ETV Bharat / state

सुरेश जैन विधानसभा लढवणार; भाजपमधील इच्छुकांच्या अडचणीत होणार वाढ

author img

By

Published : Jul 3, 2019, 1:07 PM IST

Updated : Jul 3, 2019, 1:13 PM IST

गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची वाताहत झाली आहे. शहराचा विकास खुंटला आहे. भविष्यात शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यांची ही भूमिका भाजपच्या अडचणी वाढवणारी तर आहेच, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचा संकेत देणारी आहे.

शिवसेना ज्येष्ठ नेत - सुरेश जैन

जळगाव - माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी आपण शिवसेनेच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. आमदार होण्याची स्वप्ने उराशी बाळगून असलेल्या भाजपच्या इच्छुकांच्या अडचणीत देखील सुरेश जैनांच्या भूमिकेमुळे आता भर पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चाचपणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी 'आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची वाताहत झाली आहे. शहराचा विकास खुंटला आहे. भविष्यात शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यांची ही भूमिका भाजपच्या अडचणी वाढवणारी तर आहेच, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचा संकेत देणारी आहे.

शिवसेना ज्येष्ठ नेत - सुरेश जैन

सुरेश जैन यांच्या भूमिकेमुळे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांची मोठी गोची होणार आहे. कारण ते विद्यमान आमदार असून भाजपकडून इच्छुक असलेल्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जैन यांच्यामुळे भोळेंचा पत्ता कापला जाईल. लोकसभा निवडणुकीतील भाजप-सेनेची युती विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहिली तर युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रात ही जागा सेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कारण ही जागा यापूर्वीही सेनेकडेच होती. त्यामुळे सेना या जागेवरील हक्क सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू सर्वत्र उधळत आहे. अशा परिस्थितीत भाजप 'मोठा भाऊ' म्हणून विद्यमान आमदार असलेली जागा सेनेला सोडण्याचे औदार्य दाखवेल का? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता या घडीला तरी नाकारता येणार नाही.

भाजपच्या नेतृत्वावर नाराजी?

राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेच्या माध्यमातून एकत्र नांदत असल्याचे वरवर दिसत असले तरी या ना त्या कारणांवरून शिवसेना वेळोवेळी भाजपवर निशाणा साधते. राज्यात असलेले हेच चित्र सध्या जळगाव महापालिकेसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे नेते व कार्यकर्ते गळ्यात गळा घालून फिरले. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता कधीच नव्हती. निवडणुकीनंतर ते समोर देखील आले. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत भाजपने सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांसाठीचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. याच मुद्द्यावरून ठिणगी पडली. पुन्हा भाजप-सेनेचे फाटले. भाजपच्या नेतृत्वावर सेनेची नाराजी असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. हीच नाराजी उघडपणे दाखवण्यासाठी सुरेश जैन यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मार्ग निवडला आहे.

शहराचा विकास करण्यास भाजप अपयशी..

जळगावात गेल्या पावणेपाच वर्षात विकासाचे कोणतेही ठोस काम भाजपला करता आले नाही. केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असताना भाजपला महापालिकेवरील हुडकोच्या कर्जाचा विषय, गाळ्यांचा प्रश्न, समांतर रस्ते यासारखे विषय अद्यापही प्रलंबित आहेत. आमदार म्हणून शहराचा विकास करण्यात सुरेश भोळे अपयशी ठरल्याचे सेनेची भावना आहे. हीच भावना जनमानसात रुजवण्यासाठी आता सेनेने हा पवित्रा घेतला आहे. एकट्या महापालिकेची ही स्थिती नाही. जिल्ह्यातही भाजप आणि सेनेच्या नेत्यांची तोंडे दोन वेगवेगळ्या दिशेला आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या कारणावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची नाराजी ओढवून घेतली होती. ही खदखद अजूनही किशोर पाटील यांच्या मनात आहेच. त्याचप्रमाणे सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील आणि माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. युतीची खूणगाठ बांधण्यापूर्वी सेनेच्या जाहीर मेळाव्यात या सर्व बाबींविषयी नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील अनेक वेळा भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली आहे. भाजपविषयी असलेली नाराजी शिवसैनिकांनी थेट शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून भाजप-सेनेत चढाओढ सुरू आहे. मध्यंतरी गिरीश महाजन यांनी आगामी मुख्यमंत्री देखील भाजपचाच राहील, असे जाहीर वक्तव्य करून नाराजी ओढवून घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 'आमचं ठरलंय', असे सांगत इतरांनी नाक खुपसू नये म्हणत महाजन यांना टोला लगावला होता. आता सुरेश जैन यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून माध्यमातून गिरीश महाजन यांना होमपीचवर पायचीत करण्याची तसेच राज्यातील जागा वाटपाच्या विषयात भाजपवर दबाव आणण्याची खेळी उद्धव ठाकरेंनी केल्याचीही जोरदार चर्चा आहे.

