ETV Bharat / state

...संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलेल्या त्या कन्या अन् पुत्ररत्नांचा पार पडला नामकरण सोहळा

author img

By

Published : Aug 29, 2019, 7:33 PM IST

करवाडी गावात गरोदर मातांना बाजेवर टाकत चिखलमय रस्ता तुडवून रुग्णवाहिकेत पर्यंत पोचविल्याची घटना घडली होती. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने या गावाबद्दल हळहळ व्यक्त केली होती. मोठ्या संघर्षाने प्रस्तुती झालेल्या त्या मातेच्या बाळाचा गुरुवारी मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला.

नामकरण सोहळा

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावात गरोदर मातांना बाजेवर टाकत चिखलमय रस्ता तुडवून रुग्णवाहिकेतपर्यंत पोहोचवल्याच्या काही घटना घडल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली होती. मोठ्या संघर्षाने प्रस्तुती झालेल्या त्या मातांच्या बाळांचा गुरुवारी मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला.

त्या कन्या अन् पुत्ररत्नांचा पार पडला नामकरण सोहळा

करवाडी येथील या गरोदर मातांची प्रसुती न विसरणारी आहे. मोठा संघर्ष केल्यानंतर त्या मातांची सुखरूपपणे शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यामुळे कळवाडी येथे मोठ्या उत्साहात त्या बालकांचा नामकरण सोहळा पार पडला.

अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी करवाडी या गावापर्यंत पायी जाण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र त्यांना देखील साफ अपयश आले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मात्र धाडस करून या गावांमध्ये चिखलातूनच प्रवेश केला होता. त्यांनी रस्ता दुरुस्ती संदर्भात आश्वासने देत शासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

वरिष्ठ स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरू असल्या तरी अजूनही या रस्त्याला मुहूर्त लागलेला नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. मोठ्या संघर्षमय परिस्थितीतून जन्मास आलेल्या त्या चिमुकल्यांची नावे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. संघर्ष, क्रांती, वीरांगना आणि नेहा अशी त्या बालकांची नावे ठेवण्यात आली आहेत.

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावात गरोदर मातांना बाजेवर टाकत चिखलमय रस्ता तुडवून रुग्णवाहिकेतपर्यंत पोहोचवल्याच्या काही घटना घडल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्राने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली होती. मोठ्या संघर्षाने प्रस्तुती झालेल्या त्या मातांच्या बाळांचा गुरुवारी मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला.

त्या कन्या अन् पुत्ररत्नांचा पार पडला नामकरण सोहळा

करवाडी येथील या गरोदर मातांची प्रसुती न विसरणारी आहे. मोठा संघर्ष केल्यानंतर त्या मातांची सुखरूपपणे शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यामुळे कळवाडी येथे मोठ्या उत्साहात त्या बालकांचा नामकरण सोहळा पार पडला.

अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी करवाडी या गावापर्यंत पायी जाण्याचादेखील प्रयत्न केला होता. मात्र त्यांना देखील साफ अपयश आले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मात्र धाडस करून या गावांमध्ये चिखलातूनच प्रवेश केला होता. त्यांनी रस्ता दुरुस्ती संदर्भात आश्वासने देत शासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

वरिष्ठ स्तरावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरू असल्या तरी अजूनही या रस्त्याला मुहूर्त लागलेला नाही, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे. मोठ्या संघर्षमय परिस्थितीतून जन्मास आलेल्या त्या चिमुकल्यांची नावे वाचून तुम्हीही थक्क व्हाल. संघर्ष, क्रांती, वीरांगना आणि नेहा अशी त्या बालकांची नावे ठेवण्यात आली आहेत.

Intro:


हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील बिना रस्त्याच गाव म्हणून ओळख असलेल्या करवाडी येथील गावात चक्क गरोदर मातेला बाजेवर टाकत चिखलमय रस्ता तुडवत रुग्णवाहिकेत पर्यंत पोचविले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने या गावाबद्दल हळहळ व्यक्त केली होती. मोठ्या संघर्षाने प्रस्तुती झालेल्या त्या मातांच्या बाळांचा आज करवाडी या गावात मोठ्या उत्साहात नामकरण सोहळा पार पडला.

Body:
करवाडी येथील गरोदर माता ने चिखलमय रस्त्यातून केलेला प्रवास हा खरोखरच या महाराष्ट्राला न विसरण्या सारखा आहे. अजूनही ते भयावह दृश्य पाहणाऱ्यांच्या डोळ्यातून गेलेली नाहीत. संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा करवाडी या गावाकडे लागल्या होत्या. मोठा संघर्ष केल्यानंतर त्या मातांची सुखरूप रित्या शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली होती. त्यामुळे आज कळवाडी येथे मोठ्या उत्साहात त्या बालकांचा नामकरण सोहळा पार पडला.
अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी करवाडी या गावापर्यंत पायी जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्याला साफ अपयश आलं होतं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्यासह विविध शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी मात्र धाडस करून या गावांमध्ये चिखलातूनच प्रवेश केला होता. त्यांनी ग्रामस्थांना रस्ता दुरुस्ती संदर्भात आश्वासने दिली आणि शासन स्तरावर सर्वतोपरी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. जरी वरिष्ठ स्तरांवर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हालचाली सुरू असल्या तरीही अजून तरी या रस्त्याला मुहूर्त लागलेला नाही हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.


*Conclusion:मोठ्या संघर्षमय परिस्थितीतून जन्मास आलेल्या
त्या चिमुकल्यांची नावे वाचून तुम्हीही व्हाल थक्क*

संघर्ष, क्रांती, वीरांगना, नेहा असे नावे ठेवण्यात आली आहेत.
रस्त्यामुळे हे गाव सतत महाराष्ट्रभर चर्चेत राहते आता रस्त्याला मंजुरी मिळाली असं विधानसभेच्या तोंडावर वेगवेगळ्या पक्षांचे नेते या ग्रामस्थांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर बरेच जण स्त्रियादेखील लाटण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.