ETV Bharat / state

..तर नारायण राणे कोकणात काही तर काम करत बसले असते; गुलाबराव पाटलांचा निशाणा

भाजप खासदार नारायण राणे यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात शिवसेना सहभागी झाली नव्हती. या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी टीका केली होती. राणेंच्या टीकेला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

author img

By

Published : Jan 31, 2021, 1:31 PM IST

Updated : Jan 31, 2021, 2:09 PM IST

..तर नारायण राणे कोकणात काही तर काम करत बसले असते
..तर नारायण राणे कोकणात काही तर काम करत बसले असते

जळगाव - 'शिवसेना कधीही लपत नाही, तर नेहमी मैदानात पुढे असते. शिवसेनेमुळेच नारायण राणे मैदानात आले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. जर शिवसेना लपली असती, तर नारायण राणे हे कोकणात काही तरी काम करत बसले असते', अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

जळगावातील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी दुपारी गॅस शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्राच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

..तर नारायण राणे कोकणात काही तर काम करत बसले असते
काय म्हणाले होते नारायण राणे? भाजप खासदार नारायण राणे यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात शिवसेना सहभागी झाली नव्हती. या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी टीका केली होती. ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडायला तयार नसल्याची टीका राणेंनी केली होती. राणेंच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. विनाकारण काहीही वक्तव्ये करणे चुकीचे- युवासेनेचे सचिव सरदेसाई यांना राज्य शासनाने सुरक्षा प्रदान केल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. 'मंत्रालयातील अनेक फाईल्स त्याने दाबून ठेवल्या आहेत, त्यामुळे त्याला सुरक्षा देण्याची नितांत गरज होती', असे ट्विट करत नितेश राणेंनी टोला लगावला होता. या मुद्द्यावर देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सुरक्षा देण्याचे काम राज्य शासनाचे नाही. नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी एक विशेष समिती असते. ही समिती सुरक्षेचा निर्णय घेते. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका वाटत असेल तर त्याची चौकशी करून ही समिती सुरक्षा देण्याचा निर्णय घेते. त्यामुळे विनाकारण अशी चुकीची वक्तव्ये करणे योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लहानेंना आमचे सरकार त्रास देणार नाही, हे वचन देतो- गेल्या सरकारमध्ये मला प्रचंड त्रास झाला, अशा शब्दांत डॉ. तात्याराव लहाने यांनी गौप्यस्फोट केला आहे. डॉ. लहाने यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, गेल्या सरकारच्या काळात डॉ. तात्याराव लहाने यांना काय त्रास झाला, याची मला कल्पना नाही. पण आमचे सरकार त्यांना त्रास देणार नाही, असे वचन मी देतो, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

जळगाव - 'शिवसेना कधीही लपत नाही, तर नेहमी मैदानात पुढे असते. शिवसेनेमुळेच नारायण राणे मैदानात आले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. जर शिवसेना लपली असती, तर नारायण राणे हे कोकणात काही तरी काम करत बसले असते', अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

जळगावातील केशवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी दुपारी गॅस शवदाहिनीचा लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यानंतर गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्राच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

..तर नारायण राणे कोकणात काही तर काम करत बसले असते
काय म्हणाले होते नारायण राणे? भाजप खासदार नारायण राणे यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात शिवसेना सहभागी झाली नव्हती. या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी टीका केली होती. ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडायला तयार नसल्याची टीका राणेंनी केली होती. राणेंच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. विनाकारण काहीही वक्तव्ये करणे चुकीचे- युवासेनेचे सचिव सरदेसाई यांना राज्य शासनाने सुरक्षा प्रदान केल्याच्या मुद्द्यावरून नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. 'मंत्रालयातील अनेक फाईल्स त्याने दाबून ठेवल्या आहेत, त्यामुळे त्याला सुरक्षा देण्याची नितांत गरज होती', असे ट्विट करत नितेश राणेंनी टोला लगावला होता. या मुद्द्यावर देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सुरक्षा देण्याचे काम राज्य शासनाचे नाही. नेत्यांना सुरक्षा देण्यासाठी एक विशेष समिती असते. ही समिती सुरक्षेचा निर्णय घेते. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या जीवाला धोका वाटत असेल तर त्याची चौकशी करून ही समिती सुरक्षा देण्याचा निर्णय घेते. त्यामुळे विनाकारण अशी चुकीची वक्तव्ये करणे योग्य नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. लहानेंना आमचे सरकार त्रास देणार नाही, हे वचन देतो- गेल्या सरकारमध्ये मला प्रचंड त्रास झाला, अशा शब्दांत डॉ. तात्याराव लहाने यांनी गौप्यस्फोट केला आहे. डॉ. लहाने यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, गेल्या सरकारच्या काळात डॉ. तात्याराव लहाने यांना काय त्रास झाला, याची मला कल्पना नाही. पण आमचे सरकार त्यांना त्रास देणार नाही, असे वचन मी देतो, असे गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
Last Updated : Jan 31, 2021, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.