ETV Bharat / state

Brinjal Price Today : कांद्यापाठोपाठ वांग्याचा दरही घसरला; किलोमागे केवळ 27 पैसे, शेतकरी हताश

जगाचा अन्नदाता म्हणून पाहिला जाणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती गेल्या काही दिवसात घोर निराशा पडली आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कांद्यापाठोपाठ वांग्याला प्रति किलो केवळ 27 पैसे दर देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बाजार समितीमध्ये हा दर मिळाला आहे, यामध्ये शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नाही. रात्रंदिवस शेतात राबून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे.

author img

By

Published : Mar 9, 2023, 9:10 AM IST

Brinjal Price
वांग्याचे भाव
प्रतिक्रिया देताना शेतकरी

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात कांद्याला दर नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हातात तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त केले. तर भाव मिळत नसल्याने शेतकरी फुकट भाजी वाटल्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातून देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. कांद्यापाठोपाठ वांग्याचे दर देखील घसरले आहे. येथील शेतकऱ्याला प्रति किलो 27 पैसे इतका नीचांकी दर देण्यात आला आहे.

घोर निराशा : कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला आहे. शेतकऱ्याचा पिकातून वाहतुकीचा खर्च देखील निघालेला नाही. हा आजपर्यंतचा सर्वात निश्चित दर आहे. जगदाळे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात, मात्र आज इतक नीचांकी दर त्यांच्या वांगी पिकाला मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पदरी घोर निराशा पडली आहे. जगदाळे यांनी दिनांक 1 मार्च रोजी 237 किलो वांगी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवली होती. तर याची एकूण किंमत ही 592 रुपये देण्यात आली. यातून भाडे आणि हमाली भत्ता वगळून केवळ एकूण 66 रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत. एका बाजूला 27 पैसे इतक्या निश्चांकी दराने शेतकऱ्याकडून वांगी खरेदी केली जात आहे. बाजारात मात्र हीच वांगी 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे.

अवकाळी पावसाचा फटका : यामुळे शेतकऱ्याने देखील अनेक सवाल उपस्थित केले आहे. जो पिकवतो त्याला 27 पैसे आणि ग्राहकाला मात्र 30 ते 40 रुपये किलोने वांगे भेटत असतील, तर मधील पैशांमधील तफावत ही तपासण्याची गरज असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. तसेच सरकार मुंबईमध्ये बसून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणतो. मात्र प्रत्यक्षात कोणीही आमच्या बाजूने नाही, हे खरं सत्य असल्याचे देखील येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांशी दिले आहे. असले तरी अशा पद्धतीने पिकाला किलो मागे 27 रुपये दर मिळत असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

हेही वाचा : Economic Survey 2023 : राज्यावर 'इतक्या' कोटींच्या कर्जाचा डोंगर, पाहा आर्थिक पहाणी अहवाल काय सांगतो

प्रतिक्रिया देताना शेतकरी

कोल्हापूर : गेल्या काही दिवसात कांद्याला दर नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हातात तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त केले. तर भाव मिळत नसल्याने शेतकरी फुकट भाजी वाटल्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातून देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. कांद्यापाठोपाठ वांग्याचे दर देखील घसरले आहे. येथील शेतकऱ्याला प्रति किलो 27 पैसे इतका नीचांकी दर देण्यात आला आहे.

घोर निराशा : कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला आहे. शेतकऱ्याचा पिकातून वाहतुकीचा खर्च देखील निघालेला नाही. हा आजपर्यंतचा सर्वात निश्चित दर आहे. जगदाळे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात, मात्र आज इतक नीचांकी दर त्यांच्या वांगी पिकाला मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पदरी घोर निराशा पडली आहे. जगदाळे यांनी दिनांक 1 मार्च रोजी 237 किलो वांगी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवली होती. तर याची एकूण किंमत ही 592 रुपये देण्यात आली. यातून भाडे आणि हमाली भत्ता वगळून केवळ एकूण 66 रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत. एका बाजूला 27 पैसे इतक्या निश्चांकी दराने शेतकऱ्याकडून वांगी खरेदी केली जात आहे. बाजारात मात्र हीच वांगी 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे.

अवकाळी पावसाचा फटका : यामुळे शेतकऱ्याने देखील अनेक सवाल उपस्थित केले आहे. जो पिकवतो त्याला 27 पैसे आणि ग्राहकाला मात्र 30 ते 40 रुपये किलोने वांगे भेटत असतील, तर मधील पैशांमधील तफावत ही तपासण्याची गरज असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे. तसेच सरकार मुंबईमध्ये बसून आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे म्हणतो. मात्र प्रत्यक्षात कोणीही आमच्या बाजूने नाही, हे खरं सत्य असल्याचे देखील येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे. अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या नुकसानग्रस्त शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांशी दिले आहे. असले तरी अशा पद्धतीने पिकाला किलो मागे 27 रुपये दर मिळत असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे.

हेही वाचा : Economic Survey 2023 : राज्यावर 'इतक्या' कोटींच्या कर्जाचा डोंगर, पाहा आर्थिक पहाणी अहवाल काय सांगतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.