ETV Bharat / state

भारत आता चर्चा करणारा नाही, तर शत्रूला घरात घुसून मारणारा देश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - BJP public meeting in Jalgaon

भारत हा अमेरिका आणि इस्त्राईल या देशांच्या पाठोपाठ शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा बलवान देश झाला आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव येथील प्रचार सभेत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर
author img

By

Published : Apr 19, 2019, 11:52 PM IST

जळगाव - आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता केवळ चर्चा करणारा देश राहिलेला नाही. तर अमेरिका आणि इस्त्राईल या देशांच्या पाठोपाठ शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा बलवान देश झाला आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव येथील जाहीर प्रचार सभेत केले.

काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’चा नारा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असल्याची घणाघाती टीकादेखील त्यांनी यावेळी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार उन्मेश पाटील, माजीमंत्री सुरेश जैन, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, उपमहापौर अश्विन सोनवणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर
काँग्रेसचे नेते भाषणातून केवळ मोदींवर टीका करीत आहेत. त्यांना रात्री मोदींजीचे स्वप्न पडत आहे. ते रात्री अचानकपणे झोपेतून उठून मोदी-मोदी करत असतील. या निवडणुकीने त्यांची झोप उडवली आहे. ही निवडणूक साधी नव्हे, तर देशाच्या सुरक्षिततेसाठीची निवडणूक आहे. पाकिस्तानने आतंकवादी पाठवून भारतावर हल्ले केले. त्यावेळी काँग्रेस सरकारने चर्चेशिवाय काहीच केले नाही. पाकिस्तानात घुसून मारण्याची ताकद फक्त मोदी यांच्यातच आहे. भारत आता चर्चा करणारा नाही, तर शत्रूला घरात घुसून मारणारा देश आहे. पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल तसेच एअर स्ट्राईकमुळे भारत बलशाली राष्ट्र असल्याचा संदेश जगात गेला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मागील सरकारची भ्रष्ट संस्कृती संपविण्याचे काम मोदींनी केले. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी संकल्पना मोदी सरकारने राबवली असून दिलेल्या प्रत्येक योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला थारा उरला नाही, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. जळगाव शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हुडकोचे महापालिकेवरील कर्ज संपविण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.

आमचे तर लव्ह मॅरेज, तुमचे काय

आपल्या शैलीदार भाषणाने ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपसोबत फरफटत गेल्याची टीका आमच्यावर आघाडीकडून केली जाते. भाजप-सेना म्हणजे आमचे तर लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे आमच्यात सतत वाद होतात. पण आम्ही एकत्र येतोच. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचे तर साधे लफडेही नाही. मग तुम्ही कशाला एकमेकांचे मुके घेता? अशा शब्दात पाटील यांनी आघाडीची टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेल्या गुंडाची टोळी असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

जळगाव - आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता केवळ चर्चा करणारा देश राहिलेला नाही. तर अमेरिका आणि इस्त्राईल या देशांच्या पाठोपाठ शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा बलवान देश झाला आहे. असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव येथील जाहीर प्रचार सभेत केले.

काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’चा नारा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असल्याची घणाघाती टीकादेखील त्यांनी यावेळी केली. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार उन्मेश पाटील, माजीमंत्री सुरेश जैन, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, उपमहापौर अश्विन सोनवणे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर
काँग्रेसचे नेते भाषणातून केवळ मोदींवर टीका करीत आहेत. त्यांना रात्री मोदींजीचे स्वप्न पडत आहे. ते रात्री अचानकपणे झोपेतून उठून मोदी-मोदी करत असतील. या निवडणुकीने त्यांची झोप उडवली आहे. ही निवडणूक साधी नव्हे, तर देशाच्या सुरक्षिततेसाठीची निवडणूक आहे. पाकिस्तानने आतंकवादी पाठवून भारतावर हल्ले केले. त्यावेळी काँग्रेस सरकारने चर्चेशिवाय काहीच केले नाही. पाकिस्तानात घुसून मारण्याची ताकद फक्त मोदी यांच्यातच आहे. भारत आता चर्चा करणारा नाही, तर शत्रूला घरात घुसून मारणारा देश आहे. पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल तसेच एअर स्ट्राईकमुळे भारत बलशाली राष्ट्र असल्याचा संदेश जगात गेला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. मागील सरकारची भ्रष्ट संस्कृती संपविण्याचे काम मोदींनी केले. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी संकल्पना मोदी सरकारने राबवली असून दिलेल्या प्रत्येक योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला थारा उरला नाही, असे सांगत त्यांनी मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. जळगाव शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हुडकोचे महापालिकेवरील कर्ज संपविण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासनदेखील त्यांनी दिले.

