ETV Bharat / state

हळद लागण्यापूर्वीच नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सततची नापिकी आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून या तरुणाने मानेगाव तांडा येथे आत्महत्या केली. ४ एप्रिलला या तरुणाचे लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

author img

By

Published : Apr 2, 2019, 12:47 PM IST

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

जालना - नापिकीला कंटाळून जालना तालुक्यातील मानेगाव तांडा येथील युवा शेतकऱ्याने हळद लागण्यापूर्वीच आपले जीवन संपविले. संदीप लहू पवार (वय 29) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुणाचे ४ एप्रिल रोजी लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळीच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे. सततची नापिकी आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून या तरुणाने मानेगाव तांडा येथे आत्महत्या केली. ४ एप्रिलला या तरुणाचे लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती भोजपुरी पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.


सोमवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घरातील मंडळी उठल्यानंतर संदीप पवार देखील उठून बाहेर जाऊन आला दरम्यानच्या काळात घरातील मंडळींना संदीपच्या खोलीचा दरवाजा बराच काळ बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. त्यावेळी संदीप घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

जालना - नापिकीला कंटाळून जालना तालुक्यातील मानेगाव तांडा येथील युवा शेतकऱ्याने हळद लागण्यापूर्वीच आपले जीवन संपविले. संदीप लहू पवार (वय 29) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या तरुणाचे ४ एप्रिल रोजी लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळीच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


त्याच्या कुटुंबात त्याचे आई-वडील दोन बहिणी एक भाऊ असा परिवार आहे. सततची नापिकी आणि त्यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून या तरुणाने मानेगाव तांडा येथे आत्महत्या केली. ४ एप्रिलला या तरुणाचे लग्न होणार होते, मात्र सोमवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती भोजपुरी पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.


सोमवारी सकाळी साडेचारच्या सुमारास घरातील मंडळी उठल्यानंतर संदीप पवार देखील उठून बाहेर जाऊन आला दरम्यानच्या काळात घरातील मंडळींना संदीपच्या खोलीचा दरवाजा बराच काळ बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्यामुळे कुटुंबीयांनी दरवाजा तोडला. त्यावेळी संदीप घरात लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

Intro:नापिकीला कंटाळून भावी नवरदेवने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील मानेगाव तांडा येथे घडली. संदीप लहू पवार (29) असे या नवरदेवाचे नाव आहे.


Body:या कर्तबगार तरुणाच्या परिवारात त्याचे आई-वडील दोन बहिणी भाऊ असाच सर्व परिवार आहे मात्र सततची नापिकी आणि त्यातून निर्माण झालेला नैराश्य पणा यामुळे या तरुणाने मानेगाव तांडा येथे आत्महत्या केली चार एप्रिल रोजी या तरुणाचे लग्न होते मात्र सोमवारी सकाळी तरुणांनी आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती भोजपुरी पोलिसांना सोमवारी सकाळी सात वाजता मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविले सोमवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घरातील मंडळी उठल्यानंतर त्यांनी संदीप पवार हा देखील उठून बाहेर जाऊन आला दरम्यानच्या काळात घरातील मंडळींना पवार यांच्या खोलीचा दरवाजा बंद दिसल्यामुळे त्यांनी नंतर तोडला आणि त्यावेळी संदीप लटकलेला दिसून आला


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.