अपमानाचा बदला घेण्याची वेळ?

भाजपने वेळोवेळी सापत्न वागणूक देत सेनेला अपमानीत केले आहे, अशी भावना जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात आहे. भाजपची कोंडी करत अपमानाचा बदल घेण्याची हीच वेळ असल्याने सेनेने अचूक टायमिंग साधले आहे, असा राजकीय जाणकारांचा तर्क आहे. दुसरीकडे, 2012 मध्ये घरकुल घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सुरेश जैन तब्बल साडेचार वर्षे कारागृहात होते. 2014 मध्ये त्यांनी कारागृहातूनच निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे सुरेश भोळे यांनी 35 वर्षे जळगावच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुरेश जैन यांना पराभवाचा धक्का दिला होता. ही मानहानी देखील जैन कदाचित विसरले नसावेत. आता निवडणूक लढविण्याची घोषणा करून त्यांनी जळगावच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर आमदार भोळेंविरोधात पहिली चाल केली आहे. जैनांच्या पहिल्याच चालीत भोळेंची पुरती कोंडी झाली आहे. सुरेश जैन यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, हे नक्की.

जळगाव - माजी मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी आपण शिवसेनेच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. आमदार होण्याची स्वप्ने उराशी बाळगून असलेल्या भाजपच्या इच्छुकांच्या अडचणीत देखील सुरेश जैनांच्या भूमिकेमुळे आता भर पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चाचपणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी 'आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. तसेच गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची वाताहत झाली आहे. शहराचा विकास खुंटला आहे. भविष्यात शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्यांची ही भूमिका भाजपच्या अडचणी वाढवणारी तर आहेच, शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचा संकेत देणारी आहे.

शिवसेना ज्येष्ठ नेत - सुरेश जैन

सुरेश जैन यांच्या भूमिकेमुळे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांची मोठी गोची होणार आहे. कारण ते विद्यमान आमदार असून भाजपकडून इच्छुक असलेल्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जैन यांच्यामुळे भोळेंचा पत्ता कापला जाईल. लोकसभा निवडणुकीतील भाजप-सेनेची युती विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहिली तर युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रात ही जागा सेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कारण ही जागा यापूर्वीही सेनेकडेच होती. त्यामुळे सेना या जागेवरील हक्क सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू सर्वत्र उधळत आहे. अशा परिस्थितीत भाजप 'मोठा भाऊ' म्हणून विद्यमान आमदार असलेली जागा सेनेला सोडण्याचे औदार्य दाखवेल का? हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता या घडीला तरी नाकारता येणार नाही.

भाजपच्या नेतृत्वावर नाराजी?

राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेच्या माध्यमातून एकत्र नांदत असल्याचे वरवर दिसत असले तरी या ना त्या कारणांवरून शिवसेना वेळोवेळी भाजपवर निशाणा साधते. राज्यात असलेले हेच चित्र सध्या जळगाव महापालिकेसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे नेते व कार्यकर्ते गळ्यात गळा घालून फिरले. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता कधीच नव्हती. निवडणुकीनंतर ते समोर देखील आले. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत भाजपने सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांसाठीचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. याच मुद्द्यावरून ठिणगी पडली. पुन्हा भाजप-सेनेचे फाटले. भाजपच्या नेतृत्वावर सेनेची नाराजी असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. हीच नाराजी उघडपणे दाखवण्यासाठी सुरेश जैन यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मार्ग निवडला आहे.

शहराचा विकास करण्यास भाजप अपयशी..

