भूमिका अनाकलनीय

काल (दि. 28 एप्रिल) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गोकुळच्या सत्ताधारी गटाला पाठिंबा देत त्यांच्यासोबत असल्याची भूमिका जाहीर केली. यावर बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेट्टी यांच्या बाबत मला काही बोलायचे नाही. मात्र, त्यांनी घेतलेली भूमिका ही अनाकलनीय असल्याचे म्हटले. शिवाय अशोक चराटी यांनीही काल (बुधवार) सत्ताधारी गटासोबत असल्याचे जाहीर केले. याबाबत विचारले असता पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, चराटी यांच्यावर काही स्थानिक राजकारणामुळे दबाव टाकला असावा. शिवाय त्यांनी सुरुवातीला जाहीरपणे घेतलेल्या भूमिकेवर ते ठाम राहतील, अशी खात्री असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले.

धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारण नाही

धनंजय महाडिकांसारखा खोटे बोलणारा माणूस या राजकारनात शोधूनही सापडणार नाही, असेही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका भाषणात आमचा एकही टँकर नाही, असे म्हटले होते. मात्र, आम्ही पुराव्यासह त्यांना दाखवून दिले आहे. यामुळे त्यांचा हा खोटा चेहरा जनतेसमोर आला असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटले. शिवाय आमची अभद्र युती म्हणत आहात मात्र, आम्ही दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र आलो आहे. टँकर वाचवायला आम्ही एकत्र आलो नाही तर तुम्हीच तुमचे टँकर वाचवायला तिथे बसला आहात, असे प्रत्युत्तर यावेळी सतेज पाटील यांनी दिले.

1 हजार मते घेऊन आम्ही विरोधात आलोय, त्यामुळे...

काल सत्ताधारी आघाडीच्या पत्रकार परिषदेत वाढवलेल्या सभासदांमुळे आमचा 400 मतांनी विजय होईल, असे म्हटले होते. याबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, वाढीव सभासदांचे विश्लेषण अगदी साधे आहे. त्यांचे 4 संचालक आमच्याकडे आले, शिवाय आम्ही राष्ट्रवादीचे 500 ते 600 मते अशी जवळपास 1 हजार मते घेऊन आम्ही विरोधात आलो आहे. आमचाच 1 हजार मतांनी विजय होणार असल्याचा विश्वास सुद्धा व्यक्त केला.

हेही वाचा - ठरलं..! राजू शेट्टींचा महाडिक गटाला पाठिंबा; गोकुळ 'मल्टिस्टेट' होणार नसल्याचे आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.