ETV Bharat / state

हिंगोलीत पसरली धुक्याची चादर; रबी पिकाला फटका

author img

By

Published : Jan 24, 2020, 10:46 AM IST

हिंगोली जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. अचानक आज धुक्याची चादर पसल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Ruby crops are damaged due to fog in Hingoli
हिंगोलीत पसरलीय धुक्याची चादर; रबी पिकाला फटका

हिंगोली - जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यात अचानक आज धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे रबी पिकाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या धुक्यामुळे वाहनांची गती मंदावली असल्याचे दिसून आले.

हिंगोलीत पसरलीय धुक्याची चादर; रबी पिकाला फटका

हेही वाचा - #CAA विरोध : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिंगोलीत युवकांनी स्वतःलाच केले 'जेरबंद'

हिंगोली जिल्ह्यात वाढत्या थंडीने रबीच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पिकेही बहरात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मात्र, अचानक दोन दिवसांपासून जिल्ह्यात धुक्याची चादर पसरत असल्याने, पिके धोक्यात सापडली आहेत. गहू, हरभरा, टाळकी आदी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र, धुक्यामुळे ही पिके आता हातची जाण्याच्या मार्गावर असल्याची शंका शेतकरी वर्तवत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये गहू पोटरीत असून, हरभराही घाट्यावर आला आहे. मात्र, धुक्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव, तर गहू या पिकावर तांबेरा पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर भाजीपाला वर्गीय पिकेही हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा - हिंगोलीत रोड रोमिओंना वाहतूक शाखेचा दणका; 25 वाहने जप्त

हिंगोली - जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाला आहे. त्यात अचानक आज धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे रबी पिकाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र, या धुक्यामुळे वाहनांची गती मंदावली असल्याचे दिसून आले.

हिंगोलीत पसरलीय धुक्याची चादर; रबी पिकाला फटका

हेही वाचा - #CAA विरोध : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हिंगोलीत युवकांनी स्वतःलाच केले 'जेरबंद'

हिंगोली जिल्ह्यात वाढत्या थंडीने रबीच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पिकेही बहरात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. मात्र, अचानक दोन दिवसांपासून जिल्ह्यात धुक्याची चादर पसरत असल्याने, पिके धोक्यात सापडली आहेत. गहू, हरभरा, टाळकी आदी पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र, धुक्यामुळे ही पिके आता हातची जाण्याच्या मार्गावर असल्याची शंका शेतकरी वर्तवत आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये गहू पोटरीत असून, हरभराही घाट्यावर आला आहे. मात्र, धुक्यामुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव, तर गहू या पिकावर तांबेरा पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर भाजीपाला वर्गीय पिकेही हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.

हेही वाचा - हिंगोलीत रोड रोमिओंना वाहतूक शाखेचा दणका; 25 वाहने जप्त

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी झालाय. अन अचानक आज धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आलंय. त्यामुळे रब्बी पिकाला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मात्र या धुक्यातून वाहनांची गती मंदावली असल्याचे दिसून आलेय.

Body:हिंगोली जिल्ह्यात वाढत्या थंडीने काही रब्बीच्या पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. पिके ही बहरात अली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते. मात्र अचानक दोन दिवसांपासून जिल्ह्यात धुक्याची चादर पसरत असल्याने, पिके धोक्यात सापडली आहेत. Conclusion:गहू, हरभरा, टाळकी आदी पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. मात्र धुक्यामुळे ही पिके आता हातची जाण्याच्या मार्गावर असल्याची शंका शेतकरी वर्तवित आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये गहू पोटरला असून, हरभराही घाट्यावर आला आहे. मात्र धुक्या मुळे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव, तर गहू या पिकावर तांबारी पडण्याची शक्यता आहे. एवढेच नव्हे तर भाजीपाला वर्गीय पिके ही हातची जाण्याच्या मार्गावर आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.