आमचे तर लव्ह मॅरेज, तुमचे काय

आपल्या शैलीदार भाषणाने ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना-भाजपसोबत फरफटत गेल्याची टीका आमच्यावर आघाडीकडून केली जाते. भाजप-सेना म्हणजे आमचे तर लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे आमच्यात सतत वाद होतात. पण आम्ही एकत्र येतोच. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचे तर साधे लफडेही नाही. मग तुम्ही कशाला एकमेकांचे मुके घेता? अशा शब्दात पाटील यांनी आघाडीची टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेल्या गुंडाची टोळी असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

Intro:Feed send to FTP
जळगाव
आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आता केवळ चर्चा करणारा देश राहिलेला नाही. तर अमेरिका व इस्त्राईल या देशांच्या पाठोपाठ शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणारा बलवान भारत देश झाला आहे. देशाची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा संधी द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जळगाव येथील जाहीर प्रचार सभेत केले. काँग्रेसचा ‘गरिबी हटाव’चा नारा म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असल्याची घणाघाती टीकादेखील त्यांनी यावेळी केली.Body:जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, उमेदवार उन्मेश पाटील, माजीमंत्री सुरेश जैन, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, किशोर पाटील, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, उपमहापौर अश्विन सोनवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नेते भाषणातून केवल मोदींवर टीका करीत आहेत. त्यांना रात्री मोदींजीचे स्वप्न पडत आहे. ते रात्री अचानकपणे झोपेतून उठून मोदी मोदी करत असतील. त्यांना ही निवडणूक झोपू देत नाही. ही निवडणूक साधी नव्हे तर देशाच्या सुरक्षिततेसाठीची निवडणूक आहे. पाकिस्तानने आतंकवादी पाठवून भारतावर हल्ले केले; त्यावेळी काँग्रेस सरकारने चर्चेशिवाय काहीच केले नाही. पाकिस्तानात घुसून मारण्याची ताकद फक्त मोदी यांच्यातच आहे. भारत आता चर्चा करणारा नाही तर शत्रूला घरात घुसून मारणारा देश आहे. पाकिस्तानात झालेल्या सर्जिकल तसेच एअर स्ट्राईकमुळे भारत बलशाली राष्ट्र असल्याचा संदेश जगात गेला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
 
मागील सरकारची भ्रष्ट संस्कृती संपविण्याचे काम मोदींनी केले. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी संकल्पना मोदी सरकारने राबविली असून दिलेल्या प्रत्येक योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात मिळत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला थारा उरला नाही असं सांगत त्यांनी मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती दिली. जळगाव शहराला पूर्वीचे वैभव प्राप्त करुन देण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हुडकोचे महापालिकेवरील कर्ज संपविण्यासाठी तोडगा काढण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.Conclusion:आमचे तर लव्ह मॅरेज, तुमचे काय? गुलाबराव पाटील-

आपल्या शैलीदार भाषणाने ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, शिवसेना भाजपसोबत फरफटत गेल्याची टीका आमच्यावर आघाडीकडून केली जाते. भाजप-सेना म्हणजे आमचे तर लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे आमच्यात सतत वाद होतात. पण आम्ही एकत्र येतोच. तुम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांचे तर साधं लफडेही नाही. मग तुम्ही कशाला एकमेकांचे मुके घेतात? अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी आघाडीची टर उडवली. राष्ट्रवादी काँग्रेस ही फुटलेल्या गुंडाची टोळी असल्याची सणसणीत टीकाही त्यांनी केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.