ETV Bharat / state

शेगाव खोडके ग्रामस्थांना पोलिसांच्या धमक्या; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण - Shegaon Khodke villagers fasting

गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेगाव खोडके येथे रात्री-अपरात्री धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांना सूचना देत आहेत. तोडफोड आणि पोलिसांना मारहाण प्रकरणी आठ ते दहा जणांना तुम्ही स्वतः घेऊन या, अशी सूचना गोरेगाव पोलिसांनी दिल्याचे तंटामुक्ती अध्यक्षांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री पोलीस गावात धाव घेऊन आरोपींना पकडण्याच्या धमक्या देत आहेत.

उपोषनावर बसलेले शेगाव आणि म्हाळशी ग्रामस्थ
author img

By

Published : Nov 18, 2019, 6:06 PM IST

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड याला तेलंगणा पोलिसांनी अचानक ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली होती. मात्र, शेगाव खोडके येथील गावकऱ्यांनी तेलंगणा पोलीस कर्मचाऱ्यांना व गणेश गायकवाड याला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवले. मात्र, या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी शेगाव ग्रामस्थांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर आता याप्रकरणी पोलिसांकडून गावकऱ्यांना त्रास दिले जात आहे. त्याविरोधात शेगाव खोडके व म्हाळशी येथील ग्रामस्थाकंडून आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या प्रकरणी माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेगाव (खोडके) येथे रात्री-अपरात्री धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांना सूचना देत आहेत. तोडफोड आणि पोलिसांना मारहाण प्रकरणी आठ ते दहा जणांना तुम्ही स्वतः घेऊन या, अशी सूचना गोरेगाव पोलिसांनी दिल्याचे तंटामुक्ती अध्यक्षांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री पोलीस गावात धाव घेऊन आरोपींना पकडण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. पूर्वी पावसाने, नंतर वाघाने आणि आता पोलिसांच्या भीतीने गावात दहशतीचे वतावरण निर्माण झाले आहे.

गणेश गायकवाड याचा कोणताही गुन्हा नसताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्याला पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे आम्ही गणेशच्या मदतीला धावून आल्याचे शेगाव (खोडके) येथील ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, गोरेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ग्रामस्थांनी लेकरा बाळासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाड्याचे सचिव दिवाकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन मंडप टाकण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची हकिगत ऐकून घेतली. आता सर्वच राजकीय पुढार्‍यांनी येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात तोडगा कसा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; टोकाई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात

हिंगोली- सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड याला तेलंगणा पोलिसांनी अचानक ताब्यात घेऊन त्याला मारहाण केली होती. मात्र, शेगाव खोडके येथील गावकऱ्यांनी तेलंगणा पोलीस कर्मचाऱ्यांना व गणेश गायकवाड याला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवले. मात्र, या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी शेगाव ग्रामस्थांना मारहाण केली. इतकेच नव्हे तर आता याप्रकरणी पोलिसांकडून गावकऱ्यांना त्रास दिले जात आहे. त्याविरोधात शेगाव खोडके व म्हाळशी येथील ग्रामस्थाकंडून आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.

या प्रकरणी माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेगाव (खोडके) येथे रात्री-अपरात्री धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांना सूचना देत आहेत. तोडफोड आणि पोलिसांना मारहाण प्रकरणी आठ ते दहा जणांना तुम्ही स्वतः घेऊन या, अशी सूचना गोरेगाव पोलिसांनी दिल्याचे तंटामुक्ती अध्यक्षांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री पोलीस गावात धाव घेऊन आरोपींना पकडण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. पूर्वी पावसाने, नंतर वाघाने आणि आता पोलिसांच्या भीतीने गावात दहशतीचे वतावरण निर्माण झाले आहे.

गणेश गायकवाड याचा कोणताही गुन्हा नसताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत त्याला पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे आम्ही गणेशच्या मदतीला धावून आल्याचे शेगाव (खोडके) येथील ग्रामस्थ सांगत आहेत. मात्र, गोरेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ग्रामस्थांनी लेकरा बाळासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाड्याचे सचिव दिवाकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन मंडप टाकण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची हकिगत ऐकून घेतली. आता सर्वच राजकीय पुढार्‍यांनी येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात तोडगा कसा निघणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; टोकाई साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात

Intro:सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथील गणेश गायकवाड या गृहस्थांना तेंलनगण पोलिसांनी अचानक पकडून विना नंबर च्या गाडी मध्ये टाकले अन मारहाण केलीय. त्याला घेऊन जाताना शेगाव खोडके येथील ग्रामस्थांनी ताब्यात घेतले अन एका सुरक्षित स्थळी ठेवले तरीही महाराष्ट्र पोलिसांनी येत थेट ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये बराच वेळ फ्रीस्टाइल चालली. तेंलनगण पोलिसांना ग्रामस्थांच्या तावडीतुन सोडवून घेतले. मात्र गोरेगाव पोलीस ठाण्यात सहा जणांसह इतराविरुद्ध गुन्हे दाखल केलेत. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रात्री अपरात्री गावात धाव घेत दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप नागरिकांनी करत गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.


Body:गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेगाव खोडके येथे रात्री-अपरात्री धाव घेत आरोपींना पकडण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्षांना सूचना देत आहेत. आठ ते दहा जनाला तुम्ही स्वतः घेऊन येण्याच्या सूचनाही गोरेगाव पोलिसांनी दिल्याचे तंटामुक्ती अध्यक्षांनी सांगितले. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री पोलीस गावात धाव घेऊन आरोपींना पकडण्याच्या धमक्या देत आहेत त्यामुळे ग्रामस्थांच्या झोपच उडालीय. पूर्वी पावसाने अन नंतर वाघाने आता पोलिसांच्या भीतीने गावात भीतीचे वतावरण निर्माण झालेय. ज्याला ताब्यात घेतले होते त्याचा गुन्हा कोणता गुन्हा देखील नव्हता तर ताब्यात घेत असलेल्या पोलिसांच्या गाडीवर नंबर नव्हता वरून पोलीस चाकूचा धाक दाखवत गणेशला मारहाण करत होते. त्यामुळे आम्ही गणेशच्या मदतीला धावून आल्याचे शेगाव खोडके येथील ग्रामस्थ सांगत आहेत मात्र गोरेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यामुळे गावात चांगलेच भीतीमुळे वातावरण निर्माण झाले हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी यापूर्वी प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज ग्रामस्थांनी लेकरा बाळा सह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा सचिव दिवाकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.


Conclusion:उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन मंडप टाकण्यात आले आहेत. नवनिर्वाचित आमदार संतोष बांगर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची हकिगत ऐकून घेतली. आता सर्वच राजकीय पुढार्‍यांनी येथील ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणात तोडगा कसा निघणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.