ETV Bharat / state

शिवभोजन थाळींची संख्या वाढवल्यामुळे गरजूंना लाभ - jalna shivbhojan plates news

कोरोनामुळे बेघरांना, गरजूंना या वर्षी एक वेळचे जेवणदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवभोजन थाळीची संख्या वाढविल्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी जीवदान ठरत आहे.

jalna shivbhojan plates news
शिवभोजन थाळींची संख्या वाढवल्यामुळे गरजूंना लाभ
author img

By

Published : Apr 23, 2021, 4:46 PM IST

जालना - कोरोना महामारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी या महामारीची दाहकता तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे बेघरांना, गरजूंना या वर्षी एक वेळचे जेवणदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवभोजन थाळीची संख्या वाढविल्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी जीवदान ठरत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्यात 15 ठिकाणी वाटप -

जालना शहरामध्ये बस स्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय, रेल्वे स्थानक, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मोंढा, अशा पाच ठिकाणी हे शिव भोजन मिळत आहे. तर उर्वरित 10 केंद्र हे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत. 26 जानेवारी 2020 रोजी योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीची दोन महिने प्रत्येक थाळी दहा रुपयांत देण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये कोविड-19 आजार आला. त्यामुळे काही दिवस ही थाळी पाच रुपयांत मिळत होती. सद्यस्थितीत परिस्थितीमध्ये ही थाळी पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. त्याचसोबत दिवसाकाठी दोनशे थाळी भोजन वाटप करण्याची मर्यादा होती. ती सध्या 100 ने वाढवून तीनशेपर्यंत करण्यात आली आहे. 15 मेपर्यंत हे भोजन वाटप करण्याचे आदेश शिवभोजन चालकांना देण्यात आले आहेत. फक्त थाळी वाढविली नाही, तर वाटप करण्याची वेळदेखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गरजू, बेघर लाभार्थ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.

गरम आणि ताजे जेवण -

या जेवणामध्ये दोन पोळ्या, 100 ग्राम भाजी, 100 ग्राम भात, 100 ग्राम वरण, याप्रमाणे मागेल त्याला हे भोजन मिळत आहे. शासनाने दिलेल्या एका ॲपवर लाभार्थ्यांचा फोटो टाकून नाव टाकने, एवढेच काय ते शिवभोजन चालकांना सध्या काम आहे. त्यामुळे सोप्या सुटसुटीत या प्रक्रियेमुळे अनेक गरजूंना याचा लाभ मिळत आहे. गरजूंना जरी हे भोजन मोफत मिळत असले, तरी शासनाकडून मात्र या केंद्र चालकांना एका थाळी मागे 45 रुपये अनुदान देण्यात येत असल्याची माहिती रेल्वे स्थानकासमोरील शिवभजन केंद्राच्या संचालिका पुनम दीपक नाईक यांनी दिली.

हेही वाचा - कुसुंब्यात दाम्पत्याचा खून; घरात आढळले दोघांचे मृतदेह, चोरीचा संशय

जालना - कोरोना महामारीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी या महामारीची दाहकता तीव्रपणे जाणवत आहे. त्यामुळे बेघरांना, गरजूंना या वर्षी एक वेळचे जेवणदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये शिवभोजन थाळीची संख्या वाढविल्यामुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी जीवदान ठरत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्यात 15 ठिकाणी वाटप -

जालना शहरामध्ये बस स्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय, रेल्वे स्थानक, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मोंढा, अशा पाच ठिकाणी हे शिव भोजन मिळत आहे. तर उर्वरित 10 केंद्र हे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत. 26 जानेवारी 2020 रोजी योजनेची सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीची दोन महिने प्रत्येक थाळी दहा रुपयांत देण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये कोविड-19 आजार आला. त्यामुळे काही दिवस ही थाळी पाच रुपयांत मिळत होती. सद्यस्थितीत परिस्थितीमध्ये ही थाळी पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे. त्याचसोबत दिवसाकाठी दोनशे थाळी भोजन वाटप करण्याची मर्यादा होती. ती सध्या 100 ने वाढवून तीनशेपर्यंत करण्यात आली आहे. 15 मेपर्यंत हे भोजन वाटप करण्याचे आदेश शिवभोजन चालकांना देण्यात आले आहेत. फक्त थाळी वाढविली नाही, तर वाटप करण्याची वेळदेखील वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गरजू, बेघर लाभार्थ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.

गरम आणि ताजे जेवण -

या जेवणामध्ये दोन पोळ्या, 100 ग्राम भाजी, 100 ग्राम भात, 100 ग्राम वरण, याप्रमाणे मागेल त्याला हे भोजन मिळत आहे. शासनाने दिलेल्या एका ॲपवर लाभार्थ्यांचा फोटो टाकून नाव टाकने, एवढेच काय ते शिवभोजन चालकांना सध्या काम आहे. त्यामुळे सोप्या सुटसुटीत या प्रक्रियेमुळे अनेक गरजूंना याचा लाभ मिळत आहे. गरजूंना जरी हे भोजन मोफत मिळत असले, तरी शासनाकडून मात्र या केंद्र चालकांना एका थाळी मागे 45 रुपये अनुदान देण्यात येत असल्याची माहिती रेल्वे स्थानकासमोरील शिवभजन केंद्राच्या संचालिका पुनम दीपक नाईक यांनी दिली.

हेही वाचा - कुसुंब्यात दाम्पत्याचा खून; घरात आढळले दोघांचे मृतदेह, चोरीचा संशय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.