ETV Bharat / state

टाळेबंदीमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ

author img

By

Published : May 31, 2020, 1:54 PM IST

समाजासमोर टाळ्या वाजवत आणि विविध सोहळ्यांना उपस्थिती लावून मिळणाऱ्या पैशांतून स्वतःचे पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांवरही कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

Transgenders Fight Hunger Amid Lack Of Work Due To The Lockdown in jalna
टाळेबंदीमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ

जालना - कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू केलेली संचारबंदी, याचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसला आहे. त्यात टाळ्या वाजवत आणि विविध सोहळ्यांना उपस्थिती लावून मिळणाऱ्या पैशांतून स्वतःचे पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांवरही कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून रेल्वे तसेच बाजारपेठा बंद आहेत. अशा परिस्थितीत तृतीयपंथीयांकडे असलेली जमापुंजी संपली. काही तृतीयपंथीयांनी स्वतःकडे असलेली जमापुंजी गोरगरीबांमध्ये वाटली. पण आता त्यांच्याकडेच खायला काही नसल्याने तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे ते जालना शहरातील विविध चौकांमध्ये उभे राहून वाहनचालकांकडून पैसे मागून जगत आहेत.

टाळेबंदीमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ

सुरक्षिततेच्या कारणास्तव, पोलीस प्रशासनाने तृतीयपंथीयांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नका, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र उपजीविकेचे दुसरे साधन नसल्यामुळे या तृतीयपंथीयांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत, संध्याकाळच्या वेळी ज्या चौकातून पोलीस पहारा संपला आहे. अशा ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांकडे पैशाची मागणी करत आहेत. आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, अशी मागणी या तृतीयपंथीयांनी केली आहे.

हेही वाचा - नगरपालिकेच्या समाज मंदिर आणि शौचालयांचा हातभट्ट्यांसाठी वापर

हेही वाचा - पोलीस दलाचे ड्रम पळवून हातभट्टीसाठी वापर; पन्नास हजाराची दारू जप्त

जालना - कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू केलेली संचारबंदी, याचा फटका समाजातील प्रत्येक घटकाला बसला आहे. त्यात टाळ्या वाजवत आणि विविध सोहळ्यांना उपस्थिती लावून मिळणाऱ्या पैशांतून स्वतःचे पोट भरणाऱ्या तृतीयपंथीयांवरही कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून रेल्वे तसेच बाजारपेठा बंद आहेत. अशा परिस्थितीत तृतीयपंथीयांकडे असलेली जमापुंजी संपली. काही तृतीयपंथीयांनी स्वतःकडे असलेली जमापुंजी गोरगरीबांमध्ये वाटली. पण आता त्यांच्याकडेच खायला काही नसल्याने तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे ते जालना शहरातील विविध चौकांमध्ये उभे राहून वाहनचालकांकडून पैसे मागून जगत आहेत.

टाळेबंदीमुळे तृतीयपंथीयांवर उपासमारीची वेळ

सुरक्षिततेच्या कारणास्तव, पोलीस प्रशासनाने तृतीयपंथीयांना रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नका, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र उपजीविकेचे दुसरे साधन नसल्यामुळे या तृतीयपंथीयांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत, संध्याकाळच्या वेळी ज्या चौकातून पोलीस पहारा संपला आहे. अशा ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांकडे पैशाची मागणी करत आहेत. आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, अशी मागणी या तृतीयपंथीयांनी केली आहे.

हेही वाचा - नगरपालिकेच्या समाज मंदिर आणि शौचालयांचा हातभट्ट्यांसाठी वापर

हेही वाचा - पोलीस दलाचे ड्रम पळवून हातभट्टीसाठी वापर; पन्नास हजाराची दारू जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.