ETV Bharat / state

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वीस वर्षांपूर्वीचा खटला निघाला निकाली

author img

By

Published : Feb 8, 2020, 5:34 PM IST

Updated : Feb 8, 2020, 7:08 PM IST

जालन्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वीस वर्षांपासून अडकलेल्या एका खटल्याचा निकाल लावण्यात आला. या सारखे अनेक खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले.

लोक अदालत
लोक अदालत

जालना - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वीस वर्षांपासून अडकलेल्या एका खटल्याचा निकाल लावण्यात आला. एका विमा कंपनीचाही सुरू असलेला लाखो रुपयांचा वाद मिटवण्यात आला.

जालन्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


वीस वर्षांपूर्वी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील कैलास फकिरचंद जाधव, शारदा बबन जाधव, मिनाबाई अशोक जाधव यांनी महाराष्ट्र शासनासह अन्य सोळा जणांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यामध्ये उपजिल्हाधिकाऱयांसह दामोदर नारायण जाधव, कौशल्याबाई सर्जेराव जाधव, फकीरचंद सर्जेराव जाधव, सुनील उत्तमचंद लाहोटी, महेश सारस्वत, चंद्रकला अग्रवाल असे सोळा प्रतिवादी होते. मागील वीस वर्षांपासून न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तरीही या प्रकरणाचा निकाल लागत नसल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू'

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून हे प्रकरण निकाली काढण्यात आले. या सोबत अन्य एका प्रकरणात विमा कंपनीसोबत सुरू असलेला वाद मिटवून मयताच्या वारसाला रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात. या सारखे अनेक खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले.

या लोक अदालतीचे उद्घाटन मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सुवर्णा केवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पारवेकर, जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी, एफ. एम. खाजा, एस. एस .पल्लोड, एम. वाय. डोईफोडे हे उपस्थित होते.

जालना - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वीस वर्षांपासून अडकलेल्या एका खटल्याचा निकाल लावण्यात आला. एका विमा कंपनीचाही सुरू असलेला लाखो रुपयांचा वाद मिटवण्यात आला.

जालन्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन


वीस वर्षांपूर्वी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील कैलास फकिरचंद जाधव, शारदा बबन जाधव, मिनाबाई अशोक जाधव यांनी महाराष्ट्र शासनासह अन्य सोळा जणांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता. यामध्ये उपजिल्हाधिकाऱयांसह दामोदर नारायण जाधव, कौशल्याबाई सर्जेराव जाधव, फकीरचंद सर्जेराव जाधव, सुनील उत्तमचंद लाहोटी, महेश सारस्वत, चंद्रकला अग्रवाल असे सोळा प्रतिवादी होते. मागील वीस वर्षांपासून न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तरीही या प्रकरणाचा निकाल लागत नसल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले.

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू'

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून हे प्रकरण निकाली काढण्यात आले. या सोबत अन्य एका प्रकरणात विमा कंपनीसोबत सुरू असलेला वाद मिटवून मयताच्या वारसाला रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात. या सारखे अनेक खटले लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आले.

या लोक अदालतीचे उद्घाटन मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा सुवर्णा केवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पारवेकर, जिल्हा न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी, एफ. एम. खाजा, एस. एस .पल्लोड, एम. वाय. डोईफोडे हे उपस्थित होते.

Intro:जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आज शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वीस वर्षापासून खितपत पडलेल्या एका न्यायालयीन खटल्याचा दोन्ही पक्षाच्या वतीने तडजोड करून निकाल लावण्यात आला . त्याच सोबत एका विमा कंपनीचा ही लाखो रुपयांचा सुरू असलेला वाद विवाद मिटवून मयताच्या वारसांना त्वरित मदत देण्याचा निकालही या अदालतीमध्ये झाला. या लोक अदालतीचे उद्घाटन मुख्य जिल्हा न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरण च्या अध्यक्ष श्रीमती सुवर्णा केवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव श्री पारवेकर यांच्यासह चौथे जिल्हा न्यायाधीश व्ही जी रघुवंशी, तसेच न्या एफ,एम खाजा, न्या .एस .एस .पल्लोड न्या. श्रीमती एम .वाय .डोईफोडे आदि न्यायाधीशांची ही यावेळी उपस्थिती होती.


Body:वीस वर्षांपूर्वी जालना तालुक्यातील देवमूर्ती येथील कैलास फकिरचंद जाधव, शारदा बबन जाधव, सौ. मिनाबाई अशोक जाधव या वादिनी महाराष्ट्र शासनासह अन्य सोळा जणांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता .यामध्ये उपजिल्हाधिकारी भूसुधार, यांच्यासह दामोदर नारायण जाधव, श्रीमती कौशल्याबाई सर्जेराव जाधव, फकीरचंद सर्जेराव जाधव, सुनील उत्तमचंद लाहोटी, महेश सारस्वत ,चंद्रकला अग्रवाल, असे सोळा प्रतिवादी होते. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात सुनावणी सुरू असतानाही या प्रकरणाचा निकाल लागत नसल्यामुळे हे प्रकरण राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले. आणि आणि गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रकरणाचा निकाल दोन्ही पक्षाच्या वतीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून निकाली काढण्यात आले. यासोबत अन्य एका प्रकरणात विमा कंपनीचा सोबत सुरू असलेल्या वादही मिटवून मयताच्या वारसाला तडजोडी अंती रोख रक्कम देण्याचाही निर्णय घेण्यात .आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री पारवेकर यांच्यासह दीपक खुरसले आणि बार असोसिएशनच्या सदस्यांनी मदत केली.

***बाईट कोट घातलेले मान्यवर श्री पारवेकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जालना


Conclusion:
Last Updated : Feb 8, 2020, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.