ETV Bharat / state

प्रा. जयराम खेडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार - जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा

जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे. कवी फ. मु .शिंदे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 जुलैला या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती या परिषदेचे पदाधिकारी राम गायकवाड यांनी दिली आहे

प्रा. जयराम खेडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार
author img

By

Published : Jul 22, 2019, 4:27 PM IST

Updated : Jul 22, 2019, 8:24 PM IST

जालना - जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती या परिषदेचे पदाधिकारी राम गायकवाड यांनी दिली आहे.

प्रा. जयराम खेडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जुन्या जालन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवितेतील समग्र योगदानासाठी जयस्वाल सोशल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूरस्कार सोहळ्यानंतर इंदर बोराडे (पाटोदा), संध्या रंगारी (नांदेड), आशा डांगे (औरंगाबाद), विनायक पवार (रायगड), कैलास भाले (जालना), वामनराव पाटील (परभणी), एकनाथ पांडवे (औरंगाबाद), शिवाजी सातपुते (मंगळवेढा) यांची काव्यमैफल ही आयोजित करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील शिवणीसारख्या डोंगराळ भागातून आलेल्या प्रा. खेडेकर यांच्या कवितांना कृषी संस्कृतीचा संदर्भ असतो. शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना पुरस्कारांनी गौरविण्यातही आघाडीवर असतात. त्यांच्या ‘मेघवृष्टी’ काव्यसंग्रहास राज्य सरकारचा बालकवी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ‘ऋतुवंत’ हा त्यांचा आणखी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘ऋतुवंत’ काव्यसंग्रहास शिवार प्रतिष्ठानचा ‘संत जनाबाई पुरस्कार’ मिळाला. अनेक व्यासपीठांवरून काव्यवाचन करणारे प्रा. खेडेकर ‘ऊर्मी’ या नावाचे साहित्यविषयक द्वैमासिकही प्रकाशित करतात. साहित्यविषयक चळवळही चालवितात.

जालना - जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती या परिषदेचे पदाधिकारी राम गायकवाड यांनी दिली आहे.

प्रा. जयराम खेडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जुन्या जालन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कवितेतील समग्र योगदानासाठी जयस्वाल सोशल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम 25 हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पूरस्कार सोहळ्यानंतर इंदर बोराडे (पाटोदा), संध्या रंगारी (नांदेड), आशा डांगे (औरंगाबाद), विनायक पवार (रायगड), कैलास भाले (जालना), वामनराव पाटील (परभणी), एकनाथ पांडवे (औरंगाबाद), शिवाजी सातपुते (मंगळवेढा) यांची काव्यमैफल ही आयोजित करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील शिवणीसारख्या डोंगराळ भागातून आलेल्या प्रा. खेडेकर यांच्या कवितांना कृषी संस्कृतीचा संदर्भ असतो. शहरात सांस्कृतिक-साहित्यिक कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये प्रा. जयराम खेडेकर यांचे नाव आघाडीवर असते. कवी असलेले प्रा. खेडेकर इतर साहित्यिकांना पुरस्कारांनी गौरविण्यातही आघाडीवर असतात. त्यांच्या ‘मेघवृष्टी’ काव्यसंग्रहास राज्य सरकारचा बालकवी साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ‘ऋतुवंत’ हा त्यांचा आणखी एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. ‘ऋतुवंत’ काव्यसंग्रहास शिवार प्रतिष्ठानचा ‘संत जनाबाई पुरस्कार’ मिळाला. अनेक व्यासपीठांवरून काव्यवाचन करणारे प्रा. खेडेकर ‘ऊर्मी’ या नावाचे साहित्यविषयक द्वैमासिकही प्रकाशित करतात. साहित्यविषयक चळवळही चालवितात.

Intro:जाणीवअस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, यांच्या वतीने दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक जयराम खेडेकर यांना जाहीर झाला आहे .कवी फ. मु .शिंदे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती च्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 जुलैला या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अशी माहिती या परिषदेचे पदाधिकारी राम गायकवाड यांनी दिली. यावेळी कवी कैलास भाले, सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांचीही या वेळी उपस्थिती होती.


Body:या जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. सुभाष माने, उद्योजक सुरेंद्र जयस्वाल ,प्रमुख पाहुणे म्हणून नामदार अर्जुनराव खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल ,उपनगराध्यक्ष राजेश राऊत, प्राध्यापक रमेश भुतेकर, यांचीही या वेळी उपस्थिती राहणार आहे .
सायंकाळी सात वाजता जुन्या जालन्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कवितेतील समग्र योगदानासाठी जयस्वाल सोशल फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम 25 हजार रुपये ,शाल ,श्रीफळ, स्मृतिचिन्ह ,असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच सोबत कार्यक्रमानंतर इंदर बोराडे पाटोदा ,डॉक्टर संध्या रंगारी नांदेड ,आशा डांगे औरंगाबाद, डॉक्टर विनायक पवार रायगड, कैलास भाले जालना, वामनराव पाटील परभणी, डॉक्टर एकनाथ पांडवे औरंगाबाद, शिवाजी सातपुते मंगळवेढा, यांची काव्यमैफल ही आयोजित केले आहे. रसिकांनी या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन राम गायकवाड यांच्यासह रमेश देवडकर कैलास भाले यांनी केले आहे.


Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.