ETV Bharat / state

देशाचा चौकीदार बनणे यात  चुकीचे काय? - पंकजा मुंडे

पंकडा मुंडे हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

author img

By

Published : Apr 8, 2019, 10:09 AM IST

पंकजा मुंडे

हिंगोली - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघितले अन् त्यांनी प्रत्यक्षात उतरविलेही. पंतप्रधान काय गांधी घराण्यातील लोकांनीच व्हायचे का? सर्वसामान्यातीलही पंतप्रधान होऊ शकतो हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे 'चाय बेचनेवालाही प्रधानमंत्री बन सकता है' हे माझ्या राज्यातील माय माऊल्यांनी दाखवून दिल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे

यावेळी पंकजा मंडे म्हणाल्या की, हिंगोलीचे लोक हे एकनिष्ठ असल्याने हिंगोली येथे माझ्या सभेची गरज नाही. येथील लोक त्यांच्या ताईचा अजिबात अपमान करणार नाहीत. विशेष म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसासाठी गोपीनाथ मुंडे यांनी काम केले आहे. मग पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या उमेदवाराला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेवारी दिली असेल तर मग वावगे काय आहे, असे म्हणत त्यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.

काँग्रेसवर टिका करताना मुंडे म्हणाल्या की, सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा रद्द करणार आहोत, असे काँग्रेस सांगत आहे. मग काय तुम्हाला रस्त्यावर तिरंगा जाळायचा आहे की काय? तुम्ही देशद्रोहाचा गुन्ह रद्द करायला निघाले आहात. मग तुम्ही कोणत्या देशातले आहात ते तरी सांगा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेस इतके दिवस चायवाला यावर चर्चा करत होते आता ते चौकीदार म्हणून नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे काँगेसच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते, असे म्हणत देशाचा चौकीदर बनणे काय चुकीचे आहे का? असा सवाल त्यानी काँगेसला विचारला.

यावेळी माजी खासदार शिवाजी माने यांनी विरोधकांवर कडाडून टिका केली. तसेच काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात असलेले सुभाष वानखेडे यांच्या शिक्षणाची त्यांनी खिल्ली उडवीत, त्यांचे काही किस्सेही सांगितले. तसेच माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी जनतेने त्यांच्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आभार मानले.

हिंगोली - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न बघितले अन् त्यांनी प्रत्यक्षात उतरविलेही. पंतप्रधान काय गांधी घराण्यातील लोकांनीच व्हायचे का? सर्वसामान्यातीलही पंतप्रधान होऊ शकतो हे नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे. त्यामुळे 'चाय बेचनेवालाही प्रधानमंत्री बन सकता है' हे माझ्या राज्यातील माय माऊल्यांनी दाखवून दिल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलत होत्या.

हिंगोली येथील भाजपचे लोकसभेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे

यावेळी पंकजा मंडे म्हणाल्या की, हिंगोलीचे लोक हे एकनिष्ठ असल्याने हिंगोली येथे माझ्या सभेची गरज नाही. येथील लोक त्यांच्या ताईचा अजिबात अपमान करणार नाहीत. विशेष म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसासाठी गोपीनाथ मुंडे यांनी काम केले आहे. मग पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या उमेदवाराला हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमेवारी दिली असेल तर मग वावगे काय आहे, असे म्हणत त्यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.

काँग्रेसवर टिका करताना मुंडे म्हणाल्या की, सत्तेत आल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा रद्द करणार आहोत, असे काँग्रेस सांगत आहे. मग काय तुम्हाला रस्त्यावर तिरंगा जाळायचा आहे की काय? तुम्ही देशद्रोहाचा गुन्ह रद्द करायला निघाले आहात. मग तुम्ही कोणत्या देशातले आहात ते तरी सांगा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेस इतके दिवस चायवाला यावर चर्चा करत होते आता ते चौकीदार म्हणून नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. त्यामुळे काँगेसच्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते, असे म्हणत देशाचा चौकीदर बनणे काय चुकीचे आहे का? असा सवाल त्यानी काँगेसला विचारला.

यावेळी माजी खासदार शिवाजी माने यांनी विरोधकांवर कडाडून टिका केली. तसेच काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात असलेले सुभाष वानखेडे यांच्या शिक्षणाची त्यांनी खिल्ली उडवीत, त्यांचे काही किस्सेही सांगितले. तसेच माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी जनतेने त्यांच्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आभार मानले.

