कोल्हापूर - राधानगरी अभयारण्य परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वृक्षसंपदेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक वन्यजीवांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास ५० एकर वनक्षेत्रात ही आग लागली. वाऱ्यामुळे ही आग वाढत गेल्याने ही आग पसरली.
काही स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. राधानगरी अभयारण्य परिसरात अशा प्रकारे आग लागल्याच्या घटना शक्यतो घडल्या नाहीयेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.