ETV Bharat / state

समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

author img

By

Published : Jan 24, 2020, 3:15 PM IST

Updated : Jan 24, 2020, 3:46 PM IST

समाजात स्वीकारण्यास आजोबांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या एका 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगावमधील कंजरवाडा येथे घडली.

suspected-death-of-young-girl-in-jalgaon
समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगाव - समाजात स्वीकारण्यास आजोबांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या एका 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी जळगावमधील कंजरवाडा येथील सिंगापूर भागात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांनी तब्बल 12 तास युवतीचा मृतदेह घरातच ठेवत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

निर्भया (नाव बदललेले) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की, निर्भयाचे वडील हे एका मागासवर्गीय समाजाचे आहेत. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी 15 वर्षांपूर्वी दुसऱ्या धर्माच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यांना निर्भयासह 2 मुली आहेत. मात्र, निर्भयाच्या आजोबांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता. त्यांनी निर्भयाच्या वडिलांचा प्रेमविवाह झालेला असताना आपल्याच समाजातील एका महिलेशी लग्न लावून दिले होते. तेव्हापासून निर्भयाचे वडील त्या दुसऱया पत्नीसोबत राहत होते. तर निर्भयाची आई दोन्ही मुलींसोबत जळगाव शहरातील कंजरवाड्यात विभक्त राहत होती.

निर्भयाचे लग्नाचे वय झालेले होते. त्यामुळे तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे म्हणून, तिच्या काकांनी पुढाकार घेतला होता. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आलेले होते. मात्र, तिच्या आजोबांनी तिला समाजात घेण्यास विरोध दर्शविला होता. विनवणी करुनही आजोबांनी आपली भूमिका बदलली नाही. शेवटी निर्भयाने हतबल होऊन गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

12 तास युवतीचा मृतदेह घरातच -

निर्भयाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह 12 तास घरातच ठेवत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. निर्भयाच्या आईने पोलिसात तक्रार करू नये म्हणून दबाव देखील टाकण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, औद्योगिक वसाहत पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. परंतु, तरीही युवतीचे कुटुंबीय तसेच पोलीस याप्रकरणी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या घटनेला निर्भयाचे आजोबा जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निर्भयाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

सारा प्रकार संशयास्पदच -

घडलेला सारा प्रकार संशयास्पद आहे. याबाबत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे. परंतु, नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, जाती-पातीची बुरसटलेली विचारसरणी अद्यापही समाजात खोलवर रुजलेली असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे.

जळगाव - समाजात स्वीकारण्यास आजोबांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या एका 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी जळगावमधील कंजरवाडा येथील सिंगापूर भागात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांनी तब्बल 12 तास युवतीचा मृतदेह घरातच ठेवत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

समाजात स्वीकारण्यास आजोबांचा नकार, तरुण नातीचा संशयास्पद मृत्यू; जळगावातील धक्कादायक प्रकार

निर्भया (नाव बदललेले) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की, निर्भयाचे वडील हे एका मागासवर्गीय समाजाचे आहेत. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी 15 वर्षांपूर्वी दुसऱ्या धर्माच्या महिलेशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर त्यांना निर्भयासह 2 मुली आहेत. मात्र, निर्भयाच्या आजोबांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता. त्यांनी निर्भयाच्या वडिलांचा प्रेमविवाह झालेला असताना आपल्याच समाजातील एका महिलेशी लग्न लावून दिले होते. तेव्हापासून निर्भयाचे वडील त्या दुसऱया पत्नीसोबत राहत होते. तर निर्भयाची आई दोन्ही मुलींसोबत जळगाव शहरातील कंजरवाड्यात विभक्त राहत होती.

निर्भयाचे लग्नाचे वय झालेले होते. त्यामुळे तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे म्हणून, तिच्या काकांनी पुढाकार घेतला होता. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आलेले होते. मात्र, तिच्या आजोबांनी तिला समाजात घेण्यास विरोध दर्शविला होता. विनवणी करुनही आजोबांनी आपली भूमिका बदलली नाही. शेवटी निर्भयाने हतबल होऊन गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

12 तास युवतीचा मृतदेह घरातच -

निर्भयाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह 12 तास घरातच ठेवत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. निर्भयाच्या आईने पोलिसात तक्रार करू नये म्हणून दबाव देखील टाकण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, औद्योगिक वसाहत पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. परंतु, तरीही युवतीचे कुटुंबीय तसेच पोलीस याप्रकरणी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या घटनेला निर्भयाचे आजोबा जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निर्भयाच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

सारा प्रकार संशयास्पदच -

घडलेला सारा प्रकार संशयास्पद आहे. याबाबत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे. परंतु, नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, जाती-पातीची बुरसटलेली विचारसरणी अद्यापही समाजात खोलवर रुजलेली असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे.

Intro:जळगाव
समाजात स्वीकारण्यास आजोबांनी नकार दिल्याने हतबल झालेल्या एका 19 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना 23 रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास जळगाव शहरातील कंजरवाडा, सिंगापूर भागात घडली. धक्कादायक बाब म्हणजे, घडलेल्या प्रकाराची वाच्यता होऊ नये म्हणून संबंधितांनी तब्बल 12 तास युवतीचा मृतदेह घरातच ठेवत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.Body:निर्भया (नाव बदललेले) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. या घटनेसंदर्भात मिळालेली माहिती अशी की, निर्भयाचे वडील हे एका मागासवर्गीय समाजाचे आहेत. ते महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी 15 वर्षांपूर्वी दुसऱ्या धर्माच्या एका महिलेशी प्रेमविवाह केला होता. या महिलेपासून त्यांना निर्भयासह 2 मुली आहेत. मात्र, निर्भयाच्या आजोबांना हा प्रेमविवाह मान्य नव्हता. त्यांनी निर्भयाच्या वडिलांचे प्रेमविवाह झालेला असताना आपल्याच समाजातील एका महिलेशी लग्न लावून दिले होते. तेव्हापासून निर्भयाचे वडील समाजातील पत्नीसोबत राहत होते. तर निर्भयाची आई दोन्ही मुलींसोबत जळगाव शहरातील कंजरवाड्यात विभक्त राहत होती. आता निर्भयाचे लग्नाचे वय झालेले होते. त्यामुळे तिचे आपल्याच समाजातील मुलाशी लग्न व्हावे म्हणून तिच्या काकांनी पुढाकार घेतला होता. तिच्यासाठी कोल्हापूरचे स्थळही आलेले होते. मात्र, तिच्या आजोबांनी तिला समाजात घेण्यास विरोध दर्शविला होता. विनवण्या करुनही आजोबांनी आपली भूमिका बदलली नाही. शेवटी निर्भयाने हतबल होऊन गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

12 तास युवतीचा मृतदेह घरातच-

निर्भयाने आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह 12 तास घरातच ठेवत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. निर्भयाच्या आईने पोलिसात तक्रार करू नये म्हणून दबाव देखील टाकण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, औद्योगिक वसाहत पोलिसांना युवतीच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. परंतु, तरीही युवतीचे कुटुंबीय तसेच पोलीस याप्रकरणी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. या घटनेला निर्भयाचे आजोबा जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निर्भयाच्या समाजबांधवांकडून करण्यात येत आहे.Conclusion:सारा प्रकार संशयास्पदच-

घडलेला सारा प्रकार संशयास्पद आहे. याबाबत पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे. परंतु, नेमकी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, जाती-पातीची बुरसटलेली विचारसरणी अद्यापही समाजात खोलवर रुजलेली असल्याचे या घटनेनंतर स्पष्ट होत आहे.
Last Updated : Jan 24, 2020, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.