Intro:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री होण्याचे स्वप्न बघितले अन त्यांनी ते प्रत्यक्षात उतरविलेही, प्रधानमंत्री काय गांधी घराण्यातील लोकांनीच होयाचे का? सर्वसामान्यातीलही प्रधानमंत्री होऊ शकतो हे फक्त दाखवून दिले असेल तर फक्त नरेंद्र मोदी यांनी. गरिबाच्या पोटी जन्म घेलेल्या माणसांनी व्हायच की नाही. त्यामुळे चाय बेचनेवाला ही प्रधानमंत्री बन शकता है हे दाखवून दिलंय माझ्या राज्यातील माय माऊल्याने दाखवून दिल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी हिंगोली येथे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार सभेत काढले.


Body:हिंगोली लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. हिंगोली येथे माझ्या सभेची गरज नसतानाही सभा लावली वास्तविक पाहता, हिंगोली चे लोक हे एक निष्ठ आहेत. ते त्यांच्या ताईचा अजिबात अपमान करणार नाहीत. विशेष म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसासाठी गोपीनाथ मुंढे यांनी काम केलं आहे.
मग असे पक्षासाठी सतरंज्या उचलनाऱ्या उमेदवाराला हिंगोली लोकसभेच नेतृत दिले असेल तर मग वावग काय आहे. हा सर्वसामान्य उमेदवारच सर्वांसाठी धावून येणारा आहे. गरिबा मध्ये मिसळून तुमचे दुःख हरण करण्याचे काम करेल, कोणत्या राजा महाराजाला देऊन तुमचे दुःख हरण होऊ शकणार नाही. तसेच काँगेस सरकार म्हणतेय की आम्ही सत्येत आल्यानंतर देशद्रोहाचा गुन्हा रद्द करणार आहोत. मग काय तुम्हा रस्त्यावर तिरंगा जाळायांचा आहे की काय? तुम्ही देशद्रोहाचा गुन्ह रद्द करायला निघालेत मग तूम्ही कोणत्या देशातले आहेत ते तरी सांगा. तसेच इतके दिवस चायवाला यावर चर्चा होती. आता चर्चा होते ती चोकीदर वर त्यामुळे काँगेस च्या नेत्यांच्या बुद्धीची कीव येते. असे म्हणत देशाचा चोकीदर बनणे काय चुकीचे आहे का?असा सवाल त्यानी काँगेस ला विचारला. तसेच काँग्रेस वाल्यांनी तर खूप वाईट राजकारण केलं.ब्रिटिश गेले अन आता हे उरलेत.यांनी तर समाजाचे बारीक बारीक तुकडे केलेत. ब्रिटिश गेलेत अन त्यांच्या ओलादी सोडून गेल्याचे पंकजा मुंढेनी सांगितले. तसेच विरोधी पक्षनेते कशासाठी आहेत हेच कळायला मार्ग नाही. एवढे लाड करून आमचा पुतण्या त्या काकांनी घेऊन गेले. तसेच बीड जिल्ह्यात पाच आमदार अन सहा एमएलसी होते ते फक्त मी एकटीच भाजप मध्ये होते. आता राष्ट्रवादी चा असलेला आमदारही आमच्यात आलाय. त्यामुळे तिथे उरला य फक्त ठेंगा. असा टोला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढेना लगावला. तर प्रधानमंत्री यांना संपविण्यासाठी साप अन मुंगस एकत्र येऊन भाषण करीत आहेत.


Conclusion:या काँग्रेस वाल्याने जनतेला खुल त्रास दिला. आज माझ्या बहिणीची निवडणूक असली तरीही मी भाऊ हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी येथे आलेय. त्यामुळे माझी जरा तरी इज्जत राखा असे सांगितले. आणि आमचा उमेदवार हमखास निवडून येणारच ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हिंगोली जिल्ह्याच्या विकासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे.१५ कोटी नरसी नामदेव मंदिरासाठी, हिंगोली शहराच्या ड्रेनेजसाठी ९० कोटी एवढे दिल्यानंतर जनता अजिबात विसरणार नाही. राजकारण हे जातीसाठी नव्हे तर मातीसाठी करावे असा सल्लाही मुंढे यांनी दिला. तर माजी खा. शिवाजी माने यांनी विरोधकावर कडाडून टिका करीत शिवाचीही राख रांगोळी केली. सोबतच काँग्रेस कडून निवडणूक रिंगणात असलेले सुभाष वानखेडे यांच्या शिक्षणाची खिल्ली उडवीत, तर त्यांचे काही खिसेही सांगितले. तर सातव हे मोठी खेळी करणारे आहे. काही तरी वेगळं करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो असे सांगितले. तसेच माजी मंत्री सुर्यकांता पाटील यांनी जनतेने माझ्यावर दाखविलेले प्रेम याबद्दल हिंगोली लोकसभा मतदार संघाचे आभार मानत नाते गोते सांगत माझा मुलगा आता हेमंत निवडणूक रिंगणात त्याला सहकार्य करा. त्याला सहकार्य म्हणजे मलाच सहकार करण्यासारखे असल्याचे पाटील म्हणाल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.