ETV Bharat / state

पुराचा तालमींनाही फटका; कोल्हापुरात पैलवानांवर डाळ-भात खाण्याची वेळ - आहार - विहारावर काटेकोरपणे लक्ष

महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून तालमीमध्ये विजेची सोय नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो देखील पैलवानांना मिळालेला नाही. आहार-विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या पैलवानांनी मागील आठ दिवसांत डाळ भात खाऊन दिवस काढले आहेत.

महापुराचा फटका कोल्हापुरातील पैलवानांना
author img

By

Published : Aug 13, 2019, 8:32 PM IST

Updated : Aug 13, 2019, 8:47 PM IST

कोल्हापूर - महापुराचा फटका येथील तालमीतील अनेक पैलवानांना देखील बसला आहे. येथील बहुतांश पैलवान बाहेर गावावरुन आले आहेत. त्यामुळे महापुराच्या काळात या पैलवानांचे चांगलेच हाल झाले आहेत.

महापुराचा फटका कोल्हापुरातील पैलवानांना

महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून तालमीमध्ये विजेची सोय नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो देखील पैलवानांना मिळालेला नाही. काही सामाजिक संस्थांनी याठिकाणी अन्न - पाण्याची सुविधा पुरवली होती. मात्र, त्यावरच पैलवानांचे फक्त 2 दिवस निघाले.

आहार - विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या पैलवानांनी मागील आठ दिवसांत डाळ भात खाऊन दिवस काढले आहेत. दरम्यान, काही पैलवानांनी आम्हाला खायला नसले, तरी चालेल. पण कोल्हापूरकरांचे जवजीवन लवकरात लवकर सुरळीत झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

कोल्हापूर - महापुराचा फटका येथील तालमीतील अनेक पैलवानांना देखील बसला आहे. येथील बहुतांश पैलवान बाहेर गावावरुन आले आहेत. त्यामुळे महापुराच्या काळात या पैलवानांचे चांगलेच हाल झाले आहेत.

महापुराचा फटका कोल्हापुरातील पैलवानांना

महापुरामुळे मागील आठ दिवसांपासून तालमीमध्ये विजेची सोय नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो देखील पैलवानांना मिळालेला नाही. काही सामाजिक संस्थांनी याठिकाणी अन्न - पाण्याची सुविधा पुरवली होती. मात्र, त्यावरच पैलवानांचे फक्त 2 दिवस निघाले.

आहार - विहारावर काटेकोरपणे लक्ष ठेवणाऱ्या पैलवानांनी मागील आठ दिवसांत डाळ भात खाऊन दिवस काढले आहेत. दरम्यान, काही पैलवानांनी आम्हाला खायला नसले, तरी चालेल. पण कोल्हापूरकरांचे जवजीवन लवकरात लवकर सुरळीत झाले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Intro:कोल्हापुरातील महापुराचा फटका येथील अनेक तालमीतील पैलवानांना देखील बसला आहे. बहुतांश सर्वच पैलवान बाहेरगावांहुन आलेले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून तालमीमध्ये लाईट नाही, प्यायला पाणी नाही, जो नियमित आहार असतो तो सुद्धा त्यांना मिळालेला नाही. काही सामाजिक संस्थांनी याठिकाणी खाण्या पिण्याची गोष्टी पुरवल्या त्यावरच त्यांनी 2 दिवस काढले. पण केवळ डाळ भात खाऊन त्यांनी आठ दिवस काढले आहेत. काही पैलवानांनी आम्हाला खायला राहूदे पण पहिला कोल्हापूरकरांचे हाल पाहवत नाही ते सगळे सुरळीत होऊदेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी...


Body:.


Conclusion:.
Last Updated : Aug 13, 2019, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.