जळगावात गेल्या पावणेपाच वर्षात विकासाचे कोणतेही ठोस काम भाजपला करता आले नाही. केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असताना भाजपला महापालिकेवरील हुडकोच्या कर्जाचा विषय, गाळ्यांचा प्रश्न, समांतर रस्ते यासारखे विषय अद्यापही प्रलंबित आहेत. आमदार म्हणून शहराचा विकास करण्यात सुरेश भोळे अपयशी ठरल्याचे सेनेची भावना आहे. हीच भावना जनमानसात रुजवण्यासाठी आता सेनेने हा पवित्रा घेतला आहे. एकट्या महापालिकेची ही स्थिती नाही. जिल्ह्यातही भाजप आणि सेनेच्या नेत्यांची तोंडे दोन वेगवेगळ्या दिशेला आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या कारणावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची नाराजी ओढवून घेतली होती. ही खदखद अजूनही किशोर पाटील यांच्या मनात आहेच. त्याचप्रमाणे सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील आणि माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. युतीची खूणगाठ बांधण्यापूर्वी सेनेच्या जाहीर मेळाव्यात या सर्व बाबींविषयी नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली होती.

खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील अनेक वेळा भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली आहे. भाजपविषयी असलेली नाराजी शिवसैनिकांनी थेट शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून भाजप-सेनेत चढाओढ सुरू आहे. मध्यंतरी गिरीश महाजन यांनी आगामी मुख्यमंत्री देखील भाजपचाच राहील, असे जाहीर वक्तव्य करून नाराजी ओढवून घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 'आमचं ठरलंय', असे सांगत इतरांनी नाक खुपसू नये म्हणत महाजन यांना टोला लगावला होता. आता सुरेश जैन यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून माध्यमातून गिरीश महाजन यांना होमपीचवर पायचीत करण्याची तसेच राज्यातील जागा वाटपाच्या विषयात भाजपवर दबाव आणण्याची खेळी उद्धव ठाकरेंनी केल्याचीही जोरदार चर्चा आहे.

अपमानाचा बदला घेण्याची वेळ?

भाजपने वेळोवेळी सापत्न वागणूक देत सेनेला अपमानीत केले आहे, अशी भावना जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात आहे. भाजपची कोंडी करत अपमानाचा बदल घेण्याची हीच वेळ असल्याने सेनेने अचूक टायमिंग साधले आहे, असा राजकीय जाणकारांचा तर्क आहे. दुसरीकडे, 2012 मध्ये घरकुल घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सुरेश जैन तब्बल साडेचार वर्षे कारागृहात होते. 2014 मध्ये त्यांनी कारागृहातूनच निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे सुरेश भोळे यांनी 35 वर्षे जळगावच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुरेश जैन यांना पराभवाचा धक्का दिला होता. ही मानहानी देखील जैन कदाचित विसरले नसावेत. आता निवडणूक लढविण्याची घोषणा करून त्यांनी जळगावच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर आमदार भोळेंविरोधात पहिली चाल केली आहे. जैनांच्या पहिल्याच चालीत भोळेंची पुरती कोंडी झाली आहे. सुरेश जैन यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, हे नक्की.

Intro:जळगाव
माजीमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी आपण शिवसेनेच्या तिकिटावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. आमदार होण्याची स्वप्ने उराशी बाळगून असलेल्या भाजपच्या इच्छुकांच्या अडचणीत देखील सुरेश जैनांच्या भूमिकेमुळे भर पडणार आहे.Body:लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चाचपणी करत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी 'आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. गेल्या पावणेपाच वर्षात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाची वाताहत झाली आहे. शहराचा विकास खुंटला आहे. भविष्यात शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे', अशी भूमिका जाहीर केली. त्यांची ही भूमिका भाजपच्या अडचणी वाढवणारी तर आहेच शिवाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू झाल्याचा संकेत देणारी आहे. सुरेश जैन यांच्या भूमिकेमुळे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांची मोठी गोची होणार आहे. कारण ते विद्यमान आमदार असून भाजपकडून इच्छुक असलेल्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. जैन यांच्यामुळे भोळेंचा पत्ता कापला जाईल. लोकसभा निवडणुकीतील भाजप-सेनेची युती विधानसभा निवडणुकीत देखील कायम राहिली तर युतीच्या जागा वाटपाच्या सूत्रात ही जागा सेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. कारण ही जागा यापूर्वीही सेनेकडेच होती. त्यामुळे सेना या जागेवरील हक्क सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा वारू सर्वत्र उधळत आहे. अशा परिस्थितीत भाजप 'मोठा भाऊ' म्हणून विद्यमान आमदार असलेली जागा सेनेला सोडण्याचे औदार्य दाखवेल का, हा देखील प्रश्नच आहे. त्यामुळे आगामी काळात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता या घडीला तरी नाकारता येणार नाही.

