ETV Bharat / state

जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान - पालकमंत्री बबनराव लोणीकर

author img

By

Published : Nov 1, 2019, 4:54 PM IST

बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. काढणीला आलेले मका, बाजरी, सोयाबिन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगदी पिक कापसाचीही नासाडी झाली आहे.

पिकांची पाहणी करताना पालकमंत्री लोणीकर

जालना - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील भराडखेडा गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान


मी देखील शेतकरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना मी जाणतो. सरकारने सरसकट अनुदान देण्याचे धोरण ठेवलेले आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त भागाचे नुकसान झालेले प्रथमदर्शनीच दिसत आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांना अनुदान वाटप होईल. हे अनुदान केंद्र सरकार, राज्य सरकार व पिक विमा कंपन्यांकडून संयुक्तरीत्या दिले जाईल, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी आजच (शुक्रवारी) अहवाल तयार करणार असून सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असे लोणीकरांनी अनौपचारिकरित्या बोलताना सांगितले. जिल्ह्यातील एकूण 6 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 5 लाख हेक्टर क्षेत्र हे नुकसानग्रस्त धरले जाणार आहे.

हेही वाचा - काँग्रेसची दिल्लीतील बैठक संपली, सध्या वेट अँड वॉच ची भूमिका


बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. काढणीला आलेले मका, बाजरी, सोयाबिन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगदी पीक कापसाचीही नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन दिवाळीच्या काळात संकट उभे राहिले. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आणि पीक विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा होती.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे

दरम्यान, 30 ऑक्टोबरलाच मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भराडखेडा, कडेगाव व सेलगाव येथील शेतीला भेटी दिल्या. यावेळी मक्याच्या कणसाला कोंब येऊन कणसात मका उगवलेली पालकमंत्र्याच्या निदर्शनास आले.
पालकमंत्री लोणीकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के हे उपस्थित होते.

जालना - जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील भराडखेडा गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.

जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान


मी देखील शेतकरीच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना मी जाणतो. सरकारने सरसकट अनुदान देण्याचे धोरण ठेवलेले आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त भागाचे नुकसान झालेले प्रथमदर्शनीच दिसत आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्वांना अनुदान वाटप होईल. हे अनुदान केंद्र सरकार, राज्य सरकार व पिक विमा कंपन्यांकडून संयुक्तरीत्या दिले जाईल, अशी माहिती बबनराव लोणीकर यांनी दिली. जिल्हाधिकारी आजच (शुक्रवारी) अहवाल तयार करणार असून सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळेल, असे लोणीकरांनी अनौपचारिकरित्या बोलताना सांगितले. जिल्ह्यातील एकूण 6 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 5 लाख हेक्टर क्षेत्र हे नुकसानग्रस्त धरले जाणार आहे.

हेही वाचा - काँग्रेसची दिल्लीतील बैठक संपली, सध्या वेट अँड वॉच ची भूमिका


बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. काढणीला आलेले मका, बाजरी, सोयाबिन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नगदी पीक कापसाचीही नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन दिवाळीच्या काळात संकट उभे राहिले. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून आणि पीक विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा होती.

हेही वाचा - अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे

दरम्यान, 30 ऑक्टोबरलाच मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्या अनुषंगाने जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी भराडखेडा, कडेगाव व सेलगाव येथील शेतीला भेटी दिल्या. यावेळी मक्याच्या कणसाला कोंब येऊन कणसात मका उगवलेली पालकमंत्र्याच्या निदर्शनास आले.
पालकमंत्री लोणीकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आमदार नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के हे उपस्थित होते.

Intro:

बदनापूर, दि. 31 (प्रतिनिधी): परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे जालना जिल्हयातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. नारायण कुचे यांनी तालुक्यातील भराडखेडा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी अनौपचारिकरित्या बोलताना पालकमंत्री लोणीकर यांनी जिल्हाधिकारी आजच म्ळणजे शुक्रवारी अहवाल तयार करणार असून असून सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील एकूण 6 लक्ष हेक्टर क्षेत्रापैकी 5 लक्ष हेक्टर क्षेत्र हे बाधीत धरले जाणार असल्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेतीची नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनची दिसत असल्यामुळे सरसकट सर्व शेतकत्यांना दुष्काळी अनुदान शासनातर्फे देण्यात येणार असून ते सर्वच शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्हयात परतीच्या पावसाचा जोरदार मारा बसलेला असून खरीपाचे काढणीस आलेले मका, बाजरी, सोयाबिन या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून मराठवाडयाचे नगदी पिक असलेले कापूस या पिकाचेही नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांपुढे ऐन दिवाळी सणात अंधार निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून व पिक विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा होती. दरम्यान 30 ऑक्टोबर रोजीच मुख्यमंत्रयांनी अतिवृष्टी भागाचे पंचनामे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्रशासनास दिले होते. त्या अनुषंगाने जालनाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी तालुक्यातील भराडखेडा, कडेगाव व सेलगाव येथील शेतीला भेटी दिल्या. भराडखेडा येथील शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतीत मंत्री महोदयांना नेऊन शेतीची नुकसानी दाखविली. यावेळी मक्याच्या कणसाला चक्क्‍ कोंब येऊन कणसात मका उगवलेली दिसत होती तर कापूसही पाण्यात भिजून काळाठिक्कर पडलेला दिसून आला. यावेळी पालकमंत्री लोणीकर यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. नारायण कुचे, तहसीलदार छाया पवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के आदींची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांची वाहून गेलेली मका, सोयाबिनचा झालेला कचरा तसेच मक्याच्या कणसाला आलेले पाले बघून अतिवृष्टीची तिव्रता दिसून येत होते. या ठिकाणी दोन ते चार विहिरीच या पावसाने ढासळून गेलेल्या दिसून येत होत्या. येथील शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्रयांनाच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची कहाणी विषद केली. यावेळी लोणीकर यांनी मी ही शेतकरी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना मी जाणतो. सरकारनेही कोणत्याही प्रकारच्या पाहणीचा फार्स न करता सरसकट अनुदान देण्याचे धोरण ठेवलेले असल्यामुळे आज ही पाहणी होत असून सर्वच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ्‍ होणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. जालना जिल्हयातील एकूण 6 लक्ष हेक्टर शेती पेरणी झालेली होती व 5 लक्ष हेक्टर क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असल्यामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त भागाचे नुकसान झालेले प्रथमदर्शनची दिसत असल्यामुळे ओला दुष्काळ ठरवण्यात येऊन सरसकट सर्वांना अनुदान वाटप होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे अनुदान केंद्र सरकार, राज्य सरकार व पिक विमा कंपन्या यांच्या संयुक्तरीत्या वाटप करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. आज जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना जालना जिल्हयाचा अहवाल सादर करणार असून शनिवार विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडयात सर्वप्रथम जालना जिल्हयाचा अहवाल सादर होणार असून तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Body:बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथे पाहणी करताना पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी बिनवडे, आमदार नारायण कुचे आदीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.