ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडूंब; पाणीप्रश्न सुटला

author img

By

Published : Sep 20, 2019, 11:51 PM IST

जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामुळे जळगावचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प

जळगाव - जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामुळे जळगावचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत


जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर आणि गिरणा हे तीन मोठे तर तेरा मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. मागील वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने या सर्वच प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी दमदार पावसामुळे मागचा अनुशेष भरुन निघाला आहे.

हेही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?


पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने १०० टक्के भरलेल्या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला गिरणा प्रकल्प १२ वर्षांनंतर १०० टक्के भरला आहे. त्याचप्रमाणे जळगाव आणि जामनेरसाठी असलेला वाघूर प्रकल्प ९३ टक्के भरला आहे.
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, हिवरा, तोंडापूर आणि बोरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

जळगाव - जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. यामुळे जळगावचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.

दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत


जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर आणि गिरणा हे तीन मोठे तर तेरा मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. मागील वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने या सर्वच प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठा होता. मात्र, यावर्षी दमदार पावसामुळे मागचा अनुशेष भरुन निघाला आहे.

हेही वाचा - जामनेर विधानसभा मतदारसंघ : भाजपचे 'संकटमोचक' मात्र विरोधकांसाठी संकट ?


पुढील काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने १०० टक्के भरलेल्या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला गिरणा प्रकल्प १२ वर्षांनंतर १०० टक्के भरला आहे. त्याचप्रमाणे जळगाव आणि जामनेरसाठी असलेला वाघूर प्रकल्प ९३ टक्के भरला आहे.
जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, हिवरा, तोंडापूर आणि बोरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

Intro:जळगाव
जळगाव जिल्ह्यावर यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी राहिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प तुडूंब भरले असून पाणीप्रश्न निकाली निघाला आहे.Body:जळगाव जिल्ह्यात हतनूर, वाघूर आणि गिरणा हे ३ मोठे तर १३ मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने या सर्वच प्रकल्पात अत्यल्प जलसाठा होता. मात्र, यावर्षी दमदार पावसामुळे सर्वच सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. अजून काही दिवस पावसाचा अंदाज असल्याने १०० टक्के भरलेल्या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर जे प्रकल्प अद्याप १०० टक्के भरलेले नाहीत ते पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला गिरणा प्रकल्प १२ वर्षांनंतर १०० टक्के भरला आहे. त्याचप्रमाणे जळगाव आणि जामनेरसाठी महत्त्वपूर्ण असलेला वाघूर प्रकल्प हा आजमितीला ९३ टक्के भरला असून पाऊस सुरूच राहिला तर येत्या २ दिवसात १०० टक्के भरेल, अशी शक्यता आहे.Conclusion:जळगाव जिल्ह्यात ३ मोठ्या सिंचन प्रकल्पांसह १३ मध्यम प्रकल्प आहेत. या १३ प्रकल्पांपैकी सुकी, अभोरा, मंगरूळ, हिवरा, तोंडापूर आणि बोरी हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर २ प्रकल्प पूर्णत्त्वाकडे, २ प्रकल्पांची वाटचाल नव्वदीकडे सुरू आहे. फक्त भोकरबारी आणि मन्याड या २ प्रकल्पात अद्याप ठणठणाट आहे. अग्नावती या प्रकल्पात अद्याप ३८ टक्के इतकाच जलसाठा आहे.

जिल्ह्यातील मोठे व मध्यम प्रकल्प मिळून आजच्या घडीला एकूण ८६.७४ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न तर निकाली निघाला आहेच; शिवाय रब्बी हंगामासाठी देखील पाण्याचे आवर्तन मिळण्यास मदत होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.