भाजपच्या नेतृत्वावर नाराजी?

राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेच्या माध्यमातून एकत्र नांदत असल्याचे वरवर दिसत असले तरी या ना त्या कारणांवरून शिवसेना वेळोवेळी भाजपवर निशाणा साधते. राज्यात असलेले हेच चित्र सध्या जळगाव महापालिकेसह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे नेते व कार्यकर्ते गळ्यात गळा घालून फिरले. मात्र, त्यांच्यात एकवाक्यता कधीच नव्हती. निवडणुकीनंतर ते समोर देखील आले. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या महासभेत भाजपने सेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठीचे प्रस्ताव फेटाळून लावले होते. याच मुद्द्यावरून ठिणगी पडली. पुन्हा भाजप-सेनेचे फाटले. भाजपच्या नेतृत्वावर सेनेची नाराजी असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. हीच नाराजी उघडपणे दाखवण्यासाठी सुरेश जैन यांनी विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीचा मार्ग निवडला आहे. जळगावात गेल्या पावणेपाच वर्षात विकासाचे कोणतेही ठोस काम भाजपला करता आले नाही. केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता असताना भाजपला महापालिकेवरील हुडकोच्या कर्जाचा विषय, गाळ्यांचा प्रश्न, समांतर रस्ते यासारखे विषय अद्यापही प्रलंबित आहेत. आमदार म्हणून शहराचा विकास करण्यात सुरेश भोळे अपयशी ठरल्याचे सेनेची भावना आहे. हीच भावना जनमानसात रुजवण्यासाठी आता सेनेने हा पवित्रा घेतला आहे. एकट्या महापालिकेची ही स्थिती नाही. जिल्ह्यातही भाजप आणि सेनेच्या नेत्यांची तोंडे दोन वेगवेगळ्या दिशेला आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या कारणावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची नाराजी ओढवून घेतली होती. ही खदखद अजूनही किशोर पाटील यांच्या मनात आहेच. त्याचप्रमाणे सेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील आणि माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्यातील हाडवैर जगजाहीर आहे. युतीची खूणगाठ बांधण्यापूर्वी सेनेच्या जाहीर मेळाव्यात या सर्व बाबींविषयी नेत्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील अनेक वेळा भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली आहे. भाजपविषयी असलेली नाराजी शिवसैनिकांनी थेट शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवरून भाजप-सेनेत चढाओढ सुरू आहे. मध्यंतरी गिरीश महाजन यांनी आगामी मुख्यमंत्री देखील भाजपचाच राहील, असे जाहीर वक्तव्य करून नाराजी ओढवून घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी 'आमचं ठरलंय', असे सांगत इतरांनी नाक खुपसू नये म्हणत महाजन यांना टोला लगावला होता. आता सुरेश जैन यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून माध्यमातून गिरीश महाजन यांना होमपीचवर पायचीत करण्याची तसेच राज्यातील जागा वाटपाच्या विषयात भाजपवर दबाव आणण्याची खेळी उद्धव ठाकरेंनी केल्याचीही जोरदार चर्चा आहे.Conclusion:अपमानाचा बदला घेण्याची वेळ?

भाजपने वेळोवेळी सापत्न वागणूक देत सेनेला अपमानीत केले आहे, अशी भावना जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनात आहे. भाजपची कोंडी करत अपमानाचा बदल घेण्याची हीच वेळ असल्याने सेनेने अचूक टायमिंग साधले आहे, असा राजकीय जाणकारांचा तर्क आहे. दुसरीकडे, 2012 मध्ये घरकुल घोटाळ्यात अटक झाल्यानंतर सुरेश जैन तब्बल साडेचार वर्षे कारागृहात होते. 2014 मध्ये त्यांनी कारागृहातूनच निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपचे सुरेश भोळे यांनी 35 वर्षे जळगावच्या राजकारणावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुरेश जैन यांना पराभवाचा धक्का दिला होता. ही मानहानी देखील जैन कदाचित विसरले नसावेत. आता निवडणूक लढविण्याची घोषणा करून त्यांनी जळगावच्या राजकीय बुद्धिबळाच्या पटावर आमदार भोळेंविरोधात पहिली चाल केली आहे. जैनांच्या पहिल्याच चालीत भोळेंची पुरती कोंडी झाली आहे. सुरेश जैन यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, हे नक्की.
Last Updated : Jul 3, 2019, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.